शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

रायगडच्या संवर्धनाला पंधरा दिवसांत प्रारंभ

By admin | Updated: May 12, 2017 01:26 IST

पर्यटनमंत्र्यांची घोषणा : राजसदरेपासून कामास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : किल्ले रायगड विकास आराखड्यानुसार येत्या पंधरा दिवसांत संवर्धनाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांनी केली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात रायगड संवर्धनाबाबतची पहिली आढावा बैठक झाली. बैठकीत महाराष्ट्रातील दुर्गप्रेमींच्याकडून खासदार संभाजीराजे यांनी त्यांच्याकडे रायगडसंदर्भात आलेल्या लेखी काही सूचनाही पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांकडे दिल्या. त्यानुसार रायगड किल्ल्यांची दुरुस्ती आराखडे तयार करण्यात आले आहेत. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रायगडवरील ‘राजसदरे’च्या डागडुजीपासून या कामांचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या किल्ल्यावर असणाऱ्या पुरातन पाण्याच्या हौदातील गाळ काढण्यात येणार आहे. या गाळमुक्त होणाऱ्या हौदातील पाण्याचा उपयोग रायगडावरील येत्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित होणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी होणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी सांगितले.याशिवाय किल्ल्यावर लाईट, साऊंड शो, किल्ल्यावर येणाऱ्या दुर्गप्रेमींच्यासाठी स्वच्छतागृहाची सोय ‘डीआरडीओ’ संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. किल्ल्यावरच वृक्षारोपण केल्यानंतर त्याला लागणाऱ्या पाण्यासाठीही स्वतंत्र निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. या किल्ल्यावर संवर्धनाचे काम किमान अडीच ते तीन वर्षे चालणार असल्याने तेथे कायमस्वरूपी शासनाचा स्वतंत्र विभाग उभारण्यात येणार आहे तेथे अधिकारी राहून ते कामावर देखरेख ठेवतील, अशीही माहिती बैठकीत देण्यात आली. गडावर नियमित स्वच्छता राखावी, तसेच पर्यटकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करावे, अशा वेगवेगळ्या सूचना त्यांनी बैठकीत मांडल्या. अपुऱ्या वेळेअभावी घाईगडबडीत विकासकामे उरकून न होता तो निधी पुन्हा वर्ग करावा, यासाठी पीएलए (पर्सनल लेजर अकौंट)चीतरतूद करण्यात यावी, अशाही सूचना आढावा बैठकीत मांडण्यात आल्या. रायगडावर पुरातत्व खात्याने सुरू केलेली विकासकामे योग्य पद्धतीने व्हावीत तसेच किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपून त्याचा विकास व्हावा यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सूचना मांडल्या.या बैठकीस, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, एम. नबीराजन, भारतीय पुरातत्त्व विभागाचे संचालक राकेश तिवारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सह.व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, आर. एस. मोहिते, एम.टी.डी.सी.चे शैलेश बोरसे, राहुल सामले आदी उपस्थित होते.५०६ कोटींचा निधीरायगडाच्या संवर्धनासाठी शासनाच्यावतीने ५०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यापैकी सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी हा महाड ते रायगड या महामार्गासाठी वापरण्यात येणार आहे, तर या किल्ल्यावर संवर्धन आणि उत्खनन महत्त्वाचे असल्याने त्यासाठी सुमारे १२० कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या दुरुस्ती आराखड्याचे काम किमान अडीच ते तीन वर्षे चालणार आहे. त्यासाठी रायगडावरच स्पेशल सेल (कायमस्वरूपी स्वतंत्र विभाग) उभारण्यात येणार आहे.