शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

रायगडच्या संवर्धनाला पंधरा दिवसांत प्रारंभ

By admin | Updated: May 12, 2017 01:26 IST

पर्यटनमंत्र्यांची घोषणा : राजसदरेपासून कामास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : किल्ले रायगड विकास आराखड्यानुसार येत्या पंधरा दिवसांत संवर्धनाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांनी केली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात रायगड संवर्धनाबाबतची पहिली आढावा बैठक झाली. बैठकीत महाराष्ट्रातील दुर्गप्रेमींच्याकडून खासदार संभाजीराजे यांनी त्यांच्याकडे रायगडसंदर्भात आलेल्या लेखी काही सूचनाही पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांकडे दिल्या. त्यानुसार रायगड किल्ल्यांची दुरुस्ती आराखडे तयार करण्यात आले आहेत. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रायगडवरील ‘राजसदरे’च्या डागडुजीपासून या कामांचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या किल्ल्यावर असणाऱ्या पुरातन पाण्याच्या हौदातील गाळ काढण्यात येणार आहे. या गाळमुक्त होणाऱ्या हौदातील पाण्याचा उपयोग रायगडावरील येत्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित होणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी होणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी सांगितले.याशिवाय किल्ल्यावर लाईट, साऊंड शो, किल्ल्यावर येणाऱ्या दुर्गप्रेमींच्यासाठी स्वच्छतागृहाची सोय ‘डीआरडीओ’ संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. किल्ल्यावरच वृक्षारोपण केल्यानंतर त्याला लागणाऱ्या पाण्यासाठीही स्वतंत्र निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. या किल्ल्यावर संवर्धनाचे काम किमान अडीच ते तीन वर्षे चालणार असल्याने तेथे कायमस्वरूपी शासनाचा स्वतंत्र विभाग उभारण्यात येणार आहे तेथे अधिकारी राहून ते कामावर देखरेख ठेवतील, अशीही माहिती बैठकीत देण्यात आली. गडावर नियमित स्वच्छता राखावी, तसेच पर्यटकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करावे, अशा वेगवेगळ्या सूचना त्यांनी बैठकीत मांडल्या. अपुऱ्या वेळेअभावी घाईगडबडीत विकासकामे उरकून न होता तो निधी पुन्हा वर्ग करावा, यासाठी पीएलए (पर्सनल लेजर अकौंट)चीतरतूद करण्यात यावी, अशाही सूचना आढावा बैठकीत मांडण्यात आल्या. रायगडावर पुरातत्व खात्याने सुरू केलेली विकासकामे योग्य पद्धतीने व्हावीत तसेच किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपून त्याचा विकास व्हावा यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सूचना मांडल्या.या बैठकीस, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, एम. नबीराजन, भारतीय पुरातत्त्व विभागाचे संचालक राकेश तिवारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सह.व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, आर. एस. मोहिते, एम.टी.डी.सी.चे शैलेश बोरसे, राहुल सामले आदी उपस्थित होते.५०६ कोटींचा निधीरायगडाच्या संवर्धनासाठी शासनाच्यावतीने ५०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यापैकी सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी हा महाड ते रायगड या महामार्गासाठी वापरण्यात येणार आहे, तर या किल्ल्यावर संवर्धन आणि उत्खनन महत्त्वाचे असल्याने त्यासाठी सुमारे १२० कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या दुरुस्ती आराखड्याचे काम किमान अडीच ते तीन वर्षे चालणार आहे. त्यासाठी रायगडावरच स्पेशल सेल (कायमस्वरूपी स्वतंत्र विभाग) उभारण्यात येणार आहे.