शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

ग्रामीण भागातील यात्रांच्या हंगामाला प्रारंभ

By admin | Updated: February 21, 2017 23:52 IST

मोठी आर्थिक उलाढाल : धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध शर्यती, स्पर्धांसह कुस्ती मैदानांचे आयोजन

शिवाजी सावंत -- गारगोटी --ग्रामीण भागाच्या धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या (माही) यात्रा सुरू झाल्या आहेत. अपवादात्मक गावांमध्ये शाकाहारी, तर इतर सर्व गावांमध्ये मांसाहारी जेवणाने साजरा करण्यात येतो. या सणाला मोठी आर्थिक उलाढाल होत असते. यावर्षी झालेल्या नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या मंदीनंतर येणारा हा पहिलाच सण, उत्सव असल्याने नागरिकांइतकीच प्रतीक्षा व्यापारी, व्यावसायिकांनाही लागली आहे.माही यात्रा म्हणजे भक्ती, भावना, ग्रामीण पाहुणचार व आहेर, माहेर यांचा अनोखा संगम. गेल्या काही दिवसांत काळवंडलेल्या ग्रामीण नागरिकांच्या व व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे. तालुक्यात म्हसवे गावाच्या यात्रेने या सणाला सुरुवात होते. त्यानंतर मडिलगे, कोनवडे, भुदरगड किल्ल्यावरील भैरी देवाची, निष्णप येथील लक्ष्मी देवीची, शेणगाव येथील जोतिबाची यात्रा, पळशिवणे, टिक्केवाडी या तालुक्यातील प्रमुख मोठ्या माही यात्रा असून, प्रत्येक गावातील ग्रामदेवतांच्या वेगवेगळ्या माह्या असतात. देवदेवता वेगवेगळ्या असल्या तरी यात्रांचे स्वरूप साचेबद्ध असते. पहिला दिवस जागर, यादिवशी देवदर्शन, देवाचे नवस पुरे करणे, दुसऱ्या दिवशी गोडी यात्रा म्हणजे चिरमुरे गोळ्याची यात्रा, यादिवशी देवांना गोडा पुरण-पोळीचा नैवद्य पोहोच केला जातो. देवळासमोर पूजासाहित्य, मिठाई, खेळणी, दुकाने मांडली जातात. या दिवशी गावातील सर्व लोक आवर्जून देवदर्शन घेतात. जगाच्या पाठीवर कोठेही असला तरी यादिवशी देवदर्शनाला येण्याचा प्रयत्न करतो, आणि तिसऱ्या दिवशी खारी माहीचा दिवस. या दिवशी पाहुणे, मित्रमंडळींना आमंत्रित केले जाते. असे सर्वसाधारण यात्रेचे स्वरूप असते.वर्षभर शेत-शिवारात राबलेल्या जिवांच्या श्रमपरिहाराचे कारण ठरणाऱ्या या यात्रा म्हणजे निरागस जीवनाचे प्रतिबिंब असतात. पूर्र्वीच्या काळी बैलगाडीतून यात्रेला जाणे ही एक वेगळीच अनुभूती देणारा होता. काळानुसार बदलत जात असलेल्या ग्रामीण भागातील जीवनशैलीत माणसे आजही तितक्याच उत्साहाने हा सण साजरा करण्यासाठी एकत्र जमतात. नोकरीच्या निमित्ताने परगावी असलेल्यांना गावाकडे येण्याची एक अनामिक ओढ यानिमित्ताने असते. एरव्ही नीरव शांततेत जगणारी खेडी या सणाला अवखळ होऊन जातात. संपूर्ण वातावरणात एक प्रकारचा मोद भरलेला असतो. लहान मुलांना खेळण्याची दुकाने पाहताना एक वेगळीच मजा येत असते. त्यांनी खेळण्यासाठी मोठ्यांकडे धरलेला हट्ट. गल्लीबोळातून फिरणारे आईस्क्रीम विके्रते या बालसुलभ मनावर एक वेगळी फुंकर मारून जातात. माही जवळ आली आहे म्हटले की सुट्टीची जुळणी केली जाते. माहीला यायलाच लागतं, अशी एक रूढी पडलेली दिसून येते. इतर सणाला खेडेगावात जत्रेचे स्वरूप नसते, पण या माही सणाला मात्र ते पहावयास मिळते. रुढी परंपरा आजही कायम बैलगाडी शर्यर्ती, तमाशा यासारख्या अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात. गावगणना बैलगाडी शर्यती ही तर ठरलेली शर्यत असते.या स्पर्धेची गंमत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बैल औतासाठी गेलेले असतात त्या त्या ठिकाणी हे बैल शर्यतीच्या वेळी घुसतात. यातून एक वेगळीच मजा येते. ग्रामीण भागातील सण आजही तितक्याच भावनिकतेने आणि उत्साहाने साजरा केला जातो. काळाबरोबर खेडी बदलली आहेत, तरी रूढी परंपरा कायम जपली आहे.