शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

ग्रामीण भागातील यात्रांच्या हंगामाला प्रारंभ

By admin | Updated: February 21, 2017 23:52 IST

मोठी आर्थिक उलाढाल : धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध शर्यती, स्पर्धांसह कुस्ती मैदानांचे आयोजन

शिवाजी सावंत -- गारगोटी --ग्रामीण भागाच्या धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या (माही) यात्रा सुरू झाल्या आहेत. अपवादात्मक गावांमध्ये शाकाहारी, तर इतर सर्व गावांमध्ये मांसाहारी जेवणाने साजरा करण्यात येतो. या सणाला मोठी आर्थिक उलाढाल होत असते. यावर्षी झालेल्या नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या मंदीनंतर येणारा हा पहिलाच सण, उत्सव असल्याने नागरिकांइतकीच प्रतीक्षा व्यापारी, व्यावसायिकांनाही लागली आहे.माही यात्रा म्हणजे भक्ती, भावना, ग्रामीण पाहुणचार व आहेर, माहेर यांचा अनोखा संगम. गेल्या काही दिवसांत काळवंडलेल्या ग्रामीण नागरिकांच्या व व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे. तालुक्यात म्हसवे गावाच्या यात्रेने या सणाला सुरुवात होते. त्यानंतर मडिलगे, कोनवडे, भुदरगड किल्ल्यावरील भैरी देवाची, निष्णप येथील लक्ष्मी देवीची, शेणगाव येथील जोतिबाची यात्रा, पळशिवणे, टिक्केवाडी या तालुक्यातील प्रमुख मोठ्या माही यात्रा असून, प्रत्येक गावातील ग्रामदेवतांच्या वेगवेगळ्या माह्या असतात. देवदेवता वेगवेगळ्या असल्या तरी यात्रांचे स्वरूप साचेबद्ध असते. पहिला दिवस जागर, यादिवशी देवदर्शन, देवाचे नवस पुरे करणे, दुसऱ्या दिवशी गोडी यात्रा म्हणजे चिरमुरे गोळ्याची यात्रा, यादिवशी देवांना गोडा पुरण-पोळीचा नैवद्य पोहोच केला जातो. देवळासमोर पूजासाहित्य, मिठाई, खेळणी, दुकाने मांडली जातात. या दिवशी गावातील सर्व लोक आवर्जून देवदर्शन घेतात. जगाच्या पाठीवर कोठेही असला तरी यादिवशी देवदर्शनाला येण्याचा प्रयत्न करतो, आणि तिसऱ्या दिवशी खारी माहीचा दिवस. या दिवशी पाहुणे, मित्रमंडळींना आमंत्रित केले जाते. असे सर्वसाधारण यात्रेचे स्वरूप असते.वर्षभर शेत-शिवारात राबलेल्या जिवांच्या श्रमपरिहाराचे कारण ठरणाऱ्या या यात्रा म्हणजे निरागस जीवनाचे प्रतिबिंब असतात. पूर्र्वीच्या काळी बैलगाडीतून यात्रेला जाणे ही एक वेगळीच अनुभूती देणारा होता. काळानुसार बदलत जात असलेल्या ग्रामीण भागातील जीवनशैलीत माणसे आजही तितक्याच उत्साहाने हा सण साजरा करण्यासाठी एकत्र जमतात. नोकरीच्या निमित्ताने परगावी असलेल्यांना गावाकडे येण्याची एक अनामिक ओढ यानिमित्ताने असते. एरव्ही नीरव शांततेत जगणारी खेडी या सणाला अवखळ होऊन जातात. संपूर्ण वातावरणात एक प्रकारचा मोद भरलेला असतो. लहान मुलांना खेळण्याची दुकाने पाहताना एक वेगळीच मजा येत असते. त्यांनी खेळण्यासाठी मोठ्यांकडे धरलेला हट्ट. गल्लीबोळातून फिरणारे आईस्क्रीम विके्रते या बालसुलभ मनावर एक वेगळी फुंकर मारून जातात. माही जवळ आली आहे म्हटले की सुट्टीची जुळणी केली जाते. माहीला यायलाच लागतं, अशी एक रूढी पडलेली दिसून येते. इतर सणाला खेडेगावात जत्रेचे स्वरूप नसते, पण या माही सणाला मात्र ते पहावयास मिळते. रुढी परंपरा आजही कायम बैलगाडी शर्यर्ती, तमाशा यासारख्या अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात. गावगणना बैलगाडी शर्यती ही तर ठरलेली शर्यत असते.या स्पर्धेची गंमत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बैल औतासाठी गेलेले असतात त्या त्या ठिकाणी हे बैल शर्यतीच्या वेळी घुसतात. यातून एक वेगळीच मजा येते. ग्रामीण भागातील सण आजही तितक्याच भावनिकतेने आणि उत्साहाने साजरा केला जातो. काळाबरोबर खेडी बदलली आहेत, तरी रूढी परंपरा कायम जपली आहे.