शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्टार ९८३ ...कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हैराण झाला असला तरी त्याला विमा कंपन्यांकडून भरपाईपेक्षा मनस्तापच ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हैराण झाला असला तरी त्याला विमा कंपन्यांकडून भरपाईपेक्षा मनस्तापच अधिक मिळतो. जाचक निकषामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहत असून अनेक वर्षे निकष बदलण्याची मागणी करूनही बदल होत नाही. त्यामुळेच एकूण खरीप क्षेत्राच्या अवघ्या ०.७२ टक्के क्षेत्राचा पीक विमा यंदा शेतकऱ्यांनी उतरला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता तुलनेत अधिक आहे. त्यात विमा कंपन्यांच्या निकष अधिक जटिल असल्याने येथील शेतकरी विमा योजनेत सहभागी होत नाहीत. प्रत्येक वर्षी विमा हप्त्यापेक्षा मिळणारी भरपाई खूपच कमी असते. त्यामुळे विमा कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा उतरायचा का, असा सवाल शेतकरी विचारत असून लाभच मिळणार नसेल तर मग सहभागी कशाला व्हायचे? यासाठी ते पाठ फिरवत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस वगळता २ लाख ४ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे, त्यापैकी यंदा केवळ १,४८४ हेक्टरवरील पिकांचा विमा आहे.

दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील शेती -

खरीप गावे - १,२९३

खरिपाचे क्षेत्र - ३ लाख ९३ हेक्टर

ऊस वगळता - २ लाख ४ हजार २२४ हेक्टर

अत्यल्पभूधारक - ५ लाख ४ हजार ११७

अल्पभूधारक - १ लाख ५ हजार ४९२

सरकारच्या पीक विमा योजनेत सहभागी शेतकरी - ४,५६९

विमाधारक क्षेत्र - १,४८४ हेक्टर

एकूण खरीप क्षेत्र हेक्टर -

पीक क्षेत्र

भात ९३ हजार ७४२

ज्वारी २ हजार ३३७

नागली १८ हजार ७८४

भुईमूग ३९ हजार १७६

सोयाबीन ४१ हजार ५३८

मका १ हजार ९५५

तूर १ हजार ८२

मूग १ हजार ७०

उडीद १ हजार ५७

तालुकानिहाय विमा उतरलेले क्षेत्र व शेतकरी

तालुका क्षेत्र हेक्टर शेतकऱ्यांची संख्या

आजरा ५०.४६ २३०

गगनबावडा १४.५४ ९९

भुदरगड ४१.६१ २४८

चंदगड ४२.०६ १२९

गडहिंग्लज ५१.३६ २२७

हातकणंगले १६८ ४७६

कागल १२४.७२ ४०७

करवीर ७४.८२ २०१

पन्हाळा १३४.९९ ४५७

राधानगरी ४४.६९ २३०

शाहूवाडी ५२.६६ ३२८

शिरोळ ७११.४२ १५३७

कोट-

जिल्ह्यात महापुरामुळे उसाचे मोठे नुकसान झाले; मात्र ऊस विमा योजनेत नाही. त्यामुळे सोयाबीन, भुईमूग हीच पिके राहिली. या पिकांना लाभ देतानाही विमा कंपन्यांचे निकष आडवे येतात. त्यामुळे सरकारने निकष न बघता, शेतकऱ्यांना मदत कशी होईल, हे पाहावे.

- अमोल नांद्रेकर (शेतकरी, कवठेसार)