शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
5
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
6
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
7
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
8
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
9
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
10
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
11
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
12
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
13
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
14
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
15
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
16
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
17
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
18
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
19
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
20
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती

स्टार ९८३ ...कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हैराण झाला असला तरी त्याला विमा कंपन्यांकडून भरपाईपेक्षा मनस्तापच ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हैराण झाला असला तरी त्याला विमा कंपन्यांकडून भरपाईपेक्षा मनस्तापच अधिक मिळतो. जाचक निकषामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहत असून अनेक वर्षे निकष बदलण्याची मागणी करूनही बदल होत नाही. त्यामुळेच एकूण खरीप क्षेत्राच्या अवघ्या ०.७२ टक्के क्षेत्राचा पीक विमा यंदा शेतकऱ्यांनी उतरला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता तुलनेत अधिक आहे. त्यात विमा कंपन्यांच्या निकष अधिक जटिल असल्याने येथील शेतकरी विमा योजनेत सहभागी होत नाहीत. प्रत्येक वर्षी विमा हप्त्यापेक्षा मिळणारी भरपाई खूपच कमी असते. त्यामुळे विमा कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा उतरायचा का, असा सवाल शेतकरी विचारत असून लाभच मिळणार नसेल तर मग सहभागी कशाला व्हायचे? यासाठी ते पाठ फिरवत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस वगळता २ लाख ४ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे, त्यापैकी यंदा केवळ १,४८४ हेक्टरवरील पिकांचा विमा आहे.

दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील शेती -

खरीप गावे - १,२९३

खरिपाचे क्षेत्र - ३ लाख ९३ हेक्टर

ऊस वगळता - २ लाख ४ हजार २२४ हेक्टर

अत्यल्पभूधारक - ५ लाख ४ हजार ११७

अल्पभूधारक - १ लाख ५ हजार ४९२

सरकारच्या पीक विमा योजनेत सहभागी शेतकरी - ४,५६९

विमाधारक क्षेत्र - १,४८४ हेक्टर

एकूण खरीप क्षेत्र हेक्टर -

पीक क्षेत्र

भात ९३ हजार ७४२

ज्वारी २ हजार ३३७

नागली १८ हजार ७८४

भुईमूग ३९ हजार १७६

सोयाबीन ४१ हजार ५३८

मका १ हजार ९५५

तूर १ हजार ८२

मूग १ हजार ७०

उडीद १ हजार ५७

तालुकानिहाय विमा उतरलेले क्षेत्र व शेतकरी

तालुका क्षेत्र हेक्टर शेतकऱ्यांची संख्या

आजरा ५०.४६ २३०

गगनबावडा १४.५४ ९९

भुदरगड ४१.६१ २४८

चंदगड ४२.०६ १२९

गडहिंग्लज ५१.३६ २२७

हातकणंगले १६८ ४७६

कागल १२४.७२ ४०७

करवीर ७४.८२ २०१

पन्हाळा १३४.९९ ४५७

राधानगरी ४४.६९ २३०

शाहूवाडी ५२.६६ ३२८

शिरोळ ७११.४२ १५३७

कोट-

जिल्ह्यात महापुरामुळे उसाचे मोठे नुकसान झाले; मात्र ऊस विमा योजनेत नाही. त्यामुळे सोयाबीन, भुईमूग हीच पिके राहिली. या पिकांना लाभ देतानाही विमा कंपन्यांचे निकष आडवे येतात. त्यामुळे सरकारने निकष न बघता, शेतकऱ्यांना मदत कशी होईल, हे पाहावे.

- अमोल नांद्रेकर (शेतकरी, कवठेसार)