शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

(स्टार८२४) गुन्हेगारीत नवीन चेहरे; कोरोनाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेले दीड वर्षे कोरोनाचा कहर झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, कर्जबाजारी झाल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गेले दीड वर्षे कोरोनाचा कहर झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, कर्जबाजारी झाल्याने व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले. बेरोजगारी वाढल्याने, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. प्रत्येकजण आर्थिक अडचणीत आला. बेरोजगारांची संख्या वाढल्याने पोटपाणी चालवण्यासाठी तरुणांचे पाय अपोआपच गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले. गुन्हेगारी क्षेत्रात आलेले हे नवे चेहरे शोधण्यासाठी पोलिसांची नवी डोकेदुखी वाढली. परिणामी, २०१९ च्या तुलनेत गेल्या दीड वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढले.

कोल्हापूर जिल्ह्यात २०२० मार्च अखेरीस कोरोनाचा शिरकावा झाला. प्रशासनाने निर्बध आणले, परिणामी उद्योग, व्यवसाय बंद पडले. कर्मचारी कपातीचा फटका नोकरदार वर्गाला बसला. अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले. कर्जबाजारांचे प्रमाण वाढले. निराशेच्या गर्तेतील अनेकांनी जीवनमानच संपवले. बेरोजगारी वाढली, हाताला कामच नसल्याने तरुणवर्ग गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला. त्यातून २०१९ च्या तुलनेत २०२० व मे २०२१ या कालावधीत खून, चोऱ्या, जिवे मारण्याचा प्रयत्न यांसह इतर गुन्ह्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली. हे नवे तरुण चेहऱ्यांचे गुन्हेगार शोधणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.

गुन्हेगारीत नवे चेहरे का आले?

नोकरी नाही, व्यवसाय बंद, हाताला काम नसल्याने, तसेच कोरोनामुळे जवळचे नातलग दुरवले. अशा अवस्थेत व्यसनाधीनकडे वळलेले तरुणवर्ग जुन्या गुन्हेगारांच्या सानिध्यात आले, त्यातून ते गुन्हेगारी क्षेत्रात अपोआपच ओढले गेले. या नव्या तरुण चेहऱ्यांच्या गुन्हेगारांची संख्या गेल्या दीड वर्षात प्रचंड वाढली आहे.

खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार...

जुने गुन्हेगार रेकॉर्डवर असल्याने त्यांच्या हालचालीवर पोलिसांची नजर असतेच. पण कोरोना कालावधीत गुन्हे झपाट्याने वाढल्याने नव्या तरुण वर्गातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी नव्या दमाचे माहिती देणारे खबरे (झीरो पोलीस) वाढवावे लागणार आहेत. नव्याने गुन्हेगारी क्षेत्रात आलेला तरुणवर्ग हा बेरोजगार असतानाही चैनीत कसे राहतात हा धागा पकडून त्यांचा शोध घेता येतो.

- गुन्हेगारी : २०१९ - २०२० - मे २०२१ पर्यत

- चोऱ्या-दरोडे : ६७१ - १२८६ - ८०१

- खून : ४८ - ४६ - २४

- जिवे मारण्याचा प्रयत्न : ८५ - ८५- ४३

कोट...

कोरोनामुळे बेकारी वाढली, रोजगार उपलब्ध नाही. कर्जबाजारीमुळे व्यसनाच्या आहारी गेलेले तरुण आपोआपच जुन्या गुन्हेेगारांच्या सानिध्यात येऊन गुन्हेगारी क्षेत्रात ओढले जात आहेत. हे नव्या चेहऱ्यांचे गुन्हेगार शोधण्याठी आम्हाला खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार- तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर

कोट...

शाळा, कॉलेज बंद अन्‌ ऑनलाइन अभ्यासात मोबाईलचा गैरवापर वाढल्याने चांगल्या गोष्टी शिकण्याऐवजी तरुण मुलांत क्रिमिनलचे प्रमाण वाढत आहे. रिकामा वेळ असल्याने मुले दिशाहीन होत आहेत. त्यावर पालकांचे लक्ष आवश्यक आहे. मुलांना भावना समजावून सांगून त्यांचे लक्ष खेळ, व्यायामाकडे वळवणे आवश्यक आहे. - डॉ. निखिल चौगुले, मानसमोपचारतज्ज्ञ, कोल्हापूर