शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

स्टार १२१६: चालणे विसरले, नको त्या वयात आजारांनी जखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:26 IST

कोल्हापूर: चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही, हे कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे. हातात गाडी आल्यापासून लोक चालणेच विसरले ...

कोल्हापूर: चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही, हे कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे. हातात गाडी आल्यापासून लोक चालणेच विसरले आहेत, त्याचे व्हायचे तेच परिणाम दिसत आहेत. नको त्या वयात हाडांची दुखणी शरीराला जखडली आहेत. हातापायांना व्यायामच नसल्याने स्थूलता वाढून अस्थिराेगांना आयते निमंत्रणच मिळत आहे.

अलीकडे हातात दुचाक्यांचे हॅण्डल आणि चारचाकीचे स्टेअरिंग आल्यापासून किक आणि स्टार्टर मारण्यापर्यंतच हातापायांची हालचाल सीमित राहिली आहे. जे आरोग्यादृष्टीने जागरूक आहे, ते भल्या पहाटे आणि संध्याकाळी सायकलिंगसह वेगाने चालण्याचे व्यायाम करतात. पण त्यांची एकूणच संख्या पाहता बरीच मोठी लाेकसंख्या मिळणारा रिकामा वेळ एक तर टीव्ही पाहण्यात, झोपण्यात, गप्पा मारण्यात घालवताना दिसते. जेवणे आणि झोपणे यातून नुसताच स्थूलपणा वाढत आहे. मग जाड झाला आहे, असे कुणी म्हटले की फिरायला जाण्याचे, व्यायाम करण्याचे संकल्प सोडले जातात, पण तेही नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे लगेचच बंद पडतात. लठ्ठपणा आहे तसाच राहतो. कमी अधिक प्रमाणात समाजातील सर्वच घटकांत हे चित्र आहे. लठ्ठपणा वाढल्याने साहजिकच त्याचा ताण एकूण शरीरावर येतो. शरीराच्या सर्वच हालचाली मंदावतात. यातून हाडांची दुखणे डोके वर काढू लागतात. हाडांमध्ये मजबुती राहत नाही, त्यामुळे साधा पाय मुरगळला तरी ते फॅक्चरपर्यंत जात आहे, आणि त्याच्या खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

याच कारणासाठी होतेय चालणे

ज्येष्ठ नागरिक : व्यायाम म्हणून सकाळ व संध्याकाळ

महिला: किराणा दुकानापर्यंत किंवा रिक्षा, बसस्टॉपपर्यंत

पुरुष: गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत

तरुणाई: गल्लीतील मित्रमैत्रिणींच्या घरापर्यंत

म्हणून वाढले हाडांचे आजार

हाडे ठिसूळ होणे हा चालणेच बंद केल्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे. पूर्वी वाहतुकीची साधने नसल्याने लोक पायी चालायचे. त्यामुळे त्यांना हाडांचे दुखणेही नसायचे, ते दीर्घायुष्यीदेखील असायचे, पण आता हातात गाडीची चावी आल्यापासून वेळ वाचतोय पण बहुमूल्य आरोग्य वाया जात आहे, याकडे दुर्लक्ष होत आहे. पायाच्या पिंडऱ्या या शरीरातील दुसरे हृदय असतात, त्या जितक्या मजबूत तितके हृदयाचे रक्ताभिसरण वाढून रक्ताचा दाब कमी होतो. स्नायू बळकट होतात. शरीरावरील ताण कमी होतो.

डॉ. अतुल्य पाटील, अस्थिरोगतज्ज्ञ, दुधाळी, कोल्हापूर

हे करुन पाहा

राेज सकाळ संध्याकाळ वॉकिंग, जॉगिंगला कंटाळा नको

किमान एक किलोमीटरच्या परिसरात काम असेल तर चालत जाणे

पहिल्या दोन मजल्यांसाठी लिफ्टचा वापर शक्यतो टाळा

बाजारातही भाजी खरेदीसाठी शक्यतो चालतच फिरावे

दैनंदिन कामासाठी सायकलचा वापर वाढवावा

शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्याेना सायकल सक्तीचीच करावी

लहान मुलांना सक्तीने चालण्यास प्रवृत्त करावे

गृहिणीनी घरातील जिन्यावरुनच चढउतार करावा

पायी चालणे शक्यच नाही त्यांच्यासाठी हे करता येईल

शक्य असेल तितके चालणे महत्त्वाचे आहे, तरीदेखील शक्य नसेल तर बसल्या जागेवर हातापायांची हालचाल करता येणारे व्यायाम करावेत, घरातल्या घरात चालण्याचा प्रयत्न करावा.