शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

स्टार १०५६: घाण्याचे तेल आरोग्यदायी, पण खिशावर पडतेय भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : घाण्याचे तेल कितीही आरोग्यदायी असले तरी लीटरचा दर बघूनच अनेकांच्या काळजात धस्स होते. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : घाण्याचे तेल कितीही आरोग्यदायी असले तरी लीटरचा दर बघूनच अनेकांच्या काळजात धस्स होते. त्यामुळे रिफाईन्ड तेलामुळे चरबी वाढते, आजारांना आमंत्रण मिळते हे किती जरी खरे असले तरी शेवटी खिशाला बसणारा भारच महत्त्वाचा ठरत असल्याचे बाजारातील चित्र आहे.

पूर्वी गावागावात घाणे असायचे. शेतात पिकणारा भुईमूग, करडई, सूर्यफुलापासून तेल काढून तेच वापरले जाई. त्यामुळे आजारांना फारसा थारा नसायचा. काळ बदलला तसा घाणाही मागे पडत गेला आणि घरगुती तेलही. घरोघरी रिफाईन्ड केलेले तेलाचे डब्बे येऊ लागले. स्वस्त आणि मस्त म्हणून वापरही वाढला. याचे व्हायचे तसेच परिणाम होऊ लागले. स्थुलता वाढली, हृदयविकारासारख्या आजारांनी घरोघरी ठाण मांडले. यातच कोरोनाची साथ आली आणि पुन्हा जुन्या काळातील जगण्याचे महत्त्व वाढू लागले. त्यात घाण्याचे तेल हा एक नवा बदल. लाकडी घाण्यावरचे तेल विकत घेण्याच्या पर्यायाचा विचार सुरु झाला. लोकांची मागणी वाढल्याने हे घाणेही जागोजागी दिसू लागले.

चौकट

घाण्याचे तेल २९० रुपये लीटर

कोल्हापूर शहरात दोन ठिकाणी असे घाणे सुरु आहेत. येथे निघणाऱ्या तेलाचे प्रमाण कमी आहे, साहजिकच त्याचा दरही जास्त आहे. रिफाईन्ड तेल १६० ते १८० रुपये किलो मिळत असताना हे घाण्यावरचे तेल मात्र २९० रुपये लीटर आहे. जवळपास दुप्पट रक्कम असल्याने किती इच्छा असली तरी सर्वसामान्य नागरिक ते घेऊ शकत नाहीत. आजघडीला हेल्थ कॉन्शस आणि उच्चभ्रू समाजातील कुटुंबांकडून या तेलाला मागणी आहे. साधारणपणे एकूण खाद्यतेलाच्या मागणीपैकी याचा टक्का १० टक्के इतका अत्यल्प आहे.

चौकट

घाण्याचे तेल हे आरोग्यदायी आहे. यात तेलावर होणारी प्रक्रिया फारशी होत नाही. त्यामुळे याचा शरिरावर फारसा परिणाम होत नाही. हे तेल काढण्यासाठी पूर्वी बैलाचा वापर होत असे, आता त्याला इंजिनची जोड दिली असली तरी त्याचा वेग फारसा नसल्याने उत्पादन कमी निघते.

चौकट

रिफाईन्ड तेल घातक का?

रिफाईन्ड तेलावर फिजिकल, केमिकल अशी दोन प्रकारे प्रक्रिया केली जाते. बाजारात मिळणारे आघाडीचे ब्रॅण्ड हे केमिकल प्रक्रिया केलेलेच असतात. याउलट अलीकडे गरम पाण्याच्या वाफेद्वारे केली जाणारी फिजिकल ही प्रक्रिया मात्र आरोग्याच्या दृष्टीने रिफाईन्डच्या तुलनेत कमी प्रमाणात असल्याने ती शरिराला अपायकारक ठरत नाही.

प्रतिक्रिया

रिफाई्न्ड तेलावर केमिकल प्रक्रिया होत असल्याने याचा वापर शरिरासाठी घातक असतो. यात वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे शरिरातील चरबीचे प्रमाण वाढते. यामुळे रक्तात चरबीच्या गाठी होणे, स्थुलता येणे, हार्ट ॲटॅक आणि हार्ट स्ट्रोक बसणे असे आजार होतात. यामुळे रोजच्या आहारातील तेलाचे प्रमाण कायम नियंत्रणात राहील, असा प्रयत्न होणे गरजेचे आहे.

- डॉ. सुषमा उदय व्हटकर, मोरेवाडी

प्रतिक्रिया

आम्ही चार वर्षांपासून लाकडी घाणा चालवतो. याचे उत्पादन कमी असल्याने दरही जास्त आहेत. मोजकेच ग्राहक या तेलाची मागणी करतात. यापेक्षा केमिकल नसलेल्या तेलाचा पर्याय लोक जवळ करत आहेत.

- संदीप अथणे, खाद्यतेल व्यापारी व लाकडी घाणा चालक, शाहू मिल चौक