शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

ST Strike : ..'तर हे आंदोलन आणखी तीव्र करणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 18:43 IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनच सुरूच राहणार असल्याचे एसटी कर्मचारी संघर्ष युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले. शशांक राव आज, कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीस आले होते.

कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनच सुरूच राहणार असल्याचे एसटी कर्मचारी संघर्ष युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले. शशांक राव आज, कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीस आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी बोलताना शशांक राव म्हणाले, विलिनीकरण झाले नाही तर कामगारांचे रोजचे मरण आहे. आधीच एसटी कर्मचाऱ्यांना फार कमी पगार आहेत. त्यात आता पगार येईल की नाही याची शाश्वती नाही. नोकरी टिकण्याची शाश्वती नाही. कोवीड काळात एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेली सेवा सर्वांनी पाहिली आहे. मात्र सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे गार्भियाने पाहणार नसेल आणि सकारात्मक निर्णय घेणार नसेल तर हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. कोल्हापुरात देखील गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात हजारो एसटी कर्मचारी सहभागी आहेत. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मात्र, संपात सहभागी असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे.

दरम्यान मध्यवर्ती बसस्थानकात आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी शासनाला सुबुद्धी येऊ दे, आंदोलन संपून लालपरी रस्त्यावर धावू दे रे महाराजा... असे म्हणत एसटीलाच गाऱ्हाणे घातले. एसटीला हार घालून आरती केली. दरम्यान, पाचव्या दिवशीही कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरूच आहे. .दरम्यान, एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. तर दुसरीकडे खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांकडून जादा दर आकारला जात असून लुट सुरु आहे. अनेक प्रवाशी स्थानकात बसून आहेत. एकूणच बसस्थानकात कमालीचा शुकशुकाट जाणवत आहे. या आंदोलनामुळे एसटी महामंडळास मोठा तोटा होत आहे. 

टॅग्स :ST Strikeएसटी संप