शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

ST Strike : ..'तर हे आंदोलन आणखी तीव्र करणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 18:43 IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनच सुरूच राहणार असल्याचे एसटी कर्मचारी संघर्ष युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले. शशांक राव आज, कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीस आले होते.

कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनच सुरूच राहणार असल्याचे एसटी कर्मचारी संघर्ष युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले. शशांक राव आज, कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीस आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी बोलताना शशांक राव म्हणाले, विलिनीकरण झाले नाही तर कामगारांचे रोजचे मरण आहे. आधीच एसटी कर्मचाऱ्यांना फार कमी पगार आहेत. त्यात आता पगार येईल की नाही याची शाश्वती नाही. नोकरी टिकण्याची शाश्वती नाही. कोवीड काळात एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेली सेवा सर्वांनी पाहिली आहे. मात्र सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे गार्भियाने पाहणार नसेल आणि सकारात्मक निर्णय घेणार नसेल तर हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. कोल्हापुरात देखील गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात हजारो एसटी कर्मचारी सहभागी आहेत. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मात्र, संपात सहभागी असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे.

दरम्यान मध्यवर्ती बसस्थानकात आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी शासनाला सुबुद्धी येऊ दे, आंदोलन संपून लालपरी रस्त्यावर धावू दे रे महाराजा... असे म्हणत एसटीलाच गाऱ्हाणे घातले. एसटीला हार घालून आरती केली. दरम्यान, पाचव्या दिवशीही कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरूच आहे. .दरम्यान, एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. तर दुसरीकडे खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांकडून जादा दर आकारला जात असून लुट सुरु आहे. अनेक प्रवाशी स्थानकात बसून आहेत. एकूणच बसस्थानकात कमालीचा शुकशुकाट जाणवत आहे. या आंदोलनामुळे एसटी महामंडळास मोठा तोटा होत आहे. 

टॅग्स :ST Strikeएसटी संप