शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

एसटीने शहरे जोडली, गावे मात्र अद्यापही नकाशाबाहेरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर काहीअंशी ओसरल्यानंतर राज्यातील एसटी बसेस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आहेत. मात्र, याला कोल्हापूर ...

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर काहीअंशी ओसरल्यानंतर राज्यातील एसटी बसेस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आहेत. मात्र, याला कोल्हापूर जिल्हा अजूनही अपवाद ठरत आहे. ग्रामीण अंतर्गत भागात एसटी बसेस सुरू झालेली नाही. पर्यायाने या गावातून वडापचाच आधार प्रवाशांना घ्यावा लागत आहे.

राज्य शासनाने कोरोना संसर्गाच्या विविध स्तरानुसार ज्या त्या जिल्ह्याला एसटी बसेस त्या त्या क्षमतेनुसार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्याचा चार दिवसांपर्यंत चौथा स्तर होता. त्यानंतर सोमवार (दि. १९) पासून तिसरा स्तर आला. त्यामुळे काहीअंशी ग्रामीण अंतर्गत भागात एसटी बसेस सुरू आहेत. अद्यापही पूर्ण क्षमतेने या बसेस सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक गावांत एसटी बसेस सुरू न झाल्यामुळे वडापचाच आधार घ्यावा लागत आहे. प्रवाशांची मागणी आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधामुळे महामंडळाला या मार्गावर बसेस सुरू करता येईनात. जिल्ह्यातून सर्व तालुक्यांना तासा तासाला मुरगूड, गारगोटी, कागल, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, इचलकरंजी, जयसिंगपूर आदी भागांत बसेस धावत आहेत. यातील काही तालुक्यांच्या भागात एसटी बसेस काहीअंशी सुरू झाल्या आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे त्या पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना एसटी बसचा सुखकर प्रवास लाभत नाही. त्यामुळे नाइलाजाने का होईना तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी वडापचाच आधार घ्यावा लागत आहे.

आगारातील एकूण बसेस -७५०

सध्या सुरू असलेल्या बसेस - ४३०

कोरोनाआधी रोज होणाऱ्या फेऱ्या - ६००

सध्या सुरू असलेल्या फेऱ्या - ३००

कोरोना आधी दिवसाला २ लाख कि.मी. रोज बसेस धावत होत्या

सध्या किती. कि.मी. - ४० हजार

कोरोना आधी दिवसाचे उत्पन्न - सुमारे ७० लाख

कोरोनानंतरचे दिवसाचे उत्पन्न - ३५ लाख

खेडेगावावरच अन्याय का ?

वैद्यकीय उपचारासाठी तालुक्याच्या अथवा शहराच्या ठिकाणी यावे लागते. एसटी बसेस नसल्यामुळे आमच्या हालाला पारावर नाही. मोठ्या गावांच्या लोकसंख्या पाहून एसटी बसेस सुरू कराव्यात.

-विश्वजित पाटील, कागल

तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एक तर दुचाकीचा आधार घ्यावा लागतो. नाही तर गावातून खासगी वाहनाचा आधार. तालुक्याच्या ठिकाणच्या एसटी बसस्टँडपर्यंत वडापचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण अंतर्गत बसेस सुरू कराव्यात.

-विजय साळवी, गडहिंग्लज

कोट

ग्रामीण भागातून अजूनही एसटी बसेसना प्रतिसाद कमी आहे. जिल्हा प्रशासनाचे निर्बंध अजूनही लागू आहेत. जिल्ह्याचा संसर्ग आणि डेथ रेटही मोठा आहे. तालुक्यापर्यंत फेऱ्या सुरू असून काहीअंशी ग्रामीण भागातही फेऱ्या सुरू केल्या आहेत.

शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ, कोल्हापूर विभाग

काळ्या-पिवळीचाही आधार नाही

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एसटी बसेस अद्यापही पूर्ण क्षमतेने आंतर ग्रामीण भागात सुरू झालेल्या नाहीत. त्यात काळ्या पिवळ्या टॅक्सीलाही परवानगी नसल्याने त्यांचाही आधार या प्रवाशांना नाही. त्यामुळे मिळेल त्या खासगी वाहनाने खेडेगावातील मंडळी प्रवास करीत आहेत.