शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

एसटीने शहरे जोडली, गावे मात्र अद्यापही नकाशाबाहेरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर काहीअंशी ओसरल्यानंतर राज्यातील एसटी बसेस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आहेत. मात्र, याला कोल्हापूर ...

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर काहीअंशी ओसरल्यानंतर राज्यातील एसटी बसेस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आहेत. मात्र, याला कोल्हापूर जिल्हा अजूनही अपवाद ठरत आहे. ग्रामीण अंतर्गत भागात एसटी बसेस सुरू झालेली नाही. पर्यायाने या गावातून वडापचाच आधार प्रवाशांना घ्यावा लागत आहे.

राज्य शासनाने कोरोना संसर्गाच्या विविध स्तरानुसार ज्या त्या जिल्ह्याला एसटी बसेस त्या त्या क्षमतेनुसार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्याचा चार दिवसांपर्यंत चौथा स्तर होता. त्यानंतर सोमवार (दि. १९) पासून तिसरा स्तर आला. त्यामुळे काहीअंशी ग्रामीण अंतर्गत भागात एसटी बसेस सुरू आहेत. अद्यापही पूर्ण क्षमतेने या बसेस सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक गावांत एसटी बसेस सुरू न झाल्यामुळे वडापचाच आधार घ्यावा लागत आहे. प्रवाशांची मागणी आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधामुळे महामंडळाला या मार्गावर बसेस सुरू करता येईनात. जिल्ह्यातून सर्व तालुक्यांना तासा तासाला मुरगूड, गारगोटी, कागल, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, इचलकरंजी, जयसिंगपूर आदी भागांत बसेस धावत आहेत. यातील काही तालुक्यांच्या भागात एसटी बसेस काहीअंशी सुरू झाल्या आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे त्या पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना एसटी बसचा सुखकर प्रवास लाभत नाही. त्यामुळे नाइलाजाने का होईना तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी वडापचाच आधार घ्यावा लागत आहे.

आगारातील एकूण बसेस -७५०

सध्या सुरू असलेल्या बसेस - ४३०

कोरोनाआधी रोज होणाऱ्या फेऱ्या - ६००

सध्या सुरू असलेल्या फेऱ्या - ३००

कोरोना आधी दिवसाला २ लाख कि.मी. रोज बसेस धावत होत्या

सध्या किती. कि.मी. - ४० हजार

कोरोना आधी दिवसाचे उत्पन्न - सुमारे ७० लाख

कोरोनानंतरचे दिवसाचे उत्पन्न - ३५ लाख

खेडेगावावरच अन्याय का ?

वैद्यकीय उपचारासाठी तालुक्याच्या अथवा शहराच्या ठिकाणी यावे लागते. एसटी बसेस नसल्यामुळे आमच्या हालाला पारावर नाही. मोठ्या गावांच्या लोकसंख्या पाहून एसटी बसेस सुरू कराव्यात.

-विश्वजित पाटील, कागल

तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एक तर दुचाकीचा आधार घ्यावा लागतो. नाही तर गावातून खासगी वाहनाचा आधार. तालुक्याच्या ठिकाणच्या एसटी बसस्टँडपर्यंत वडापचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण अंतर्गत बसेस सुरू कराव्यात.

-विजय साळवी, गडहिंग्लज

कोट

ग्रामीण भागातून अजूनही एसटी बसेसना प्रतिसाद कमी आहे. जिल्हा प्रशासनाचे निर्बंध अजूनही लागू आहेत. जिल्ह्याचा संसर्ग आणि डेथ रेटही मोठा आहे. तालुक्यापर्यंत फेऱ्या सुरू असून काहीअंशी ग्रामीण भागातही फेऱ्या सुरू केल्या आहेत.

शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ, कोल्हापूर विभाग

काळ्या-पिवळीचाही आधार नाही

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एसटी बसेस अद्यापही पूर्ण क्षमतेने आंतर ग्रामीण भागात सुरू झालेल्या नाहीत. त्यात काळ्या पिवळ्या टॅक्सीलाही परवानगी नसल्याने त्यांचाही आधार या प्रवाशांना नाही. त्यामुळे मिळेल त्या खासगी वाहनाने खेडेगावातील मंडळी प्रवास करीत आहेत.