शहरं
Join us  
Trending Stories
1
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
2
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
3
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
4
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
5
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
6
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
7
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
8
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
9
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
10
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
11
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
12
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
13
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
14
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
15
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
16
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
17
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
18
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
19
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
20
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास गती

By admin | Updated: February 9, 2016 00:45 IST

प्रस्तावावरील धूळ झटकली : २५५ कोटींपैकी ७२ कोटी पुढील महिन्यात येणार; अंतिम मान्यतेसाठी टिप्पणी करणे सुरु

कोल्हापूर : देशभरातील लाखो भाविक श्रद्धेने ज्या देवीच्या चरणी लीन होतात, त्या अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामास गती मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेली अनेक वर्षे रखडलेल्या या विकास आराखड्यास मार्च महिन्याच्या अखेरीस मंजुरी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताच सरकारी यंत्रणाही सजग झाली आणि या प्रस्तावावरील धूळ झटकून सद्य:स्थितीची माहिती जमा करण्याचे काम मंत्रालय पातळीवर सुरू झाले. गेली तीन वर्षे १९० कोटींच्या अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम रेंगाळले होते. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालून अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन श्री क्षेत्र अंबाबाई मंदिर परिसर विकास प्रकल्पाचा २५५ कोटी खर्चाचा स्वतंत्र प्रारुप आराखडा तयार करून घेतला. त्याचे सादरीकरण झाले. त्यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या सूचनेनुसार तीन टप्पे करण्यात आले. दि. ७ मे २०१५ रोजी तो जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेनंतर राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. मंत्रालयातील नगरविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी आराखड्याची प्रस्तावना, निकड, बाबनिहाय कारणमीमांसा, एकाच टप्प्यात का कामे करणार? परिपूर्ण आराखडा का नाही आदी बाबींचे स्पष्टीकरण मागवून पुनश्च फेरप्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार ७ आॅगस्ट २०१५ रोजी फेरप्रस्ताव विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपालिका प्रशासन, पुणे यांना सादर करण्यात आला. सध्या हा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी कोल्हापुरात या प्रस्तावास मार्चअखेर मंजुरी देण्याची घोषणा करताच, सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे.प्रस्तावावरील धूळ झटकून कोणकोणती कामे त्यात समाविष्ट आहेत, याची माहिती घेणे तसेच राज्य सरकारच्या अंतिम मान्यतेसाठी टिप्पणी तयार करण्याच्या कामास सुरुवात केली. (प्रतिनिधी) अपेक्षा उंचावल्या ... कोल्हापूर शहरातील टोल रद्द करण्याचे आश्वासन भाजप-शिवसेनेने कोल्हापूरकरांना दिले होते. त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करुन अशक्य वाटणारी टोल रद्दची घोषणा प्रत्यक्षात उतरविली. आता अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यास मंजूरी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे भाजप - शिवसेना सरकारकडून कोल्हापूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. महानगरपालिकेत कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आणि राज्यात भाजप - सेनेची सत्ता आहे. त्यामुळे कोणीही प्रतिष्ठेचा विषय न करता केवळ अंबाबार्इंच्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आहे.