शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास गती

By admin | Updated: February 9, 2016 00:45 IST

प्रस्तावावरील धूळ झटकली : २५५ कोटींपैकी ७२ कोटी पुढील महिन्यात येणार; अंतिम मान्यतेसाठी टिप्पणी करणे सुरु

कोल्हापूर : देशभरातील लाखो भाविक श्रद्धेने ज्या देवीच्या चरणी लीन होतात, त्या अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामास गती मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेली अनेक वर्षे रखडलेल्या या विकास आराखड्यास मार्च महिन्याच्या अखेरीस मंजुरी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताच सरकारी यंत्रणाही सजग झाली आणि या प्रस्तावावरील धूळ झटकून सद्य:स्थितीची माहिती जमा करण्याचे काम मंत्रालय पातळीवर सुरू झाले. गेली तीन वर्षे १९० कोटींच्या अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम रेंगाळले होते. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालून अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन श्री क्षेत्र अंबाबाई मंदिर परिसर विकास प्रकल्पाचा २५५ कोटी खर्चाचा स्वतंत्र प्रारुप आराखडा तयार करून घेतला. त्याचे सादरीकरण झाले. त्यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या सूचनेनुसार तीन टप्पे करण्यात आले. दि. ७ मे २०१५ रोजी तो जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेनंतर राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. मंत्रालयातील नगरविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी आराखड्याची प्रस्तावना, निकड, बाबनिहाय कारणमीमांसा, एकाच टप्प्यात का कामे करणार? परिपूर्ण आराखडा का नाही आदी बाबींचे स्पष्टीकरण मागवून पुनश्च फेरप्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार ७ आॅगस्ट २०१५ रोजी फेरप्रस्ताव विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपालिका प्रशासन, पुणे यांना सादर करण्यात आला. सध्या हा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी कोल्हापुरात या प्रस्तावास मार्चअखेर मंजुरी देण्याची घोषणा करताच, सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे.प्रस्तावावरील धूळ झटकून कोणकोणती कामे त्यात समाविष्ट आहेत, याची माहिती घेणे तसेच राज्य सरकारच्या अंतिम मान्यतेसाठी टिप्पणी तयार करण्याच्या कामास सुरुवात केली. (प्रतिनिधी) अपेक्षा उंचावल्या ... कोल्हापूर शहरातील टोल रद्द करण्याचे आश्वासन भाजप-शिवसेनेने कोल्हापूरकरांना दिले होते. त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करुन अशक्य वाटणारी टोल रद्दची घोषणा प्रत्यक्षात उतरविली. आता अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यास मंजूरी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे भाजप - शिवसेना सरकारकडून कोल्हापूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. महानगरपालिकेत कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आणि राज्यात भाजप - सेनेची सत्ता आहे. त्यामुळे कोणीही प्रतिष्ठेचा विषय न करता केवळ अंबाबार्इंच्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आहे.