शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
5
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
6
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
7
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
8
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
9
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
10
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
11
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
12
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
13
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
14
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
15
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
16
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
17
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
18
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
19
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
20
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही

गणपूर्तीअभावी विशेष सभा रद्द

By admin | Updated: November 8, 2015 00:37 IST

इचलकरंजी नगरपालिका : काँग्रेस-शहर विकास आघाडीतील कुरघोडीचे राजकारण

इचलकरंजी : पुढील काळातील पाणीटंचाईच्या नियोजनार्थ आयोजित विशेष सभेकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस जांभळे गटाचे सदस्य न फिरकल्याने शनिवारी होणारी इचलकरंजी पालिकेची विशेष सभा गणपूर्तीअभावी रद्द झाली. जनतेच्या जिव्हाळ्याचे अत्यंत महत्त्वाचे विषय असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सभेला गैरहजर राहिले यासारखे दुर्दैव नाही असे सांगत शहर विकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध नोंदविला, तर महत्त्वाचे अनेक विषय असताना काहीतरी करीत असल्याचा आव आणून आघाडीकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. पुढे येणाऱ्या उन्हाळ्यात भासणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करणे या प्रमुख विषयासह अन्य ११ विषयांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी विशेष सभा आयोजित केली होती. मात्र, काँग्रेसच्या सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचे सांगत या बैठकीस कोणत्याही सदस्याने हजर न राहण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. तसा पक्षादेश (व्हिप) पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी सर्व सदस्यांना बजावला. त्यामुळे नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनीही पक्षादेशाचे नाइलाजास्तव पालन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील जांभळे गटाच्या सदस्यांना पक्षप्रतोद रवींद्र माने यांनी तोंडी व्हिप बजावला होता. शनिवारी सकाळी ११.१५ वाजता शहर विकास आघाडीचे १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस मदन कारंडे गटाचे तीन मिळून १९ सदस्य सभागृहात उपस्थित होते. अर्धा तास उलटल्यानंतर अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी गणपूर्तीअभावी ही विशेष सभा रद्द केली जात असल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी पक्षप्रतोद अजितमामा जाधव यांनी महत्त्वाचे विषय असतानाही संबंधित खात्याचे अनेक अधिकारी गैरहजर असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. (वार्ताहर) आघाडीकडून नाटकबाजी : सुनील पाटील काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न असतानाही आम्हाला विश्वासात न घेता विषयपत्रिका काढली गेली. आपण काहीतरी जनतेसाठी करतो असा आव आणत आघाडीकडून केवळ प्रसिद्धीसाठी नाटक केले जात आहे. आपल्या सोयीनुसार ते विषय घेत असल्यानेच सभा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यावेळी उपनगराध्यक्ष रणजित जाधव, बाळासाहेब कलागते, श्रीरंग खवरे, आदी उपस्थित होते. मला कोंडीत पकडण्याची खेळी : शुभांगी बिरंजे नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे म्हणाल्या, मी काँग्रेस पक्षाचीच नगराध्यक्षा असून, महत्त्वपूर्ण विषयांवरच सभा बोलविली होती, व्हिप लागू करून मला कोंडीत पकडण्याचा डाव केला जात आहे. व्हिप हे एकमात्र हत्यार त्यांच्याकडे आहे. चांगल्या कामात सहकार्याऐवजी मला अडचणीत आणण्याचा हा दुबळेपणा आहे. बिनबुडाचे आरोप होत असतील तर जशास तसे उत्तर देण्यास सज्ज असल्याचा इशाराही बिरंजे यांनी दिला. यासारखे दुर्दैव नाही : अजितमामा जाधव आरोग्य, पाणी, पालिका कर्मचारी, शिक्षण मंडळ शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश, पाणीटंचाई असे महत्त्वाचे विषय असतानाही काँग्रेस व राष्ट्रवादीतील सदस्य गैरहजर राहिले. केवळ व्हिप लागू केल्यामुळेच ही सभा रद्द झाल्याचे सांगून आघाडीचे पक्षप्रतोद अजितमामा जाधव म्हणाले, एकीकडे जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करीत दुसरीकडे त्यामध्ये अडथळे निर्माण केले जातात. याची प्रचिती यापूर्वीही अनेकदा आलेली आहे. कॉँग्रेस नेते प्रकाश आवाडे यांनी पाण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी सभा घेण्याची मागणी करण्याची सूचना आपल्या नगरसेवकांना केली होती. यावेळी तानाजी पोवार, मदन झोरे, विठ्ठल चोपडे, आदी उपस्थित होते.