शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विशेष बंदोबस्ताची आखणी

By admin | Updated: August 25, 2016 00:38 IST

पोलिसांची कठोर भूमिका : डॉल्बी लावणाऱ्यांवर तत्काळ कारवाई

एकनाथ पाटील -- कोल्हापूर --कोल्हापूरकरांचा नागरी उत्सव ठरणाऱ्या गणेशोत्सवातील बंदोबस्तासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. गतवर्षी डॉल्बी लावणार नाही, असे म्हणणारेच डॉल्बी लावून पुढे येतात. त्यामुळे यंदाच्या वर्षी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्याच्या सूचना पोलिस निरीक्षकांना दिल्या आहेत. उत्सवकाळात रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अनुचित प्रकार टाळण्यासाठी विशेष बंदोबस्ताची आखणी केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कोल्हापूर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे; त्यामुळे सणासुदीच्या काळात विशेषत: गणेशोत्सव व नवरात्रकाळात पोलिस अधिक दक्ष असतात. यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. कोल्हापूर शहरात गेल्या वर्षी बाराशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे होती, तर अडीच लाखांहून घरगुती गणपती होते. यंदा त्यामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या धर्तीवर पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी जिल्'ाचा आढावा घेतला. शहरातील प्रमुख मार्गांची ते स्वत: पाहणी करणार आहेत. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्याच्या सूचना त्यांनी निरीक्षकांना केल्या आहेत. गोपाळकाला व गणेशोत्सवात शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी संपूर्ण पोलिस दल रस्त्यांवर उतरणार असल्याचे पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी सांगितले. फेरीवालामुक्त परिसरगणेशोत्सवात मोठ्या संख्येने भाविक रस्त्यांवर उतरत असतात. प्रसिद्ध सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. अशा ठिकाणी पदपथावरील फेरीवाल्यांचा मोठा अडसर असतो. त्यासाठी पोलिसांनी फेरीवाला पथक तयार केले आहे. ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फेरीवाल्यांकडील पिपाणी आणि तत्सम वस्तूंबरोबरच रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनविणाऱ्या फेरीवाल्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. स्टोव्ह अथवा गॅसवर खाद्यपदार्थ बनविले जातात. त्यामुळे दुर्घटना घडू शकते. विशेष फेरीवाला पथक अशा वस्तू जप्त करून कारवाई करणार आहे. वाहतुकीस अडथळा होऊ नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत जमाव नियंत्रणात आणण्यासाठी गणेशोत्सव मंडळांचा परिसर फेरीवालामुक्त करण्यात येणार आहे. विशेष पथकांची नियुक्तीमहिला आणि बालकांच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. छेडछाडविरोधी पथक, मोबाईल चोरीविरोधी पथक, सोनसाखळी चोरीविरोधी पथक, आदी विशेष पथके यंदाही कार्यरत राहणार आहेत. पाच मुद्द्यांवर अधिक भर गणेशोत्सवाच्या बंदोबस्तामध्ये प्रामुख्याने जमाव नियंत्रण, कायदा आणि सुव्यवस्था, मिरवणुकीचे संरक्षण, रस्त्यावरील गुन्हे रोखणे, वाहतूक व्यवस्था सुरळीत राखणे या पाच मुद्द्यांवर अधिक भर दिला जातो. त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्ताची व्यूहरचना आखली आहे. विसर्जन मिरवणूक हा यामधील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. मिरवणुकीदरम्यान गणेशाची मूर्ती आपल्या स्थानावरून विसर्जन स्थळापर्यंत जाईपर्यंत विविध प्रकारचा बंदोबस्त असतो. यावेळी अनेक मार्ग बंद केले जाणार आहेत. तसेच अनेक मार्ग एकदिशा केले जाणार आहेत. ज्या मार्गावर विसर्जन मिरवणूक जाईल, तेथे अगदी सायकलीलासुद्धा पार्किंग करायला परवानगी नाकारली आहे. याबाबत नागरिकांना सतत ध्वनिक्षेपकामार्फत सूचना दिल्या जाणार आहेत. बाहेरील जिल्'ांतून काही प्रमाणात पोलिस बंदोबस्त मागवून घेतला जाणार आहे.