शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष समिती

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

प्रदीप देशपांडे : अत्याचार, अन्याय थांबविण्यासाठी उपाययोजना

कोल्हापूर : सार्वजनिक स्थळी, रस्त्यावर किंवा निर्जनस्थळी महिला, तरुणींच्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष समिती नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील काही स्थळांची विशेष पथकाने पाहणी केली आहे. चोवीस तास महिला व तरुणींच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन सक्रिय असणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मुंबईतील शक्ती मिल परिसरात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील महिला व तरुणींच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक स्थळी, रस्त्यावर किंवा निर्जनस्थळ परिसरात योग्य ती उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. कोल्हापूर शहर व जिल्ह्यात छेडछाडीच्या प्रकारांमुळे महिला व तरुणींना घरातून बाहेर पडणे मुश्कील बनले आहे. शहरात भाजीपाला खरेदीसाठी, देवदर्शनासह अन्य कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दोगिने चेनस्नॅचरकडून राजरोस लुटण्याचे प्रकार घडत आहेत. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर छेडछाडीच्या प्रकारांमुळे महिला व तरुणींची मानसिकता खचत असून, त्यांच्या कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. अशा गंभीर घटनांमुळे महिला व तरुणींचे जीवन असुरक्षित बनले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना तत्काळ जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन समिती नियुक्त करून उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या. या समितीचे अध्यक्ष पोलिस अधीक्षक देशपांडे आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, महावितरणचे अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचा समितीमध्ये समावेश आहे. सोमवारी (दि. १४) समितीची सुरक्षेसंदर्भात पोलिस मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीच्या अनुषंगाने पत्रकारांनी पोलिस अधीक्षक देशपांडे यांच्याकडे विचारपूस केली असता ते म्हणाले, महिलांच्या सुरक्षेसाठी समितीची स्थापना केली आहे. मुख्यालयातील महिला दक्षता समितीच्या वतीने शहरातील मैदाने, उद्याने, शाळा-कॉलेज, पर्यटनस्थळांची पाहणी करून अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, विजेची सोय, आदी सुविधा बसविण्यात येणार आहेत. समाजातील वाईट मनोवृत्तीच्या व्यक्तींकडून स्त्रियांवर होणारे अत्याचार व अन्याय थांबविण्यासाठी उपाययोजना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या स्थळांची निवड एनसीसी भवन परिसर, शिवाजी विद्यापीठ परिसर, राजाराम तलाव, आरकेनगर, केआयटी कॉलेजकडे जाणारा रस्ता व भारती विद्यापीठ परिसर, तपोवन मैदान, कोल्हापूर विमानतळ परिसर, कात्यायनी परिसर, सासने मैदान, रंकाळा परिसर, गांधी मैदान.