शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित कामगारांवर विशेष लक्ष

By admin | Updated: January 3, 2015 00:12 IST

‘ईएलएम’ कार्यक्रम : राष्ट्रीय एडस् नियंत्रण संस्थेचा उपक्रम; जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येत घट

गणेश शिंदे : कोल्हापूर जिल्ह्यातील एडस्च्या रुग्णांचा टक्का गेल्या काही वर्षांमध्ये घटू लागला आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून होणारी जनजागृती कारणीभूत ठरली आहे. आता जिल्ह्याची ‘एडस्’च्या विळख्यातून मुक्तता करण्यासाठी राष्ट्रीय एडस् नियंत्रण संस्था, लक्ष्यगट हस्तक्षेप प्रकल्पांतर्गत ‘ईएलएम’ (इम्प्लॉयर लीड मॉडेल) हा कार्यक्रम राबविणार आहे. या माध्यमातून स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.२०१० पासून लक्ष्यगट हस्तक्षेप प्रकल्प राबविण्यात येत आहे. गतवर्षी ऊसतोड मजुरांसाठी हा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला होता. यावर्षी स्थलांतरित कामगार व ट्रकचालकांसाठी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सामाजिक बांधीलकी म्हणून यासाठी जिल्ह्यातील उद्योजक, विविध कंपन्यांंनी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र एडस् नियंत्रण संस्थेने केले आहे. राज्यात औरंगाबाद, सातारा, रायगड, नाशिक, बुलढाणा व चंद्रपूर या जिल्ह्यांत ‘ईएलएम’हा कार्यक्रम सुरू झाला आहे. येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात जिल्हा एडस् नियंत्रण कार्यालय आहे. ‘ईएलएम’साठी सध्या लोटस हॉस्पिटल, मुस्लिम समाज प्रबोधन संस्था व युवा विकास या संस्था विविध ठिकाणी काम करीत आहेत. त्याचबरोबर शिरोळ मोटार मालक संघ मदत करणार आहे. यासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकरसह सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत.स्थानिक कंपन्यांचा सहभाग आवश्यकजिल्ह्यात शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकितसह इचलकरंजीतील खंजिरे औद्योगिक वसाहत, इचलकरंजी इस्टेट, त्याचबरोबर जयसिंगपूरमधील औद्योगिक वसाहत, आदी वसाहतींमध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये कामगारांना देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधेचा वापर करून ‘ईएलएम’ हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.कोल्हापूर जिल्ह्याचा औद्योगिक, शैक्षणिक विकास झपाट्याने होत आहे. जिल्ह्यात बांधकाम वेगाने वाढत आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रांत कुशल, अकुशल कामगारांची मागणी आहे. उसाच्या गळीत हंगामाच्या काळात बीड, लातूर, उस्मानाबाद, आदी जिल्ह्यांमधून मोठ्यासंख्येने ऊसतोड मजूर जिल्ह्यात स्थलांतरित होतात. सध्या विविध कारणांनी जिल्ह्यात स्थलांतरित झालेल्या कामगारांची संख्या सुमारे दीडलाख आहे. त्यांपैकी सुमारे ५० हजारांवर या कार्यक्रमांतर्गत लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे.शुन्य गाठायचे आहे...एडस्च्या प्रसारात जे काही प्रमुख घटक कारणीभूत आहेत, त्यांपैकी सर्वांत महत्त्वाचा घटक स्थलांतरित कामगार असल्याचा निष्कर्ष केंद्र, राज्य तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांच्या अभ्यासातून पुढे आला आहे. त्यामुळेच एडस्चा फैलाव रोखण्यासाठी स्थलांतरित कामगारांचे प्रबोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे.जिल्ह्यात दहा हजार ट्रकचालकदळणवळणाच्या माध्यमातून जिल्ह्यात दहा ते पंधरा हजार ट्रकचालक ये-जा करतात. एडस्च्या संक्रमणामध्ये ट्रकचालक हादेखील एक महत्त्वाचा घटक असल्याचे विविध अभ्यासांतून पुढे आले आहे. एडस्चा धोका टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याची माहिती किंवा चुकीच्या माहितीमुळे अनेक ट्रकचालक एडस्ची शिकार झाले आहेत. यामुळे ट्रकचालकांमुळे जनजागृती करण्यात येणार आहे. सुमारे पाच हजार ट्रकचालकांवर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे.‘शून्य गाठायचे आहे’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘ईएलएम’ हा कार्यक्रम राबविणार आहे. काही कंपन्यांनी याला सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. त्यामुळे या महिन्यात कार्यक्रमास सुरुवात होईल.- जगदीश पाटील, प्रादेशिक कार्यक्रम अधिकारी, राज्य एडस् नियंत्रण संस्था