शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘भू-विकास’साठी मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणे

By admin | Updated: March 26, 2015 00:27 IST

मुंबईत बैठक : मंत्रिमंडळ उपसमितीच्या अहवालानंतर ठोस निर्णयाचे आश्वासन

सांगली : आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या राज्यातील भू-विकास बँकांच्या प्रश्नावर भाजप सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्य सहकारी भू-विकास बँक कर्मचारी संघटनेने मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. बँकांची आर्थिक वस्तुस्थिती व अधिकाऱ्यांकडून सुरू असलेला चुकीच्या आकडेवारीचा खेळ याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले. राज्यातील भू-विकास बँकांच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी लटकला आहे. भू-विकास बँकांच्या आर्थिक स्थितीचा व त्यावरील निष्कर्षांचा अहवाल चार्टर्ड अकाऊंटंट डी. ए. चौगुले समितीने तत्कालीन आघाडी शासनाकडे सादर केला होता. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही आघाडी सरकारला याबाबत निर्णय घेता आला नाही. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भू-विकास कर्मचारी संघटनेने नव्या सरकारदरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. या प्रश्नाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती नियुक्त झाली असून, उपसमितीच्या अनेक बैठकाही झाल्या आहेत. लवकरच हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली. संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील व शिष्टमंडळाने गाऱ्हाणे मांडले. आघाडी सरकारच्या कालावधीत या प्रश्नावर फडणवीस व तत्कालीन भाजप आमदारांनी संघटनांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला होता. या गोष्टीची आठवण पदाधिकाऱ्यांनी करून दिली. त्यामुळे भाजपने या बँकांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्मचारी संघटनेशी चर्चा करून याबाबत योग्य सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याची माहिती एम. पी. पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)चौगले समितीच्या शिफारसी अभ्यासाव्यातभू-विकास बँका आणि शासन यांच्यातील येण्या-देण्याबाबत सहकार विभागातील अधिकारी दिशाभूल करीत आहेत. चुकीची आकडेवारी समोर आल्यानंतर शासनाचा बँकांबाबत नकारात्मक विचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौगुले समितीच्या शिफारसींचा अभ्यास करून निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.