शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

दक्षिण महाराष्ट्राचा‘यूपीएससी’त झेंडा!

By admin | Updated: July 5, 2015 01:21 IST

आठजणांची बाजी : कोल्हापूर जिल्ह्यातील दोघे

कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल शनिवारी जाहीर झाला असून, यंदाही महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला आहे. सुमारे शंभर जणांनी या परीक्षेत यश मिळविले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील आठजणांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. या मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोघे, सांगली जिल्ह्यातील दोघे व सातारा जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कूर (ता. भुदरगड) येथील कुलदीप शिवाजी कुंभार यांनी या परीक्षेत ८६७ वे स्थान पटकावले. ते शेतकऱ्याचे सुपुत्र आहेत, तर सरूडचा अजित बाळासो कुंभार २९२ क्रमांकाने या परीक्षेत यशस्वी झाला आहे. या दोघांच्या यशाने भुदरगड आणि शाहूवाडी परिसरामध्ये चैतन्याचे वातावरण आहे. कारदग्याचा अभिजित शेवाळे ९० वा कोल्हापूर येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील राहुल काशीनाथ कर्डिले आणि प्रशांत बाळासाहेब गांधले यांनी अनुक्रमे ४२२ व ७८१ वे स्थान पटकावले. राहुल कर्डिले हे सध्या दुय्यम उपनिबंधक - वर्ग १ या पदावर कार्यरत आहेत; तर प्रशांत बाळासाहेब गांधले हे गटविकास अधिकारी वर्ग - २ या पदावर कार्यरत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील कारदगा येथील अभिजित शेवाळे यांनी ९० वे स्थान पटकावले आहे. शेवाळे सध्या नागपूर येथे सहायक आयकर आयुक्त पदावर काम करीत आहेत. सांगली : इस्लामपुरातील सुमित सुनील गरुड आणि शिराळ्यातील प्रवीण सुरेश नलवडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सांगली जिल्ह्याचा झेंडा फडकावला. सुमित गरुडने नागरी सेवा परीक्षेत देशात १६९ वा क्रमांक, तर प्रवीण नलवडे याने देशात ६४९ वा क्रमांक मिळवला. सुमितची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली आहे. इस्लामपूरच्या महादेवनगर परिसरातील सुमित शहरातून देशपातळीवरील परीक्षेत यश मिळवणारा पहिला विद्यार्थी ठरला. शिराळा येथील प्रवीण नलवडे याचे वडील डॉ. सुरेश नलवडे यांचा शिराळा बसस्थानक परिसरात वैद्यकीय व्यवसाय आहे. दुष्काळी मातीत ‘माणिक-मोती’ सातारा : ‘माण म्हणजे बुद्धिवंतांची खाण’ म्हटलं जाते, हे शनिवारी पुन्हा अधोरेखित झाले आहे. माण तालुक्यातील वडगाव येथील डॉ. सचिन ओंबासे याने गुणवत्ता यादीत १६४ वा, फलटण तालुक्यातील सुरवडी येथील तुषार मोहिते याने गुणवत्ता यादीत ४७०, तर वीरकरवाडी (ता. माण) येथील विक्रम वीरकर याने गुणवत्ता यादीत ८९२ वा तर शिंगणापूर येथील प्रसाद सुभाष मेनकुदळे याने १,०८५ वा क्रमांक मिळविला आहे. त्यांच्या यशाची बातमी समजताच सर्वांच्या गावात फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.