शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

दक्षिण महाराष्ट्राचा‘यूपीएससी’त झेंडा!

By admin | Updated: July 5, 2015 01:21 IST

आठजणांची बाजी : कोल्हापूर जिल्ह्यातील दोघे

कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल शनिवारी जाहीर झाला असून, यंदाही महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला आहे. सुमारे शंभर जणांनी या परीक्षेत यश मिळविले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील आठजणांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. या मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोघे, सांगली जिल्ह्यातील दोघे व सातारा जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कूर (ता. भुदरगड) येथील कुलदीप शिवाजी कुंभार यांनी या परीक्षेत ८६७ वे स्थान पटकावले. ते शेतकऱ्याचे सुपुत्र आहेत, तर सरूडचा अजित बाळासो कुंभार २९२ क्रमांकाने या परीक्षेत यशस्वी झाला आहे. या दोघांच्या यशाने भुदरगड आणि शाहूवाडी परिसरामध्ये चैतन्याचे वातावरण आहे. कारदग्याचा अभिजित शेवाळे ९० वा कोल्हापूर येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील राहुल काशीनाथ कर्डिले आणि प्रशांत बाळासाहेब गांधले यांनी अनुक्रमे ४२२ व ७८१ वे स्थान पटकावले. राहुल कर्डिले हे सध्या दुय्यम उपनिबंधक - वर्ग १ या पदावर कार्यरत आहेत; तर प्रशांत बाळासाहेब गांधले हे गटविकास अधिकारी वर्ग - २ या पदावर कार्यरत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील कारदगा येथील अभिजित शेवाळे यांनी ९० वे स्थान पटकावले आहे. शेवाळे सध्या नागपूर येथे सहायक आयकर आयुक्त पदावर काम करीत आहेत. सांगली : इस्लामपुरातील सुमित सुनील गरुड आणि शिराळ्यातील प्रवीण सुरेश नलवडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सांगली जिल्ह्याचा झेंडा फडकावला. सुमित गरुडने नागरी सेवा परीक्षेत देशात १६९ वा क्रमांक, तर प्रवीण नलवडे याने देशात ६४९ वा क्रमांक मिळवला. सुमितची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली आहे. इस्लामपूरच्या महादेवनगर परिसरातील सुमित शहरातून देशपातळीवरील परीक्षेत यश मिळवणारा पहिला विद्यार्थी ठरला. शिराळा येथील प्रवीण नलवडे याचे वडील डॉ. सुरेश नलवडे यांचा शिराळा बसस्थानक परिसरात वैद्यकीय व्यवसाय आहे. दुष्काळी मातीत ‘माणिक-मोती’ सातारा : ‘माण म्हणजे बुद्धिवंतांची खाण’ म्हटलं जाते, हे शनिवारी पुन्हा अधोरेखित झाले आहे. माण तालुक्यातील वडगाव येथील डॉ. सचिन ओंबासे याने गुणवत्ता यादीत १६४ वा, फलटण तालुक्यातील सुरवडी येथील तुषार मोहिते याने गुणवत्ता यादीत ४७०, तर वीरकरवाडी (ता. माण) येथील विक्रम वीरकर याने गुणवत्ता यादीत ८९२ वा तर शिंगणापूर येथील प्रसाद सुभाष मेनकुदळे याने १,०८५ वा क्रमांक मिळविला आहे. त्यांच्या यशाची बातमी समजताच सर्वांच्या गावात फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.