शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

कोल्हापूर दक्षिण व चंदगडची अदलाबदल शक्य

By admin | Updated: July 19, 2014 00:21 IST

दोन्ही पक्षांतील कुरघोडीचे राजकारण

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर कोल्हापूर दक्षिण व चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीत अदलाबदल करण्यात येणार असल्याच्या हालचाली आहेत, असा निर्णय लोकसभा निवडणुकीवेळीच शिवसेना व भाजपमध्ये झाला होता व त्यास भाजपच्या नेत्यांनी संमती दिल्याचे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे, अशी अदलाबदल करण्यात या दोन्ही पक्षांतील कुरघोडीचे राजकारणही कारणीभूत आहे. सध्या कोल्हापुरातील दहापैकी आठ जागा शिवसेनेकडे, तर इचलकरंजी व कोल्हापूर दक्षिण या दोन जागा भाजपकडे आहेत. प्रदेश भाजपने लोकसभा निवडणुकीतील यशानंतर जागा वाढवून देण्याचा आग्रह धरला आहे; परंतु त्यास शिवसेना तयार नाही. महायुतीत या दोन पक्षांशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना,राष्ट्रीय समाज पक्ष व रिपब्लिकन (आठवले गट) पक्षही सहभागी आहेत. जिल्ह्यात आठवले गटाची ताकद आहे; परंतु हातकणंगले विधानसभा या राखीव मतदारसंघातून शिवसेनेचे सुजित मिणचेकर आमदार असल्याने पुन्हा या पक्षाला जागा दिली जाण्याची शक्यता नाही. मध्यंतरी दुर्वास कदम यांनी वाढदिवसाचे शहरभर फलक लावून शक्तिप्रदर्शन केले. त्यामागे दक्षिणमधील उमेदवारीचे राजकारण होते. शिवसेना-भाजपशिवाय महायुतीत ‘स्वाभिमानी’ हा प्रबळ घटक पक्ष आहे. या पक्षाने किमान पाच जागांची मागणी केली आहे; परंतु ‘स्वाभिमानी’ला कुणाच्या कोट्यातील जागा द्यायच्या, हा खरा वादाचा मुद्दा बनत आहे. त्यामुळे शिवसेना व भाजप प्रत्येकी एक जागा ‘स्वाभिमानी’साठी सोडण्याच्या विचारात आहेत. त्यातील ‘शिरोळ’ शिवसेना सोडणार आहे. भाजपकडे दोनच मतदारसंघ आहेत. त्यातील ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये ‘स्वाभिमानी’ची ताकद नाही. त्यामुळे चंदगडची जागा शिवसेनेने भाजपला द्यायची व त्याबदल्यात भाजपने कोल्हापूर दक्षिणची जागा शिवसेनेला द्यायची, असा हा अदलाबदलीचा प्रस्ताव आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याची एक चंदगडची जागा स्वाभिमानीसाठी सोडता येऊ शकेल, असे त्यामागील गणित आहे. या हालचाली ज्यांना मान्य नाहीत त्याच नेत्यांनी ‘कोल्हापूर उत्तर’वर दावा करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. अडचणीच जास्त... ही जागा जरी भाजपने सोडली, तरी दोनच जागांवर स्वाभिमानी तयार होण्याची शक्यता नाही. शिरोळ, राधानगरी व चंदगड या तीन मतदारसंघांत ‘स्वाभिमानी’ची चांगली ताकद आहे. राधानगरी मतदारसंघात जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी करूनच टाकली आहे. त्याशिवाय स्वाभिमानीला शाहूवाडी हादेखील मतदारसंघ अथवा आम्ही म्हणतो तोच उमेदवार, असा खासदार राजू शेट्टी यांचा आग्रह आहे. ‘स्वाभिमानी’...बद्दल स्वाभिमानी हा पक्ष भाजपच्या कोट्यातील आहे. त्यामुळे भाजपनेच त्यांना जागा सोडाव्यात, असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. लोकसभेत संघटनेची मदत न झाल्यामुळेच संजय मंडलिक यांचा पराभव झाला, असे शिवसेनेच्या नेत्यांनी वरिष्ठ नेतृत्वाला कळविले आहे, तर शिवसेनेतील लाथाळ्यांमुळेच मंडलिक पराभूत झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. शिवसेना अशी कोंडी करण्याची चिन्हे दिसल्यानेच ‘स्वाभिमानी’नेही स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.