शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

चांगला सूर गवसण्यात वेगळीच धुंदी

By admin | Updated: January 13, 2016 01:12 IST

सलील कुलकर्णी : सी. जी. कु लकर्णी वाङ्मय मंडळाच्या व्याख्यानमालेत प्रकट मुलाखत; श्रोत्यांची अलोट गर्दी

कोल्हापूर : ‘एखादं गाणं, कविता सूचणे ही प्रक्रिया फार आनंददायी असते. चांगला सूर गवसण्यात धुंदी असते. त्यामुळे मिळणारे समाधान अध्यात्मातील समाधानाइतकेच श्रेष्ठ असते’ अशा शब्दांत ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या गीताचे लेखक, संगीतकार, गायक, डॉ. सलील कुलकर्णी यांनी आपल्या जीवनातील संगीताचे महत्त्व विशद केले.येथील न्यू एज्युकेशन सोसायटी, संचलित सी. जी. कुलकर्णी वाङ्मय मंडळा व्याख्यानमालेत संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत मंगळवारी राम गणेश गडकरी सभागृहात आयोजित करण्यात आली. तेव्हा त्यांनी श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधला. विक्रांत देशमुख यांनी त्यांना बोलते केले. यावेळी सभागृह खचाखच भरले होते. डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘संगीत, लिखाण, गायन ही समर्पणाची गोष्ट असते. स्वत:ला सिध्द करायला जाऊ नये, शक्य तितके चांगले करण्याचा प्रयत्न करावा. एखादे गाणे, भावगीत, कविता सुचण्याचे क्लासेस नसतात. त्यासाठी प्रतिभा असणे गरजेचे असते आणि प्रतिभा उत्सुकतेपोटी अधिक बहरत जाते. उत्सुकता संपली की नवीन काही सूचण्याची प्रक्रिया संपते. सुचण्याची प्रक्रिया ही त्या कलाकाराची स्वत:च्या मालकीची असते. ती त्याच्याकडून कोणी काढून घेऊ शकत नाही. जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करावी वाटते तेव्हा के ली की ती जास्त चांगली बनते. ’बालक-पालक संबंधावर बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, आपण मुलांच्या मनात भीती निर्माण करण्यास जबाबदार असतो. त्याला अंधाराची भीती घालतो. त्याने चिखलमातीत खेळू नये म्हणून महागडी खेळणी आणून देतो. आपण त्यांच्यासाठी देश, राज्य, धर्म, जातीच्या सीमा आखतो आणि त्यांना संकुचित बनवतो. प्रत्येकवेळी आपण त्यांना देत राहतो. त्यांनाही काही नवीन गोष्टी सांगायच्या असतात, त्यादेखील ऐकून घ्यायला हव्यात. मुलांकडून जास्त अपेक्षा न ठेवता त्यांना मुलांसारखं मोठं होऊ द्यावं, नाहीतर ती कोमेजतात.यावेळी सी. जी. कुलकर्णी गीतगायन, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहा फडणीस यांनी केले. प्रास्ताविक चित्रा कशाळकर यांनी केले. यावेळी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष नितीन वाडीकर, उपाध्यक्ष एस. के. कुलकर्णी, मदनमोहन सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, पद्माकर सप्रे, आदी उपस्थित होते. कविता सादरमुलाखतीवेळी संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी कवी ग्रेस, आरती प्रभू, बा. भ. बोरकर, शांता शेळके, अरुणा ढेरे यांच्या कवितेतील काही ओळी सादर केल्या. उपस्थित रसिकांनी यावेळी टाळ्यांच्या कडकडाटात कवितांना दाद दिली.