शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

स्टेजवरून पडून मुलाचा मृत्यू

By admin | Updated: May 4, 2017 23:14 IST

बीड : तालुक्यातील पारगाव जप्ती येथे लग्नाच्या स्टेजवरून पडल्याने एका मुलाचा मृत्यू झाला.

शिवाजी सावंत -- गारगोटी -लोटेवाडी (ता. भुदरगड) येथील पिण्याचा पाणीप्रश्न गेल्या ३० वर्षांपासून गंभीर बनत आहे. पाण्यासाठी लाखो रुपयांच्या नळपाणी योजनांसाठी निधी खर्च करूनही ग्रामस्थांना एकवेळही पाणी मिळत नाही. तहानलेल्या लोटेवाडीच्या पाणीप्रश्नी शासनला पाझर फुटणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनाने टंचाईग्रस्त व जलयुक्त शिवार योजनेत लोटेवाडीचा समावेश केला आहे. याबाबत प्रशासनाकडून पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा, याकरिता उपाययोजना आखली जात आहे. मिणचे खुर्दपासून पुढील लोटेवाडी गावापर्यंत जलयुक्त शिवार योजनेतून काळम्मावाडी धरणाच्या कालव्याचे पाणी सायफनने मिळाल्यास गावची शेती सुजलाम्, सुफलाम् होईल. या कालव्याचे अंतर फक्त दीड कि.मी. आहे. लोकसहभाग व महाराष्ट्र शासन यांच्या पुढाकाराने हा प्रश्न निकाली निघू शकतो. कालव्याचे पाणीच तारणहार असून, तहानलेल्या लोटेवाडीला आता हा एकच पर्याय उरला आहे. शासनाने मिणचे खुर्द ते लोटेवाडी गावापर्यंतच्या कालव्याला पाणी योजनेसाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी लोटेवाडी ग्रामस्थांकडून होत आहे . लोटेवाडी येथे सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. गावाला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी शासनाने पाणीपुरवठा योजनांवर लाखो रुपये खर्च करूनही लोटेवाडी (ता. भुदरगड) गावाला गेली अनेक वर्षे घागरभर पाण्यासाठी महिलांसह आबालवृद्धांना वणवण भटकावे लागत आहे.भुदरगड तालुक्यातील लोटेवाडी हे १४०० लोकवस्तीचे गाव. या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी शासनाने आतापर्यंत तीन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या, पण त्या कुचकामी ठरल्या आहते. यानंतर सन १९९२-९४ मध्ये बसुदेव धनगरवाड्याजवळील जंगलातून ओढ्यावरील झऱ्याच्या उगमावर पाण्याची टाकी बांधून तीन किलोमीटर अंतरावरून सायफन पद्धतीने डोंगर उतारावरून पाणी आणण्यात आले. झऱ्याच्या पाण्याला पाझर आहे तोपर्यंतच पाणीपुरवठा होत होता. पाण्याचा नैसर्गिक स्रोत कमी होऊन ही योजना कुचकामी ठरली. गावामध्ये दोन हातपंप आहेत; पण पाणीपातळी खालावल्यामुळे एक घागर पाण्यासाठी दीर्घ वेळ थांबावे लागते. यासाठी अनेक महिला घागरी घेऊन पहाटेपासूनच रांगेत असतात. २०१२ साली राष्ट्रीय पेयजल योजनेतून २८ लाख ६० हजार रुपये खर्चाची नवीन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. मिणचे खुर्द व मोरेवाडी दरम्यानच्या मोरओव्हळ या ओढ्यावर जलकुंभ बांधण्यात आला; पण ओढ्यालाच पाणी नसल्याने जलपातळी खालावून या योजनेतूनही पाणीपुरवठा होत नाही. गावासाठी तीन-तीन नळ पाणीपुरवठा योजना राबविल्या तरीही गेली कित्येक वर्षे गावास तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या होत्या; पण यावर ठोस उपाययोजना झाली नाही. घर बांधकाम, लग्न समारंभ, यात्रा, जत्रा यासाठी टँकरने पाणी विकत आणावे लागते. पाण्याच्या ओढाताणीमुळे महिला वर्ग व गावकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे शासनानेच लोटेवाडीच्या पाणीटंचाईवर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.छोटे गाव; पण राजकारणाचा अड्डा गावात गटा-तटाचे राजकारण होते. गावच्या विकासकार्यातही गटाचे राजकारण आडवे येते. पुढारीच लोटेवाडीच्या विकासकार्याला खीळ घालत आहेत. वर्षानुवर्षे न सुटलेले प्रश्न आमदार, खासदार, मंत्री किंवा अधिकारी यांना निवेदन देऊनही सोडविले जाऊ शकतात; पण भेटणार कोण? तर ग्रामपंचायतही यासाठी पुढाकारही घेत नाही. आम्ही निवडून देऊन काय उपयोग? असा सवालही त्रस्त ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.