शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संशयित आरोपीच्या घरावर सोनाळीकरांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:29 IST

मुरगूड : सोनाळी, ता.कागल येथील निष्पाप वरद पाटील या बालकाच्या खूनप्रकरणी अटकेत असणाऱ्या मारुती ऊर्फ दत्तात्रय तुकाराम वैद्य याच्या ...

मुरगूड : सोनाळी, ता.कागल येथील निष्पाप वरद पाटील या बालकाच्या खूनप्रकरणी अटकेत असणाऱ्या मारुती ऊर्फ दत्तात्रय तुकाराम वैद्य याच्या संपूर्ण कुटुंबीयांवर सोनाळीकरांनी बहिष्कार टाकला आहे. यातून आज वैद्य याच्या घरातील पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन ग्रामपंचायत प्रशासनाने तोडले आहे. या कुटुंबाला कोणी कसलीच मदत करायची नाही, असा निर्णय सोमवारी ग्रामस्थांनी घेतला.

सोनाळी सावर्डे बु. येथील सुमारे दोन हजारांहून अधिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत शोकाकुल व तणावपूर्ण वातावरणात रक्षा विसर्जन विधी करण्यात आला. या ठिकाणी झालेल्या शोकसभेत अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

वरद पाटीलचे दि.१७ रोजी दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य याने अपहरण करून अमानुषपणे त्याचा खून केला. गेले पाच दिवस सोनाळी व आजोळ सावर्डे बु. येथे मारुती वैद्यविरुद्ध तीव्र संतापाची लाट पसरली होती. या गुन्ह्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेऊन तपासासाठी विशेष पथक नेमले आहे.

सोमवारी रक्षा विसर्जन विधी झाल्यानंतर स्मशानभूमीत शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी सत्यजित पाटील, पी .व्ही पाटील, संभाजी कुलकर्णी, साताप्पा कांबळे, सुदाम कांबळे, राहुल पाटील आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या. या सभेत वैद्य कुटुंबीयाला गावातील कोणीही कसलीच मदत करायची नाही, जर कोणी केली तर त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल अशा संतप्त भावना व्यक्त केल्या. डीवायएसपी आर. आर. पाटील, सपोनि विकास बडवे, पीएसआय कुमार ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मुक्या जनावरांना दिले पाहुण्यांच्या ताब्यात

वरद खूनप्रकरणी अटक केलेला आरोपी मारुती वैद्य याचे कुटुंबीय घटना उघडकीस आल्यापासून गाव सोडून गेले आहे. वैद्य याच्या घरात दहा ते पंधरा जनावरे आहेत. त्याच्या वैरणीचा आणि पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. गावाने या कुटुंबाला कोणतीच मदत करायची नाही असे ठरविल्याने जनावरांना कोणीही चारा टाकण्यासाठी गेले नाही. सोमवारी गावातील प्रमुखांनी शेवटी मुक्या जनावरांचा यात काय दोष म्हणून ती सर्व जनावरे वैद्य याच्या पाहुण्याकडे पोहोचविली.

पोलिसांनी केले आवाहन

वरदच्या खुनाचा नि:पक्षपातीपणे तपास करण्याचा प्रयत्न पोलीस खाते करीत आहे. यासाठी दहा विशेष पथकांतून पन्नास अधिकारी, कर्मचारी वेगवेगळ्या मुद्यावर माहिती संकलित करीत आहेत. सोमवारी मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये परिसरातील सर्व गावांतील सरपंचांची बैठक पार पडली. यामध्ये सपोनि विकास बडवे यांनी सर्व गावामध्ये शांतता ठेवावी, शक्यतो असे मोर्चे आंदोलन करू नये, असे आवाहन केले.

तपासाची आगळीवेगळी पद्धत

वातावरण तणावपूर्ण बनल्याने आणि वरदच्या कुटुंबींयांना तपासासाठी पोलीस वारंवार बोलावीत असल्याचा आरोप काहींनी केल्याने पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून सोनाळी हे गाव तपासाचे केंद्र बनविले आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयात वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. शिवाय सोनाळी आणि सावर्डे बुद्रुक गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयात तपास वहीच ठेवली आहे. जर कोणत्याही ग्रामस्थास पोलिसांसमोर येऊन बोलण्यास अडचण वाटत असेल तर त्यांनी आपली माहिती या वहीत लिहावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सर्वांना विश्वासात घेऊन पोलिसांनी तपासकार्य सुरू ठेवल्याने तणावपूर्ण वातावरण निवळण्यास मदत होत आहे.