शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा
4
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
5
अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्...
6
स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?
7
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
8
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
9
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
10
Deep Amavasya 2025 : दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!
11
गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा
12
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
13
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
14
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
15
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
18
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
19
गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई 
20
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का

कचऱ्याचा प्रश्न महिन्याभरात सोडवू

By admin | Updated: September 21, 2016 00:42 IST

पी. शिवशंकर : भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना आश्वासन

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे लागणाऱ्या चार नवीन आर. सी. वाहनांसह आवश्यक तेवढे कंटेनर खरेदी करून येत्या महिन्याभरात शहरातील कचरा उठावाचा प्रश्न निकाली काढला जाईल, असे आश्वासन आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी भाजप-ताराराणी आघाडी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला दिले. घरोघरी ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी प्रायोजकाच्या माध्यमातून कचराकुंड्या उपलब्ध करून देण्यावरसुद्धा यावेळी चर्चा झाली. महानगरपालिकेची सभा तहकूब झाल्यानंतर भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन शहरातील कचरा उठावातील अडचणींबाबत चर्चा केली. विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनी शहरातील कचऱ्याचा उठाव पूर्ण क्षमतेने करावा, घंटागाड्यांची संख्या वाढवावी, प्रत्येक प्रभागात तीन-तीन घंटागाड्या द्याव्यात, कंटेनरची बांधणी महापालिकेच्या वर्कशॉपमध्येच केली जावी, आर.सी. वाहनांवर हायड्रॉलिक प्रणालीच्या वाहनांचे ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना केल्या. सध्याच्या आर. सी. वाहनांत प्रमाणापेक्षा जादा कचरा तसेच खरमाती भरली जाते; त्यामुळे ही वाहने खराब झाली आहेत. त्यामुळे अशा प्रमाणापेक्षा जादा कचरा भरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. महिन्याभरात प्राधान्याने नागरिकांच्या आरोग्याच्या, कचरा उठाव, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नात लक्ष घालावे, असे जाधव यांनी सांगितले. घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण झाल्यास कचरा उठावाचे काम अधिक सुलभ होईल, असा मुद्दा चर्चेत पुढे आला. त्यावेळी संभाजी जाधव, सत्यजित कदम, सुनील कदम यांनी प्रायोजकांच्या माध्यमातून कचराकुंडी उपलब्ध करून देता येईल का, याचा विचार केला जाईल. जर शक्य झाले तर अशा कचराकुंड्या दिल्या जातील, असे सांगितले. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, नगरसेवक राजसिंह शेळके, संतोष गायकवाड, रूपाराणी निकम, जयश्री जाधव, भाग्यश्री शेटके, सविता भालकर, अश्विनी बारामते, पूजा नाईकनवरे, गीता गुरव, मनीषा कुंभार, नीलेश देसाई उपस्थित होते. (प्रतिनिधी)काँग्रेस-राष्ट्रवादीचे शिष्टमंडळही भेटलेमहानगरपालिकेत भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेविकांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर चर्चा केल्याची माहिती कळताच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेविकाही आयुक्तांना भेटल्या. त्यांनीही कचऱ्यासह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नात लक्ष घालावे, असे आवाहन आयुक्तांना केले. महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम, रिना कांबळे यांच्यासह काही नगरसेविकांचा त्यात समावेश होता.