शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याचा प्रश्न महिन्याभरात सोडवू

By admin | Updated: September 21, 2016 00:42 IST

पी. शिवशंकर : भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना आश्वासन

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे लागणाऱ्या चार नवीन आर. सी. वाहनांसह आवश्यक तेवढे कंटेनर खरेदी करून येत्या महिन्याभरात शहरातील कचरा उठावाचा प्रश्न निकाली काढला जाईल, असे आश्वासन आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी भाजप-ताराराणी आघाडी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला दिले. घरोघरी ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी प्रायोजकाच्या माध्यमातून कचराकुंड्या उपलब्ध करून देण्यावरसुद्धा यावेळी चर्चा झाली. महानगरपालिकेची सभा तहकूब झाल्यानंतर भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन शहरातील कचरा उठावातील अडचणींबाबत चर्चा केली. विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनी शहरातील कचऱ्याचा उठाव पूर्ण क्षमतेने करावा, घंटागाड्यांची संख्या वाढवावी, प्रत्येक प्रभागात तीन-तीन घंटागाड्या द्याव्यात, कंटेनरची बांधणी महापालिकेच्या वर्कशॉपमध्येच केली जावी, आर.सी. वाहनांवर हायड्रॉलिक प्रणालीच्या वाहनांचे ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना केल्या. सध्याच्या आर. सी. वाहनांत प्रमाणापेक्षा जादा कचरा तसेच खरमाती भरली जाते; त्यामुळे ही वाहने खराब झाली आहेत. त्यामुळे अशा प्रमाणापेक्षा जादा कचरा भरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. महिन्याभरात प्राधान्याने नागरिकांच्या आरोग्याच्या, कचरा उठाव, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नात लक्ष घालावे, असे जाधव यांनी सांगितले. घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण झाल्यास कचरा उठावाचे काम अधिक सुलभ होईल, असा मुद्दा चर्चेत पुढे आला. त्यावेळी संभाजी जाधव, सत्यजित कदम, सुनील कदम यांनी प्रायोजकांच्या माध्यमातून कचराकुंडी उपलब्ध करून देता येईल का, याचा विचार केला जाईल. जर शक्य झाले तर अशा कचराकुंड्या दिल्या जातील, असे सांगितले. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, नगरसेवक राजसिंह शेळके, संतोष गायकवाड, रूपाराणी निकम, जयश्री जाधव, भाग्यश्री शेटके, सविता भालकर, अश्विनी बारामते, पूजा नाईकनवरे, गीता गुरव, मनीषा कुंभार, नीलेश देसाई उपस्थित होते. (प्रतिनिधी)काँग्रेस-राष्ट्रवादीचे शिष्टमंडळही भेटलेमहानगरपालिकेत भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेविकांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर चर्चा केल्याची माहिती कळताच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेविकाही आयुक्तांना भेटल्या. त्यांनीही कचऱ्यासह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नात लक्ष घालावे, असे आवाहन आयुक्तांना केले. महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम, रिना कांबळे यांच्यासह काही नगरसेविकांचा त्यात समावेश होता.