शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार

By admin | Updated: May 1, 2015 00:19 IST

इचलकरंजी पालिका : शंभर टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार

इचलकरंजी : येथील आसरानगरमध्ये गेल्या चार वर्षांहून अधिक काळ धूळ खात पडलेल्या घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रसामग्री नगरपालिकेकडून चालू करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत. त्यामुळे दररोज शंभर टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार असून, शहराबरोबरच कचरा डेपोवरील कचऱ्याची वेगाने निर्गत लागण्याची दाट शक्यता आहे.शहर व परिसरामध्ये दररोज साधारणत: ८० ते १०० टन कचरा जमा होतो. आसरानगरमधील कचरा डेपोमध्ये हा कचरा गेले काही वर्षे एकत्रित केला जात असून, याठिकाणी उभारण्यात आलेला घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. हा प्रकल्प मुंबई येथील हायड्रोयर टेक्नो या कंपनीकडून चालविला जात होता. या प्रकल्पामध्ये नगरपालिका २५ टक्के व मक्तेदार ७५ टक्के अशी भागीदारी होती. गेल्या चार वर्षांपेक्षा अधिक काळ हा प्रकल्प बंद पडला. परिणामी, कचरा डेपोवर मोठ्या प्रमाणावर कचरा साचूू लागला आहे. त्याची विल्हेवाट लागत नसल्याने आणि डेपोतील कचऱ्याला वारंवार आग लागण्याचे प्रकार होत असल्याने आसपासच्या परिसरामधील नागरिकांना त्याचा त्रास होतो. म्हणून कचरा डेपोतील कचरा शहरालगत असलेल्या काही रस्त्यांमध्ये भर करण्यासाठी आणि शहापूर येथील खण बुजविण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याचाही अद्याप निर्णय लागलेला नाही. म्हणून मक्तेदाराला बीओटी तत्त्वावर दिलेला हा प्रकल्प ताब्यात घेऊन तो स्वत: चालविण्याचा विचार पालिका करीत आहे. त्यासाठी मक्तेदाराला प्रकल्प ताब्यात घेण्याची अंतिम नोटीस देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)पुन्हा घनकचरा प्रकल्पासाठी निविदानगरपालिकेकडे सध्या उपलब्ध असलेला अपुरा अधिकारी व कर्मचारी वर्ग पाहता हा प्रकल्प बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर पुन्हा चालविण्यास देण्याचा विचार नगरपालिका प्रशासन करीत आहे. पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प चालविण्यास देण्याची निविदा मागविण्यासाठी सभागृहामध्ये हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे. परिणामी घनकचरा व्यवस्थापनाचा हा प्रकल्प पुन्हा चालू होण्यास मदत मिळेल.