शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार

By admin | Updated: May 1, 2015 00:19 IST

इचलकरंजी पालिका : शंभर टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार

इचलकरंजी : येथील आसरानगरमध्ये गेल्या चार वर्षांहून अधिक काळ धूळ खात पडलेल्या घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रसामग्री नगरपालिकेकडून चालू करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत. त्यामुळे दररोज शंभर टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार असून, शहराबरोबरच कचरा डेपोवरील कचऱ्याची वेगाने निर्गत लागण्याची दाट शक्यता आहे.शहर व परिसरामध्ये दररोज साधारणत: ८० ते १०० टन कचरा जमा होतो. आसरानगरमधील कचरा डेपोमध्ये हा कचरा गेले काही वर्षे एकत्रित केला जात असून, याठिकाणी उभारण्यात आलेला घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. हा प्रकल्प मुंबई येथील हायड्रोयर टेक्नो या कंपनीकडून चालविला जात होता. या प्रकल्पामध्ये नगरपालिका २५ टक्के व मक्तेदार ७५ टक्के अशी भागीदारी होती. गेल्या चार वर्षांपेक्षा अधिक काळ हा प्रकल्प बंद पडला. परिणामी, कचरा डेपोवर मोठ्या प्रमाणावर कचरा साचूू लागला आहे. त्याची विल्हेवाट लागत नसल्याने आणि डेपोतील कचऱ्याला वारंवार आग लागण्याचे प्रकार होत असल्याने आसपासच्या परिसरामधील नागरिकांना त्याचा त्रास होतो. म्हणून कचरा डेपोतील कचरा शहरालगत असलेल्या काही रस्त्यांमध्ये भर करण्यासाठी आणि शहापूर येथील खण बुजविण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याचाही अद्याप निर्णय लागलेला नाही. म्हणून मक्तेदाराला बीओटी तत्त्वावर दिलेला हा प्रकल्प ताब्यात घेऊन तो स्वत: चालविण्याचा विचार पालिका करीत आहे. त्यासाठी मक्तेदाराला प्रकल्प ताब्यात घेण्याची अंतिम नोटीस देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)पुन्हा घनकचरा प्रकल्पासाठी निविदानगरपालिकेकडे सध्या उपलब्ध असलेला अपुरा अधिकारी व कर्मचारी वर्ग पाहता हा प्रकल्प बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर पुन्हा चालविण्यास देण्याचा विचार नगरपालिका प्रशासन करीत आहे. पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प चालविण्यास देण्याची निविदा मागविण्यासाठी सभागृहामध्ये हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे. परिणामी घनकचरा व्यवस्थापनाचा हा प्रकल्प पुन्हा चालू होण्यास मदत मिळेल.