शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार

By admin | Updated: May 1, 2015 00:19 IST

इचलकरंजी पालिका : शंभर टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार

इचलकरंजी : येथील आसरानगरमध्ये गेल्या चार वर्षांहून अधिक काळ धूळ खात पडलेल्या घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रसामग्री नगरपालिकेकडून चालू करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत. त्यामुळे दररोज शंभर टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार असून, शहराबरोबरच कचरा डेपोवरील कचऱ्याची वेगाने निर्गत लागण्याची दाट शक्यता आहे.शहर व परिसरामध्ये दररोज साधारणत: ८० ते १०० टन कचरा जमा होतो. आसरानगरमधील कचरा डेपोमध्ये हा कचरा गेले काही वर्षे एकत्रित केला जात असून, याठिकाणी उभारण्यात आलेला घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. हा प्रकल्प मुंबई येथील हायड्रोयर टेक्नो या कंपनीकडून चालविला जात होता. या प्रकल्पामध्ये नगरपालिका २५ टक्के व मक्तेदार ७५ टक्के अशी भागीदारी होती. गेल्या चार वर्षांपेक्षा अधिक काळ हा प्रकल्प बंद पडला. परिणामी, कचरा डेपोवर मोठ्या प्रमाणावर कचरा साचूू लागला आहे. त्याची विल्हेवाट लागत नसल्याने आणि डेपोतील कचऱ्याला वारंवार आग लागण्याचे प्रकार होत असल्याने आसपासच्या परिसरामधील नागरिकांना त्याचा त्रास होतो. म्हणून कचरा डेपोतील कचरा शहरालगत असलेल्या काही रस्त्यांमध्ये भर करण्यासाठी आणि शहापूर येथील खण बुजविण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याचाही अद्याप निर्णय लागलेला नाही. म्हणून मक्तेदाराला बीओटी तत्त्वावर दिलेला हा प्रकल्प ताब्यात घेऊन तो स्वत: चालविण्याचा विचार पालिका करीत आहे. त्यासाठी मक्तेदाराला प्रकल्प ताब्यात घेण्याची अंतिम नोटीस देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)पुन्हा घनकचरा प्रकल्पासाठी निविदानगरपालिकेकडे सध्या उपलब्ध असलेला अपुरा अधिकारी व कर्मचारी वर्ग पाहता हा प्रकल्प बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर पुन्हा चालविण्यास देण्याचा विचार नगरपालिका प्रशासन करीत आहे. पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प चालविण्यास देण्याची निविदा मागविण्यासाठी सभागृहामध्ये हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे. परिणामी घनकचरा व्यवस्थापनाचा हा प्रकल्प पुन्हा चालू होण्यास मदत मिळेल.