शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

जिथं संवेदना जिवंत तोच समाज सर्वश्रेष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:23 IST

सतीश नांगरे-लोकमत न्यूज नेटवर्क : शित्तुर-वारुण : संवेदनशीलता जपणारी माणसं ही समाजाची सकारात्मक बाजू आहे. गोरगरीब, वंचित समाजासाठी राबणाऱ्या ...

सतीश नांगरे-लोकमत न्यूज नेटवर्क

: शित्तुर-वारुण : संवेदनशीलता जपणारी माणसं ही समाजाची सकारात्मक बाजू आहे. गोरगरीब, वंचित समाजासाठी राबणाऱ्या व्यक्ती ह्या नेहमीच सर्वश्रेष्ठ असतात, असे प्रतिपादन माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी केले. शित्तुर वारुण (ता.शाहूवाडी) येथे निराधार आजींना घर प्रदान व दिव्यांग मुलांसाठी जीवन आधार सुविधेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील होते.

यावेळी अब्दुललाट येथील विद्योदय संस्था व खेडे येथील सेवा फाउंडेशनच्या वतीने लोकवर्गणीतून निराधार बाळाबाई पाटील या वृद्ध महिलेस घर तसेच शैक्षणिक व्यासपीठाच्या पुढाकाराने अचानक अपंगत्व आलेल्या निखिल व कुणाल या दोन मुलांच्या जीवन आधार सुविधेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सावली फाउंडेशन कोल्हापूरचे किशोर देशपांडे यांनी दोन्ही मुलांच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले, तर युवराज पाटील यांनी शैक्षणिक व्यासपीठाच्या उपक्रमासाठी भरघोस मदत देण्याचे जाहीर केले.

यावेळी विनायक हिरवे, विनायक माळी, गोविंद देसाई, भरतेश कळंत्रे, विलास तोळसणकर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमासाठी अशोक पाटील, विजय गुरव, संजय जगताप, वसंत पाटील, सदाशिव कांबळे, बाबा साळोखे, दीपक वडाम, तानाजी वाघमोडे, भगवान पाटील, वैशाली हिरवे, जयश्री मगदूम, राजू पवार, अशोक पाटील, योगेश दळवी, तातोबा पाटील, सुनीता गुरव, विठ्ठल पाटील, सारशा माळी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन एम. आर. पाटील यांनी, तर आभार संभाजी लोहार यांनी मानले.

२३ शित्तुर वारुण प्रोग्राम

फोटो :

शित्तुर वारुण (ता. शाहूवाडी) येथे निराधार आजींना घर प्रदान व दिव्यांग मुलांसाठी जीवन आधार सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी मा. इंद्रजित देशमुख व मान्यवर.