शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

शाहिरीतून समाजप्रबोधन

By admin | Updated: February 15, 2016 01:08 IST

समाजकल्याणचा उपक्रम : समता दिंडीचे कोल्हापुरात आगमन

कोल्हापूर : ‘पाणी वाचवा, आरोग्य, पर्यावरण रक्षण, लेक वाचवा’ आदी विषयांबाबत शाहिरी पोवाडा कलामंचचे शाहीर रंगराव पाटील यांनी रविवारी बिंदू चौकात प्रबोधन केले. निमित्त होते समता दिंडीचे (चित्ररथ) आगमन.समाजकल्याण विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यात समता दिंडीचे आयोजन केले आहे. कोल्हापुरात रविवारी सकाळी समता दिंडीचे बिंदू चौकात आगमन झाले. याठिकाणी समाजकल्याण विभागातर्फे शाहीर पाटील यांचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते झाले. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय गायकवाड, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक संतोष चिकणे, ‘बार्टी’चे प्रकल्पाधिकारी गणेश सव्वाखंडे, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, प्रा. विश्वासराव देशमुख, बाळासाहेब भोसले, आदींसह समतादूत उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाहीर पाटील यांनी बुद्धवंदनेने केली. यानंतर त्यांनी राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट, त्यांच्या सामाजिक कार्यावरील पोवाडे सादर केले तसेच संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासह त्यांनी पाणी वाचवा, लेक वाचवा आणि समता, न्याय आदी विषयांबाबत प्रबोधन केले. शाहीर पाटील यांना शाहीर बाळासाहेब खांडेकर, सखाराम चौगुले, कृष्णात पाटील, लक्ष्मण पाटील, बाळू पाटील, संजय गुरव, रमेश कांबळे, गौतम कांबळे यांनी साथ दिली. रणजित कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)