शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

भांडवलशाहीला समाजवाद हाच सक्षम पर्याय : मिश्रा-

By admin | Updated: December 12, 2014 23:38 IST

-अवि पानसरे व्याख्यानमाला

कोल्हापूर : व्यवसायातून मिळालेल्या नफ्यातूनच या देशातील भांडवलशाहीने नवतंत्रज्ञानाचा वापर करीत उत्पादकतेचा विकास केला़ या उत्पादक विकासाच्या जोरावरच ही भांडवलशाही दीर्घकाळ टिकली़ तंत्रज्ञानाने रोजगार कमी केला़; पण तंत्रज्ञानाची मजल रोबोपर्यंत आल्यामुळे तंत्रज्ञान हे अंतिम सीमेवर आले आहे़ अशा परिस्थितीत भांडवलशाहीला समाजवाद हाच सक्षम पर्याय आहे, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय सदस्य यु़ एऩ मिश्रा यांनी केले़ श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने येथील शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित कॉम्रेड अवि पानसरे व्याख्यानमालेचा समारोप आज, शुक्रवारी झाला़ याप्रसंगी ते बोलत होते़ ‘लोकशाही आणि समाजवाद’ हा विषय होता़ अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे होते़ मिश्रा म्हणाले, लोकशाहीच्या समतेच्या कल्याणकारी ध्येयाकडे जाण्यासाठी समाजवाद ही एक प्रक्रिया आहे़; पण लोकशाही आणि समाजवाद ही वेगवेगळे अंगे आहेत, असा चुकीचा प्रचार काही घटक करीत आहेत़ विकासाच्या नावाखाली लोकशाहीमध्ये विपरीत स्थिती निर्माण झाली आहे़ हे बदलण्यासाठी लोकशाहीवर विश्वास असलेल्या घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे़ इथल्या राजकीय व्यवस्थेच्या मदतीने भांडवलदारांनी प्रचंड नफा मिळविला़ स्वातंत्र्योत्तर काळानंतरही राजकीय व्यवस्था आणि भांडवलदार अशी दोन सरकारे या देशात एकमेकांच्या संगनमताने समांतरपणे चालली आहेत़ त्यामुळे ना कॉँग्रेस स्विस बँकेतील काळा पैसा आणू शकली, ना भाजप़़़ महागाईबाबत नवीन सरकारने हात वर केले आहेत. सर्वांना समान न्याय देणाऱ्या समाजवादी मार्गाने समाजविकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहनही मिश्रा यांनी केले़ कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणाले, राज्यघटनेला समता अभिप्रेत आहे़; पण विषमतेचे तत्त्वज्ञान जोपासणाऱ्यांचे सरकार आता आलेले आहे़ त्यामुळे देशात व राज्यात स्वातंत्र्यानंतर कधीही नसलेली विषमतावादी विचारांची पेरणी करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे़ विषमतावादी तत्त्वज्ञानामुळे घटनेलाच धोका निर्माण झाला आहे़ अरुण पाटील यांनी प्रास्ताविक केले़