शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

बालकलाकारांनी मांडले सामाजिक वास्तव

By admin | Updated: December 14, 2015 00:53 IST

बाल कलाविष्कार : १३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस प्रारंभ

कोल्हापूर : पर्यावरण रक्षण, पाणीटंचाई, शैक्षणिक प्रश्न, दुष्काळ अशा विविधांगी विषयांवर भाष्य करीत बालकलाकारांनी रविवारी राज्य बालनाट्य स्पर्धेचा पहिला दिवस गाजविला. एकापेक्षा एक सरस नाट्यकृती सादर करून त्यांनी सामाजिक वास्तवाचे दर्शन घडविले. बालरसिकांच्या ‘हाऊसफुल्ल’ गर्दीत या नाट्यस्पर्धेचा पडदा उघडला.राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित १३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला रविवारी प्रारंभ झाला. राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये परीक्षक मधुमती पवार, ज्ञानसागर भोकरे, ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी स्पर्धेचे समन्वयक प्रशांत जोशी, शर्वरी जोग, राजेंद्र चौगुले, मिलिंद अष्टेकर, सागर भोसले, संजय जोग, शंकर नायडू, आदी उपस्थित होते. सकाळी अकराच्या सुमारास विद्यामंदिर उचगावच्या ‘शिवरायांचे स्वराज्य’ नाटकाने स्पर्धेचा पडदा उघडला. यातून बालकलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकौशल्याचे उपस्थितांना दर्शन घडविले. यानंतर विद्यापीठ हायस्कूलच्या कलाकारांनी ‘जगा आणि जगू द्या’ या नाटकातून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. वि. स. खांडेकर प्रशालेने ‘राजा प्लास्टिक’मधून प्लास्टिक प्रदूषणाची समस्या मांडली. सांगलीच्या श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूलने ‘बालदेशभक्त शिरीषकुमार’ यांची देशभक्ती जागविली. बहुरूपी कलामंचने ‘झेप’ हे नाटक प्रभावीपणे सादर केले. यातून स्वावलंबी जीवनशैलीचा संदेश दिला. शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलीया हायस्कूलने ‘निशांत’ आणि सांगलीच्या सिटी हायस्कूलने ‘बोलका आरसा’चे सादरीकरण केले. बालकलाकारांच्या नाट्यकृतीची बुधवार (दि. १६) पर्यंत बालरसिकांना पर्वणी मिळणार आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी ध्वनी, रंगमंच, पोशाख आणि संवाद, अभिनय अशा प्रत्येक पातळीवर बालकलाकारांनी जोरदार तयारी केल्याचे दिवसभर सादर झालेल्या नाटकांतून दिसून आले. कोल्हापूर सांगली, इचलकरंजी, आदी परिसरातील मुले-मुली, पालकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)प्रतिसाद : बालरसिक, पालकांची गर्दीथिएटरमधील संयमित वातावरणाचा लाभ होऊन आजची पिढी संयमित व्हावी, या उद्देशाने मुख्याध्यापक व दिग्दर्शक डी. के. रायकर, ए. सी. देसाई, विशाखा जितकर यांनी बाल नाटके मुलांनी का पाहावीत, याकरिता गेल्या आठवडाभरात प्रत्येक शाळेत मुलांचे प्रबोधन केले होते. त्याचा परिणाम म्हणजे स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी बालरसिक, पालकांनी गर्दी केली. हे प्रबोधन परिणामकारक ठरल्याचे समन्वयक प्रशांत जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्य नाट्य स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेसाठीही गर्दी होती. बुधवार (दि. १६) पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण १६ नाटके सादर होणार आहेत.