शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

समानता व्यापक केल्यास सामाजिक समरसता वाढेल

By admin | Updated: March 8, 2016 00:51 IST

शेखर चरेगावकर : जातीभेदाचे उच्चाटन करण्यात अपयश आल्याची खंत

इस्लामपूर : कुटुंबातील समानता सामाजिक पातळीवर अधिक व्यापक केल्यास समरसता वाढेल. जातीभेद हा कचरा आहे, तो टाकून दिला पाहिजे, असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. मात्र तरीही आपल्याला जातीभेदाचे उच्चाटन करण्यात अपयश आल्याची खंत राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केली.येथील सार्वजनिक तालुका वाचनालयाच्या वसंत व्याख्यानमालेत चरेगावकर यांनी ‘समाजव्यवस्थेतील समरसता’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील अध्यक्षस्थानी होते. चरेगावकर म्हणाले, समरसता शब्दाला आपल्याकडे जातीय वास देण्यात येतो. उद्योग-व्यवसायावर आधारित जात रचना असल्याने त्याला गहिरेपण येते. प्रत्येक धर्माचे अधिष्ठान एकसमान आहे. त्यामुळे समरसतेला जाती-पक्षाच्या जोखडातून बाहेर काढले पाहिजे. विषमतेला थारा न देता आचरण आणि कृतीमधून समरसता दिसली पाहिजे. राष्ट्राला बलशाली करण्यासाठी समाजकारण, राजकारण, अर्थकारण आणि व्यापार-उदीमही सचोटीनेच व्हायला हवा. समाजातील सर्व व्यवहार सरळ आणि सचोटीने झाल्यास समरसता भक्कम होईल.दिलीप पाटील म्हणाले, सहकारात विश्वस्त म्हणून काम करणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगतीच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न आहे. आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांच्या हुशार मुलांना परदेशातील शिक्षणासाठी ३५ लाखांपर्यंत अर्थसाहाय्य देणार आहोत. जिल्हा बँकेचे रुपे डेबीट कार्ड घेऊन शेतकरी आता जगाच्या पाठीवर कुठेही व्यवहार करू शकतो. सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, ती वाढली पाहिजे.दीनानाथ लाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रकाश रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. अमित पानस्कर यांनी आभार मानले. यावेळी प्रा. शामराव पाटील, अ‍ॅड. बी. डी. पाटील, अमोल गुरव, संग्रामसिंह पाटील, डॉ. जवाहर शहा, डॉ. सई मंद्रुपकर, गजानन पाटील, सुभाषराव जाधव, सुभाष बाबर उपस्थित होते. (वार्ताहर) वसंतव्याख्यानमाला