शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

समानता व्यापक केल्यास सामाजिक समरसता वाढेल

By admin | Updated: March 8, 2016 00:51 IST

शेखर चरेगावकर : जातीभेदाचे उच्चाटन करण्यात अपयश आल्याची खंत

इस्लामपूर : कुटुंबातील समानता सामाजिक पातळीवर अधिक व्यापक केल्यास समरसता वाढेल. जातीभेद हा कचरा आहे, तो टाकून दिला पाहिजे, असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. मात्र तरीही आपल्याला जातीभेदाचे उच्चाटन करण्यात अपयश आल्याची खंत राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केली.येथील सार्वजनिक तालुका वाचनालयाच्या वसंत व्याख्यानमालेत चरेगावकर यांनी ‘समाजव्यवस्थेतील समरसता’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील अध्यक्षस्थानी होते. चरेगावकर म्हणाले, समरसता शब्दाला आपल्याकडे जातीय वास देण्यात येतो. उद्योग-व्यवसायावर आधारित जात रचना असल्याने त्याला गहिरेपण येते. प्रत्येक धर्माचे अधिष्ठान एकसमान आहे. त्यामुळे समरसतेला जाती-पक्षाच्या जोखडातून बाहेर काढले पाहिजे. विषमतेला थारा न देता आचरण आणि कृतीमधून समरसता दिसली पाहिजे. राष्ट्राला बलशाली करण्यासाठी समाजकारण, राजकारण, अर्थकारण आणि व्यापार-उदीमही सचोटीनेच व्हायला हवा. समाजातील सर्व व्यवहार सरळ आणि सचोटीने झाल्यास समरसता भक्कम होईल.दिलीप पाटील म्हणाले, सहकारात विश्वस्त म्हणून काम करणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगतीच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न आहे. आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांच्या हुशार मुलांना परदेशातील शिक्षणासाठी ३५ लाखांपर्यंत अर्थसाहाय्य देणार आहोत. जिल्हा बँकेचे रुपे डेबीट कार्ड घेऊन शेतकरी आता जगाच्या पाठीवर कुठेही व्यवहार करू शकतो. सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, ती वाढली पाहिजे.दीनानाथ लाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रकाश रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. अमित पानस्कर यांनी आभार मानले. यावेळी प्रा. शामराव पाटील, अ‍ॅड. बी. डी. पाटील, अमोल गुरव, संग्रामसिंह पाटील, डॉ. जवाहर शहा, डॉ. सई मंद्रुपकर, गजानन पाटील, सुभाषराव जाधव, सुभाष बाबर उपस्थित होते. (वार्ताहर) वसंतव्याख्यानमाला