शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

शिये पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:23 IST

विकास पाटील कोल्हापूर : जुलै महिन्यात आलेल्या महापुरानंतर शिये गावचा पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे. पुनर्वसनासाठी शेतकरी संघटनेने ...

विकास पाटील

कोल्हापूर : जुलै महिन्यात आलेल्या महापुरानंतर शिये गावचा पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे. पुनर्वसनासाठी शेतकरी संघटनेने प्रस्तावित केलेले रामनगर अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. त्यामुळे ही अतिक्रमणे काढणार कोण, असा प्रश्न समोर असतानाच ग्रामपंचायतीने सुचविलेल्या गुरव खडीमध्येही मूलभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे शेतकरी संघटना व ग्रामपंचायत यांच्या वादात आपले पुनर्वसन खरंच होणार का, असा प्रश्न शियेकरांना पडला आहे.

१९८९ मध्ये शिये गावाला पहिल्यांदा पुराचा फटका बसला, त्यावेळी शासनाने गावचे पुनर्वसन करण्यासाठी गावच्या पूर्वेला असणाऱ्या टेकडीवर (आताचे रामनगर, हनुमाननगर) येथे पर्यायी जागा उपलब्ध करून दिली, मात्र शासनाने दिलेल्या जागेची त्यावेळची भौगोलिक परिस्थिती चांगली नव्हती आणि सुपीक जमीन गावच्या पश्चिमेला असल्यामुळे गावातील अनेक लोकांनी येथील जागा नाकारल्या. त्यानंतर येथील औद्योगिक वसाहत नावारूपाला आली, तशी येथील जमिनीचा भाव वाढत गेला. सर्वसामान्य ग्रामस्थ मात्र यापासून अलिप्त राहिला. काही थोड्या लोकांनी येथील जागेचा बराचसा ताबा घेतला. काही लोकांनी अतिक्रमण करून जागा बाहेरील व्यक्तींना विकल्या.

२०१९च्या महापुरानंतर शिये गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. गावातील पूरग्रस्तांना यावेळी आपले पुनर्वसन नक्की होणार, असे वाटले. महापुरानंतर दोन महिन्यांनंतर मात्र, हा विषय पुन्हा गुंडाळून ठेवला गेला. २०२१च्या पुरानंतर शिये पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा जोर धरू लागला. यावेळी गावातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे हा प्रश्न जास्तच चिघळला. येथील शेतकरी संघटनेने रामनगरातील गट नं. २८३ व २५९ मधील अतिक्रमण काढून त्या ठिकाणी पूरग्रस्तांना जागा देण्याची मागणी केली आहे. येथे कागदोपत्री जरी काही जागा शिल्लक असली तरी त्या ठिकाणी अनेक वर्षांपासूनचे अतिक्रमण असल्यामुळे ते निघणार का, हाच कळीचा प्रश्न आहे. तर, ग्रामपंचायतीने ‘गुरव खडी’ येथे पुनर्वसनाचा प्रस्ताव दिला आहे. पण येथील भौगोलिक परिस्थिती पाहता त्यालाही ग्रामस्थांचा म्हणावा तसा प्रतिसाद नाही. यातच ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी संघटना यांचा वाद मिटविण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी बैठकही बोलावली पण, त्या बैठकीतही नेते एकमेकांंना भिडले. परिणामी निर्णय झाला नाही. शेतकरी संघटना व नेते यांच्या भांडणात मात्र सर्वसामान्य शियेकरांना कोणाची बाजू योग्य आहे, याबाबत संभ्रम आहे.

चौकट

खरंच पुनर्वसन होणार का....?

सध्याची पूरस्थिती पाहता ६५०-६६० कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. शेतकरी संघटनेने मागणी केलेल्या गट नंबर २८३, २५९ मध्ये बराचसा भाग अतिक्रमित आहे. तर, ग्रामपंचायतीने सुचविलेल्या ‘गुरव खडी’ जागेवर १२ एकर जमीन आहे. या भागात सध्या तरी वीज, पाणी, रस्ते अशी कोणतीच सोय नाही. शिवाय डोंगराच्या पायथ्याला ही जागा असल्यामुळे जंगली श्वापदांचा वावर राहणार आहे. दोन्ही प्रस्ताव पाहता पुनर्वसन खरंच होणार का, असा प्रश्न आहे.

कोट : २८३ व २५९ गटामध्ये अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. ही अतिक्रमणे काढली तर येथील बगिचाच्या आरक्षित व रिकाम्या जागेत पूरग्रस्तांचे पुनर्वसन करणे शक्य आहे.

-माणिक शिंदे, शेतकरी संघटना

संपूर्ण गाव एकत्रित आले तरच पुनर्वसनाचा प्रश्न सुटू शकतो. आपापसात भांडत बसलो तर प्रश्न चिघळत जाईल. सर्वांनी मिळून जर प्रयत्न केले तरच शासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागेल.

-जयसिंग पाटील, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य