शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

..तर मोदींचे भाषण थांबवू

By admin | Updated: June 10, 2017 00:52 IST

राजू शेट्टी : मंदसौरमधील शेतकरी कुटुंबीयांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या घालाल तर देशभर त्याचा उद्रेक होईल, शेतकऱ्यांचे रक्त सांडला, तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही. हे असेच चालू राहिले तर देशाच्या लाल किल्ल्यावरून मोदींना भाषण देखील करून देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. मध्य प्रदेश येथे झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी ते उदयपूर, मध्य प्रदेश येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी राजस्थानचे शेतकरी नेते रामपाल जाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. खा. शेट्टी पुढे म्हणाले, देशात शेतकऱ्यांच्यावर गोळ्या चालविल्या जात आहेत. त्यांचे रक्त सांडले जात आहे. १५ वर्षे आघाडी सरकारने हेच केले आहे. मोदी सरकारही त्याच दिशेने वाटचाल करत आहे.देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात शेतकरी नेत्यांची १६ जून रोजी दिल्ली येथे बैठक होणार आहे. त्यानंतर हे आंदोलन देशभर नेले जाणार आहे. महाराष्ट्रात या आंदोलनाची सुरुवात झाली आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात व कर्नाटक या राज्यात धग गेलेली आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या बाजूने देशातील शेतकरी ठामपणे उभा राहणार आहे. त्यांच्या मागण्या योग्यच आहेत. न्याय मागण्या मागत असताना गोळीबार कशाला केला? जगाच्या पोशिंंद्यावर गोळीबार करून शेतकऱ्यांना संपवण्याचा डाव यांनी आखलेला आहे. देशभरातील शेतकरी नेत्यांची बैठक दिल्लीतील गांधी फौंडेशन येथे बोलविण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे रक्त सांडाल तर हेच शेतकरी यांची सत्ता उलथवून टाकतील, असा इशाराही खा. शेट्टी यांनी यावेळी दिला.