शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

..तर मोदींचे भाषण थांबवू

By admin | Updated: June 10, 2017 00:52 IST

राजू शेट्टी : मंदसौरमधील शेतकरी कुटुंबीयांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या घालाल तर देशभर त्याचा उद्रेक होईल, शेतकऱ्यांचे रक्त सांडला, तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही. हे असेच चालू राहिले तर देशाच्या लाल किल्ल्यावरून मोदींना भाषण देखील करून देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. मध्य प्रदेश येथे झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी ते उदयपूर, मध्य प्रदेश येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी राजस्थानचे शेतकरी नेते रामपाल जाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. खा. शेट्टी पुढे म्हणाले, देशात शेतकऱ्यांच्यावर गोळ्या चालविल्या जात आहेत. त्यांचे रक्त सांडले जात आहे. १५ वर्षे आघाडी सरकारने हेच केले आहे. मोदी सरकारही त्याच दिशेने वाटचाल करत आहे.देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात शेतकरी नेत्यांची १६ जून रोजी दिल्ली येथे बैठक होणार आहे. त्यानंतर हे आंदोलन देशभर नेले जाणार आहे. महाराष्ट्रात या आंदोलनाची सुरुवात झाली आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात व कर्नाटक या राज्यात धग गेलेली आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या बाजूने देशातील शेतकरी ठामपणे उभा राहणार आहे. त्यांच्या मागण्या योग्यच आहेत. न्याय मागण्या मागत असताना गोळीबार कशाला केला? जगाच्या पोशिंंद्यावर गोळीबार करून शेतकऱ्यांना संपवण्याचा डाव यांनी आखलेला आहे. देशभरातील शेतकरी नेत्यांची बैठक दिल्लीतील गांधी फौंडेशन येथे बोलविण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे रक्त सांडाल तर हेच शेतकरी यांची सत्ता उलथवून टाकतील, असा इशाराही खा. शेट्टी यांनी यावेळी दिला.