शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

...तर तुमच्या भानगडी बाहेर काढू : राजू शेट्टी

By admin | Updated: April 4, 2016 01:06 IST

चंद्रकांतदादा पाटील यांना इशारा

कोल्हापूर : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दोनवेळा अभय दिले, गुन्हेगारांना सोडणार असाल तर त्याची किंमत चुकवावी लागेल. दीड वर्षांत कोणावर कारवाई केली, स्थगिती कोणाला दिली, या सगळ्या भानगडी बाहेर काढू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना दिला. गडहिंग्लज साखर कारखान्यामध्ये ज्यांची भ्रष्टाचाराबद्दल चौकशी सुरू आहे, अशांना निवडणुकीत सोबत घेतलेले चंद्रकांतदादा सहकार शुद्धिकरण कसा करणार, अशी विचारणा सदाभाऊ खोत यांनी केली. ‘स्वाभिमानी’चा मेळावा रविवारी कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड येथे झाला. त्यावेळी राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर चौफेर हल्ला चढविला. खासदार शेट्टी म्हणाले, सहकारमंत्र्यांच्या हातात सत्तेचा हंटर शोभेसाठी दिलेला नाही, त्यांनी चुकीचा कारभार करणाऱ्यांच्या पाठीवर फटके मारून सरळ करावेत. साखर कारखानदारांचे कान पकडून ‘एफआरपी’ची विचारणा करा, पण दादांच्या मनात काळेबेरे आहे, त्यांनी कारखानदारांना अंदाज दिलेला आहे, हे लपून राहत नाही. दीड वर्षांत कोणाच्या चौकशा केल्या, थांबविल्या कोणाच्या? या भानगडी माहिती अधिकारात काढाव्या लागतील. सहकार शुद्धिकरणाची कल्पना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी मांडली होती, ती दिसत नसून ज्यांनी सहकार पोखरला त्यांनाच सन्मान मिळत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावेच लागेल, असा इशारा देत सदाभाऊ खोत म्हणाले, गडहिंग्लज साखर कारखाना ज्यांनी संपविला त्यांनाच सोबत घेऊन दादांनी निवडणूक लढविली, ‘एफआरपी’बाबत झालेला ८०:२० करार हा लग्नातील होता, दादा यावर आम्ही ‘पीएच.डी’ केली आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर कडी लावून कोण बसते, हे सगळ्या राज्याला माहिती आहे. मुश्रीफसाहेब हिंमत असेल तर दादांच्या दारात जाऊन बसा, तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही बसू; पण तुमच्या फायली सरकारकडे तयार असून आमच्या फायली तयार करू शकत नाहीत. जो कोणी तसा प्रयत्न करेल त्याचे थडगे बांधू, असा इशाराही खोत यांनी दिला. (प्रतिनिधी) चष्म्याचा नंबर वाढलाय साखर कारखानदार दिवसाढवळ्या उसाचा काटा मारत आहेत, ऊस तोडणी-वाहतूक दरात कारखान्यांची मनमानी सुरू असताना ते सहकारमंत्र्यांना दिसत नाही. त्यांच्या चष्म्याचा नंबर वाढल्याची उपरोधात्मक टीका खासदार शेट्टी यांनी केली. जि.प. स्वबळावर शेतकरी संघटनेची ताकद घराघरांत आहे, आमची कळ काढायची असेल तर जिल्हा परिषद निवडणुकीत काढा, असा इशारा देत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.