शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

...तर मंत्र्यांना भागात फिरणं अवघड होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : नुकसानभरपाईसाठी आता जास्त वेळ थांबण्याची पूरग्रस्त शेतकऱ्यांची मानसिकता राहिलेली नाही तेव्हा राज्य सरकारने येत्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : नुकसानभरपाईसाठी आता जास्त वेळ थांबण्याची पूरग्रस्त शेतकऱ्यांची मानसिकता राहिलेली नाही तेव्हा राज्य सरकारने येत्या आठ दिवसांत जाहीर केलेली नुकसानभरपाई द्यावी अन्यथा मंत्र्यांना भागात फिरणे अवघड होईल, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिला.

शेट्टी म्हणाले, बुधवारच्या कॅबिनेटच्या बैठकीकडे आमचं लक्ष होते. सरकार जर वेळकाढूपणा करत असेल तर पुन्हा पूरग्रस्तांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. मराठवाड्यात अजून पाऊस पडत असून तेथील नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, असे सांगण्यात येते. परंतु आता पश्चिम महाराष्ट्र , कोकणातील पूरग्रस्तांचे पंचनामे झाले आहेत. त्यांची आता जास्त वेळ थांबण्याची मानसिकता राहिलेली नाही. दोन महिने होऊन गेले. एकदा काय देणार ते सांगा, देणार असाल तर किती मदत देणार ते सांगा, नाही तर आम्ही गप्प बसणार नाही, जास्तीत जास्त आठ दिवस वाट बघू, त्यानंतर मंत्र्यांना भागात फरणे अवघड होईल,

मुंबई बँकेचे काय करणार..?

भाजपचे किरीट सोमय्या काही विशिष्ट लाेकांच्या मागे लागले आहेत. त्यांची भूमिका चुकीची आहे. तुमच्या राजकारणासाठी शेतकऱ्यांचा वापर करू नका. भ्रष्टाचाऱ्याच्या विरोधात बोलायचेच असले तर ‘सब घोडे बारा टक्के’ या न्यायाने बोला. मग लाेक तुमच्यावर विश्वास ठेवतील. सोमय्या ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने त्यांनी मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेतील भ्रष्टाचारसुध्दा बाहेर काढायला पाहिजे. मात्र त्यावर ते काहीच बोलत नाहीत, असे शेट्टी यांनी सांगितले.

ऊस परिषद दसऱ्यानंतरच

ऊस परिषद दसरा झाल्यानंतर घेण्याचा आमचा विचार आहे. कोणीही कितीही आडकाठी आण्याचा प्रयत्न केला तरी ऊस परिषद ही होणारच, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. त्यामुळे कोल्हापूरचा हंगामही नोव्हेंबरमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे.