शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

‘स्मार्ट’कार्डचा घोळ

By admin | Updated: August 14, 2015 23:41 IST

‘आरटीओ’चा कारभार : वाहनधारकांचे चार लाख पडून

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनधारकांकडून गेल्या वर्षी स्मार्ट कार्डापोटी घेतलेले ४ लाख ९ हजार ८५० रुपये अद्यापही कार्यालयाकडेच पडून आहेत. विशेष म्हणजे एक वर्ष होऊनही स्मार्ट कार्डही मिळेना आणि पैसेही परत मिळेनात. त्यामुळे दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. राज्यातील सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक कार्यालयांकडून वाहनधारकांना नवीन वाहनाची नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे स्मार्ट कार्ड २६ नोव्हेंबर २०१४ पासून देणे अचानक बंद केले आहे. त्यावेळी ज्या कंपनीकडे स्मार्ट कार्ड बनवून देण्याचा ठेका देण्यात आला होता, त्यांनी आपली कामाची मुदत संपल्याचे कारण देत लाखो वाहनधारकांचे स्मार्ट कार्ड देण्यास नकार दिला. वाहनधारकांनी प्रत्येकी ३९४ रुपये भरले होते. त्यात ४० रुपये केवळ परिवहन कार्यालयास मिळणार होते, तर ३५० रुपये स्मार्ट कार्डसाठी वर्ग करण्यात येत होते. त्यामुळे राज्यातील लाखो वाहनधारकांसह कोल्हापुरातील ११७१ वाहनधारकांचेही ४ लाख ९ हजार ८५० रुपये अडकले. याबाबत वाहनधारकांनी आपल्याला वाहन नोंदणीचे स्मार्ट कार्ड त्वरित द्यावे, म्हणून कार्यालयाकडे विनंती अर्जही केले. मात्र, कार्यालयाकडून नेहमीप्रमाणेच ‘ही बाब आमच्या अखत्यारित नसून, परिवहन आयुक्त कार्यालयातून याबाबतचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे नोंदणी कार्ड हवे असल्यास ते प्रिंट करून कागदावर मिळेल,’ असे उत्तर दिले जाते. वाहनधारकांत संभ्रमावस्थास्मार्ट कार्ड देणे बंद केल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नूतन नोंदणीधारकांना आरसी व टीसी बुकची प्रिंट दिली. पैसे भरून घेताना मात्र या स्मार्टकार्डसहीत पैसे भरून घेतले. याबाबत अनेकांच्या तक्रारी आहेत. ज्या वितरकाकडून ग्राहकांनी गाड्या खरेदी केल्या, तेही मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे आपण भरलेले पैसे मिळणार की नाही, अशा संभ्रमावस्थेत हे वाहनधारक आहेत. आम्ही स्मार्ट कार्ड बनविणाऱ्या रोझमॉल्टा या कंपनीशी संपर्क ठेवून आहोत. यामध्ये एक तर ही स्मार्ट कार्डे कंपनीने आम्हाला बनवून द्यावीत; अन्यथा पैसे परत करावेत, अशी लेखी मागणी या कंपनीकडे केली आहे. याबाबत परिवहन आयुक्तालय निर्णय घेणार आहे. तरी ज्यांनी असे पैसे भरले असतील त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अर्ज करावेत. - राजेंद्र वर्मा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी