शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

शेतीचे लहान-लहान झालेले तुकडे मोठी समस्या

By admin | Updated: April 21, 2017 00:10 IST

राजू शेट्टी : दिल्ली येथे कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष टी. हक्क यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

जयसिंगपूर : देशामधील लाखो एकर सुपीक जमीन पडीक पडलेली आहे. ही जमीन पिकाखाली आणण्याचे एक मोठे आव्हान आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची वाढती लोकसंख्या त्यामुळे शेतीचे झालेले लहान-लहान तुकडे ही एक मोठी समस्या निर्माण झाल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.देशात तुकड्याच्या शेतीचे प्रमाण वाढले असून, कूळ कायद्याच्या भीतीपोटी लाखो एकर जमीन पडीक असल्याने ही जमीन पिकाखाली आणण्यासाठी नवीन जमीन भाडेकरार कायदा अंमलात येणार आहे. याबाबत दिल्ली येथे कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. टी. हक्क याच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. याबाबत खा. शेट्टी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली.तुकड्याची शेती परवडत नसल्याने अशी शेती पडीक राहते. विशेष करून कोकणात यांचे प्रमाण जास्त आहे. कूळ कायद्याच्या भीतीमुळे ही जमीन पडीक असल्याने ही शेती दुसऱ्यालाही कसायला दिली जात नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून नीती आयोगाने देशातील अशी पडीक जमीन पिकाखाली आणण्याच्या दृष्टिकोनातून जमीन भाडेतत्त्वाचे नवीन धोरण आणण्याचे ठरविलेले आहे. या नवीन धोरणाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. टी. हक्क यांच्यावर सोपविली आहे.डॉ. टी. हक्क यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला देशातील प्रमुख शेतकरी, नेते, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, तसेच महसूल खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.यावेळी खासदार शेट्टी यांनी या नवीन धोरणाचे स्वागत करून मूळ जमीन मालकाचे हक्क आबादित ठेवून जमीन भाडेकराराने दिल्यास कूळ कायदा लागणार नाही, याची हमी दिल्यास अनेक जमीनमालक आपली जमीन भाडेतत्त्वावर देण्यास तयार होतील. तसेच अनेक छोटे शेतकरी व शेतमजूर दुसऱ्याची शेती कसायला घेतात; परंतु त्यांना त्या जमिनीवर पीक कर्ज मिळत नाही. पीक विमा, नुकसान भरपाई अथवा अनुदान मिळविण्यासाठी पात्र राहत नाहीत. यासाठी जमिनीचे करार कायदेशीर करून मूळमालकाचे अधिकार आबादित ठेवून कसणाऱ्यालाही दिलासा देण्याचे काम या नवीन धोरणामुळे होणार असल्याच्या सूचना त्यांनी माडल्या. सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, बिहारचे खासदार के. सी. त्यागी, माजी मंत्री रेणुका चौधरी यांच्यासह नीती आयोगाचे अधिकारी, महसूल विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)