शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारास घोषवाक्यांची ‘क्रेझ’

By admin | Updated: September 16, 2014 00:08 IST

तरुणाईचा कानोसा : अपडेट अन् लाईकचा लेखाजोखा; नेत्यांचीही सोशलगिरी

संतोष पाटील- कोल्हापूर -यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारास अत्यंत कमी वेळ मिळणार आहे. आचारसंहिता सुरू झाल्यापासूनच इच्छुकांनी अल्पखर्चात मतदारांपर्यंत पोहोचविणाऱ्या सोशल मीडियाचा जोरात वापर सुरू केला आहे. सर्वच प्रमुख उमेदवारांनी नावापेक्षा घोषवाक्याला प्राधान्य दिले आहे. ‘तुम्ही माझ्या बरोबर’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘हक्काचा माणूस’, ‘साधा माणूस’, अशी बिरुदावली असलेली घोषवाक्ये सोशल मीडियात फिरत आहेत. अनेकांनी सोशल मीडिया सेलची निर्मिती केली, जुने फोटो व प्रचाराच्या अपडेटला मिळणाऱ्या हिटस् व लाईकचा लेखाजोखा मांडला जातोय. निवडणूक ज्वर वाढेल, तशी नेत्यांची सोशलगिरीही वाढणार आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपणच विकास करण्यासाठी कसे योग्य उमेदवार आहोत. नेत्यांसह कार्यकर्त्यांची फेसबुक, वॉटस् अ‍ॅपसारखी माध्यमे सुसाट वेगाने धावत आहेत. यावर प्रशासन मात्र बारकाईने लक्ष ठेवून आहे.निवडणुकीच्या काळात इतरवेळी दुर्मीळ असलेल्या नेत्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून का असेना, जनतेला नित्यनियमाने दर्शन घडते. कमी कालावधीत फुकटच्या प्रचारासाठी कॉम्प्युटर ज्ञानात कच्चे असणाऱ्यांनी खास लोकांना पाचारण केले आहे. सोशल मीडियावरून येणाऱ्या सूचना व समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहे. आंदोलने, मोर्चा, विकासकामे, आवाहन, शुभेच्छा, सोडविलेल्या समस्या, आदींबरोबरच माहिती देण्याबरोबरच कार्यकर्ते जमविण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहेत. एक गठ्ठा ‘एसएमएस’वर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. निवडणूक आचारसंहिता व समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले जाऊ नयेत, तसेच अशा प्रकारचा कोणी आगाऊपणा केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी स्वतंत्र ‘सोशल मीडिया सेल’ स्थापन केला आहे. समाजस्वास्थ्य बिघडविणारे किंवा एखाद्याचे जाणीवपूर्वक चारित्रहनन करणाऱ्या मेसेजबाबत माहिती मिळाल्यास निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा. - राजाराम माने, जिल्हाधिकारी