शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारास घोषवाक्यांची ‘क्रेझ’

By admin | Updated: September 16, 2014 00:08 IST

तरुणाईचा कानोसा : अपडेट अन् लाईकचा लेखाजोखा; नेत्यांचीही सोशलगिरी

संतोष पाटील- कोल्हापूर -यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारास अत्यंत कमी वेळ मिळणार आहे. आचारसंहिता सुरू झाल्यापासूनच इच्छुकांनी अल्पखर्चात मतदारांपर्यंत पोहोचविणाऱ्या सोशल मीडियाचा जोरात वापर सुरू केला आहे. सर्वच प्रमुख उमेदवारांनी नावापेक्षा घोषवाक्याला प्राधान्य दिले आहे. ‘तुम्ही माझ्या बरोबर’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘हक्काचा माणूस’, ‘साधा माणूस’, अशी बिरुदावली असलेली घोषवाक्ये सोशल मीडियात फिरत आहेत. अनेकांनी सोशल मीडिया सेलची निर्मिती केली, जुने फोटो व प्रचाराच्या अपडेटला मिळणाऱ्या हिटस् व लाईकचा लेखाजोखा मांडला जातोय. निवडणूक ज्वर वाढेल, तशी नेत्यांची सोशलगिरीही वाढणार आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपणच विकास करण्यासाठी कसे योग्य उमेदवार आहोत. नेत्यांसह कार्यकर्त्यांची फेसबुक, वॉटस् अ‍ॅपसारखी माध्यमे सुसाट वेगाने धावत आहेत. यावर प्रशासन मात्र बारकाईने लक्ष ठेवून आहे.निवडणुकीच्या काळात इतरवेळी दुर्मीळ असलेल्या नेत्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून का असेना, जनतेला नित्यनियमाने दर्शन घडते. कमी कालावधीत फुकटच्या प्रचारासाठी कॉम्प्युटर ज्ञानात कच्चे असणाऱ्यांनी खास लोकांना पाचारण केले आहे. सोशल मीडियावरून येणाऱ्या सूचना व समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहे. आंदोलने, मोर्चा, विकासकामे, आवाहन, शुभेच्छा, सोडविलेल्या समस्या, आदींबरोबरच माहिती देण्याबरोबरच कार्यकर्ते जमविण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहेत. एक गठ्ठा ‘एसएमएस’वर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. निवडणूक आचारसंहिता व समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले जाऊ नयेत, तसेच अशा प्रकारचा कोणी आगाऊपणा केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी स्वतंत्र ‘सोशल मीडिया सेल’ स्थापन केला आहे. समाजस्वास्थ्य बिघडविणारे किंवा एखाद्याचे जाणीवपूर्वक चारित्रहनन करणाऱ्या मेसेजबाबत माहिती मिळाल्यास निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा. - राजाराम माने, जिल्हाधिकारी