शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

आजऱ्यातील १६ गावांनी काेरोनाला रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:23 IST

आजरा : आजरा तालुक्यातील १६ गावांमध्ये गेल्या दीड वर्षात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. मुंबई, पुणे यासह बाहेरून आलेल्या नागरिकांचे ...

आजरा : आजरा तालुक्यातील १६ गावांमध्ये गेल्या दीड वर्षात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. मुंबई, पुणे यासह बाहेरून आलेल्या नागरिकांचे शाळा व मंदिरात केलेले अलगीकरण, गावातील दैनंदिन स्वच्छता व प्रबोधन, मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वेळेतच थांबविण्यात यश मिळाले आहे.

तालुक्यात ७४ महसुली गावे आहेत, तर लोकसंख्या एक लाख २० हजारांच्या दरम्यान आहे. दीड वर्षापूर्वी आलेल्या कोरोनाचे तालुक्यातील ४८ नागरिक बळी पडले आहेत, तर १०१९ जण कोरोनाचे पॉझिटिव्ह होते. तालुक्यात सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता; पण मुंबई, पुणे यासह अन्य ठिकाणांहून आलेल्या चाकरमान्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. किमान १० ते २०० पर्यंत गावागावांत पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. मात्र, उपचारानंतर ते बरे झाले.

लॉकडाऊनंतर आलेल्या नागरिकांना शाळा, देवालये, वसतिगृहात योग्य नियोजन करून अलगीकरण, गावातील स्वच्छता, मास्क व सॅनिटायझरचा वापर, संस्कार वाहिनीवरून दैनंदिन प्रबोधन, ५० वर्षांवरील नागरिकांना आयुर्वेदिक औषधांचा पुरवठा, दररोज तापमाप व ऑक्सिजन पातळी तपासणे याचे चांगले नियोजन केल्यामुळे १६ गावांना कोरोनाला वेशीतच रोखणे शक्य झाले. कोरोनाविना असलेल्या १६ गावांत चाकरमानी कोरोना काळात जवळपास ३० ते ३५ टक्के आले. अनेक चाकरमानी शेतातील घरातच राहिले. गणपती, दिवाळी, होळीसह अन्य सणासाठी आलेल्या चाकरमान्यांपासून ग्रामस्थांनी सुरक्षितता घेतली. अशा चाकरमान्यांना सात दिवस अलगीकरणात ठेवले. त्यांना घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध घातले. त्यामुळे १६ गावांना कोरोना रोखण्यात यश आले.

--------------------------

*

कोरोनाविना १६ गावे व त्यांची लोकसंख्या कंसात

* कोरीवडे (८६१), कागीनवाडी (२७८), सावरवाडी (१२३), यमेकोंड (७११), जेऊर (४०२), भावेवाडी (४९२), महागोंडवाडी (३५९), मोरेवाडी (४७३), खानापूर (७८१), पेढेवाडी (१४४), शेळप (७२५), देऊळवाडी (२६५), सातेवाडी (२४१), सुळेरान (१२०७), आंबाडे (५०४), किटवडे (९७४) --------------------------

कोरोना रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने केलेले योग्य नियोजन, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन यामुळेच कोरोनाचा शिरकाव थोपवू शकलो.

- नंदा शंकर पोतनीस, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत देऊळवाडी-सातेवाडी.

--------------------------