शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

अकरावी प्रवेश प्रक्रियेचे ६ लाख पडूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:05 IST

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपून दोन महिने उलटले, तरी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे गत वर्षाची शिल्लक असलेली ५ लाख ८७ हजार रुपयांची रक्कम विद्यार्थ्यांना परत देण्याबाबत निर्णय झालेला नाही. याबाबत प्रवेश प्रक्रिया समिती आणि डावी आघाडी, आॅल इंडिया स्टुडंट्स, यूथ फेडरेशनचे (एआयवायएफ) शिष्टमंडळ यांची संयुक्त ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपून दोन महिने उलटले, तरी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे गत वर्षाची शिल्लक असलेली ५ लाख ८७ हजार रुपयांची रक्कम विद्यार्थ्यांना परत देण्याबाबत निर्णय झालेला नाही. याबाबत प्रवेश प्रक्रिया समिती आणि डावी आघाडी, आॅल इंडिया स्टुडंट्स, यूथ फेडरेशनचे (एआयवायएफ) शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक होण्याच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत.केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे गेल्यावर्षीच्या प्रवेशपत्रातून जमा झालेल्या शुल्काची रक्कम शिल्लक असतानाही यावर्षी प्रवेशपत्राची किंमत ८० रुपये केली. त्याऐवजी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र विनामूल्य द्यावे. विनाअनुदानित तुकड्यांचे प्रवेश शुल्क कमी करावे, या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी प्रवेश अर्ज वितरण आणि संकलनाच्या पहिल्या दिवशी २५ जूनला कॉमर्स कॉलेज केंद्रावरील प्रक्रिया बंद पाडली. दोन दिवसांनी आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ आणि प्रभारी शिक्षण उपसंचालक किरण लोहार यांची बैठक झाली. त्यात लोहार यांनी, ‘गेल्यावर्षी प्रवेश अर्ज विक्रीतून जमा झालेल्या रकमेपैकी ५ लाख ८७ हजार रुपये शिल्लक आहेत. ही रक्कम परत करण्याचे नियोजन यावर्षीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केले जाईल,’ असे सांगितले होते. मात्र, त्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही....अन्यथा तीव्र आंदोलनशिल्लक रक्कम विद्यार्थ्यांना परत देण्याच्या मागणीवरून आम्ही आंदोलन सुरू केले. त्यावर ऐन प्रवेश प्रक्रियेदरम्यान आंदोलन करू नये, असे आवाहन समितीने केले. त्यासह प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिल्लक रक्कम विद्यार्थ्यांना परत देण्याबाबत आॅगस्टमध्ये संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी ग्वाही समितीने दिली होती. मात्र, अद्यापही संयुक्त बैठकीसाठी आम्हाला बोलाविलेले नसल्याचे ‘एआयवायएफ’चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश फोंडे यांनी सांगितले. ते म्हणाले, आश्वासन न पाळल्याने या समितीचा निषेध करीत आहोत. संयुक्त लवकर बैठक घ्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.‘त्या’ विद्यार्थ्यांचा विचार व्हावाअर्ज संकलित करणाऱ्या आणि प्रत्यक्षात प्रवेशित होणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत साडेचार हजारांचा फरक आहे. ज्यांनी प्रवेश घेतला नाही, त्यांना पैसे कशा पद्धतीने परत द्यावयाचे याचा विचार समितीने करणे आवश्यक आहे. पैसे परत देण्याची प्रक्रिया राबविणे शक्य नसल्यास पुढील वर्षी समितीने अर्ज विनामूल्य अथवा कमी शुल्कामध्ये द्यावेत.गेल्या दोन वर्षांतील आकडेवारी (हजारात)सन अर्ज विक्री संकलित अर्ज प्रवेशित विद्यार्थी२०१७ १३२९० १२४८१ ७४०९२०१८ १४६२३ १२७०१ ७८२२