शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

सहा कोटी आमदार निधी मागी

By admin | Updated: July 24, 2014 00:18 IST

निवडणुकांचे वेध : सर्वाधिक नरके, तर सर्वांत कमी कुपेकर यांनी खर्च केली रक्कर्म

प्रवीण देसाई -कोल्हापूरया विधानसभेचा २०१४-१५ या वर्षातील कार्यकाळ (एप्रिल ते आॅक्टोबर २०१४) असा सात महिन्यांचा आहे. ३० एप्रिलला झालेल्या शासन निर्णयानुसार सात महिन्यांसाठी आमदारांना एक कोटी १६ लाख ६६ हजार इतका निधी देण्यात आला; परंतु काही आमदारांनी केलेल्या मागणीचा विचार करून दरवर्षी देण्यात येणाऱ्या निधीइतका म्हणजे प्रत्येक आमदाराला दोन कोटी रुपये निधी शासनाने मंजूर केला. पूर्वीच्या निर्णयाला स्थगिती देऊन हा नवीन शासन निर्णय १० जूनला जाहीर करण्यात आला.त्यानुसार जिल्ह्यातील आमदारांना १४ कोटी ७० लाख ५० हजार इतका निधी मिळाला आहे. गतवर्षी दीडपटी वावाच्या मर्यादेत काही आमदारांनी निधी खर्च केला होता. (उदा. दोन कोटींच्या तुलनेत अडीच किंवा तीन कोटींचा निधी खर्च करणे.) त्यामुळे आता मिळालेल्या दोन कोटींमधून पूर्वी खर्च केलेले पैसे वजा करूनच उर्वरित निधी आमदारांना मिळाला आहे. प्राप्त निधीपैकी सर्वांत जास्त निधी करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी खर्च केला आहे. त्यांनी एक कोटी २९ लाख १६ हजार रुपयांपैकी एक कोटी दहा लाख नऊ हजार रुपये विविध विकासकामांवर खर्च केले आहेत. शिरोळचे आमदार डॉ. सा. रे. पाटील यांनी एक कोटी दहा लाखांपैकी ७८ लाख ७९ हजार रुपये निधी खर्च केला आहे. कागलचे आमदार तथा जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक कोटी ११ लाख २९ हजारांपैकी ७४ लाख ९० हजार रुपये, कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी एक कोटी २० लाख ९७ हजारांपैकी ६८ लाख १८ हजार रुपये, कोल्हापूर दक्षिणचे आमदार तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एक कोटी २६ लाख ४२ हजार रुपयांपैकी ६६ लाख २० हजार रुपये, हातकणंगलेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी एक कोटी १४ लाख ८५ हजारांपैकी ५१ लाख १८ हजार ७६४ रुपये, इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी एक कोटी १४ लाख ८५ हजारांपैकी ४९ लाख ३० हजार ८९६ रुपये, राधानगरीचे आमदार के. पी. पाटील यांनी एक कोटी ३३ लाख ८९ हजारांपैकी ४४ लाख ४० हजार रुपये, शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी ३१ लाख ३५ हजार रुपये, चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी चार लाख ९९ हजार रुपये निधी खर्च केला आहे.जिल्ह्यातील बारा आमदारांनी मिळालेल्या निधीपैकी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी विकासकामांवर खर्च केला आहे. यामध्ये सर्वाधिक करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी एक कोटी दहा लाख नऊ हजार रुपये, तर सर्वांत कमी चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी चार लाख ९९ हजार रुपये खर्च केले आहेत.-आमदारांच्या मागणीनुसार सात महिन्यांच्या कालावधीसाठी दोन कोटींचा निधी-हा नवीन शासन निर्णय १० जूनला जाहीर करण्यात आला.-दीडपटी वावाच्या मर्यादेतील निधी वगळून मिळाला एकूण १४ कोटी ७० लाख ५० हजार इतका निधी.