शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

बैठे पथक म्हणजे, ‘एकमेका साह्य करु...’

By admin | Updated: February 28, 2017 00:25 IST

एकाच क्षेत्रात काम करणारे शिक्षक कर्मचारी सगळ्यांनाच उत्कृष्ठ निकालाची अपेक्षा. सगळेच परिचयातील.

संदीप बावचे-- जयसिंगपूरकचरा विल्हेवाटीचा मोठा प्रश्न जयसिंगपूर पालिकेसमोर आहे. सध्या चिपरी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे कचऱ्याचा प्रश्नदेखील पालिकेसमोर ‘आ’ वासून उभा राहिला आहे. कचरा टाकणे आणि त्याची विल्हेवाट यासाठी पालिकेने पर्याय शोधून नवीन जागेबरोबर घनकचरा प्रकल्प राबविण्याच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेतला आहे. येणाऱ्या काळात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनण्याअगोदर त्याचे नियोजन पालिका करीत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींबरोबर शासनाच्या सहकार्याची गरज भासणार आहे. चिपरी हद्दीत मिळालेल्या दोन एकर जागेवर गेल्या तीन वर्षांपासून जयसिंगपूर नगरपालिकेकडून शहरातील घणकचरा, मृत जनावरे टाकण्यात येत होती. खाणीतील दुर्गंधीचा त्रास परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना जाणवू लागल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी १ जानेवारी २०१७ पासून चिपरी हद्दीतील खाणीत कचरा टाकण्यास विरोध केला होता. जयसिंगपूरच्या कचऱ्याला विरोध म्हणून कचरा डेपोसमोर चरखुदाई करून रस्ता बंद केला. दरम्यान, कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे सध्या पर्यायी जागाच उपलब्ध नसल्यामुळे पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींसमोर आव्हान उभे राहिले होते. गेल्या दोन महिन्यांपासून खामकर मळ्यातील जुन्या विहिरीत कचरा टाकला जात आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात भविष्यातील अडचणी ओळखून कचरा डेपोच्या भूसंपादनासाठी पाच कोटी रुपयाची तरतूद झाली आहे. त्याचबरोबर घनकचरा प्रकल्प राबविण्याच्या दृष्टिकोनातून चार कोटी रुपयांची तरतूद देखील अर्थसंकल्पात केली आहे. एकूणच शहराला भेडसावणाऱ्या अडचणीला रोखण्यासाठी पालिकेने कचऱ्याचे नियोजन आखले आहे. पाठपुरावा गरजेचाघनकचरा प्रकल्प राबवायचा झाल्यास त्यासाठी सपाटीकरण असलेली जागा महत्त्वाची बाब आहे. या प्रकल्पांतर्गत वीजनिर्मिती, खतनिर्मिती त्याचबरोबर प्लास्टिकपासून फर्नेस आॅईल यासह अनेक प्रक्रियांचे पर्याय आहेत. हा प्रकल्प राबविण्यासाठी प्रथम आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यानंतर त्याचा प्रस्ताव शासनाला सादर करावा लागणार आहे. पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा पाठपुरावा महत्त्वाचा आहे. तरच हा प्रकल्प येणाऱ्या काळात यशस्वी होऊ शकतो. शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार पाहता कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागेबरोबरच घनकचरा प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. पालिकेच्या अर्थसंल्पात सुमारे नऊ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचे नियोजन लवकरच केले जाणार आहे. - हेमंत निकम, मुख्याधिकारी, जयसिंगपूरन्यायालयीन वादजयसिंगपूर शहरातील कचरा सांगली-कोल्हापूर महामार्गावरील धर्मनगरजवळ सुरुवातीला टाकला जात होता. त्यानंतर नांदणी नाक्याजवळील खाणीत कचरा टाकण्यावरून नागरिकांचा विरोध झाला. शहरात बंद अवस्थेत असणाऱ्या विहिरीत कचरा टाकून त्या बुजविण्यात आल्या. त्यानंतर कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने चिपरी गावच्या हद्दीतही कचरा टाकण्यास विरोध झाल्याने सध्या न्यायालयीन वाद सुरू आहे. एकूणच शहरातील कचरा टाकण्याचा प्रश्न सध्यातरी गंभीर आहे.