शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात कचरा प्रकल्पासाठी जागेचा शोध

By admin | Updated: March 19, 2017 23:43 IST

पालिकेला हवी पाच एकर जमीन : कचरा प्रश्न ऐरणीवर येणार

संदीप बावचे -- जयसिंगपूर शहरातील कचरा टाकणे आणि त्याची विल्हेवाट करणे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येत आहे. सध्या ज्या खासगी ठिकाणी खासगी विहिरीत कचरा टाकण्यात येतो, ती विहीर भरत आली आहे. त्यामुळे येणाऱ्या १५ दिवसांत कचरा टाकण्याचा प्रश्न पुढे येणार आहे. पोलिस बंदोबस्तात कचरा टाकण्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतल्यानंतर त्यावर चिपरी ग्रामस्थांतून पडसाद उमटले होते. कचरा टाकल्यास व्यापक आंदोलन करण्याचा इशारा चिपरी ग्रामस्थांनी दिला होता. या सर्व अडचणींमुळे पालिकेने पुढाकार घेत कचरा प्रकल्पासाठी जागेचा शोध सुरू केला आहे. १ जानेवारी २०१७ पासून चिपरी हद्दीतील खाणीत कचरा टाकण्यास विरोध झाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून खामकर मळ्यातील जुन्या विहिरीत कचरा टाकला जात आहे. तात्पुरता पर्याय पालिकेने शोधला आहे. सध्या कचरा टाकण्यात येत असलेली विहीर भरत आली आहे. येत्या १५ दिवसांत कचरा टाकण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे पालिकेला कचरा टाकण्यासाठी पुन्हा जागा शोधावी लागणार आहे. कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने चिपरी गावच्या हद्दीतही कचरा टाकण्यास विरोध झाल्याने सध्या न्यायालयीन वाद सुरू आहे. त्यातच जयसिंगपूर नगरपालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात कचरा टाकण्याची भुमिका घेतल्यानंतर चिपरी ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना उमटल्या होत्या. पोलिस बंदोबस्तात पुन्हा कचरा टाकण्याचा प्रयत्न झाल्यास जनआंदोलन उभारू, अशी भूमिका चिपरी ग्रामस्थांनी जाहीर केली होती. एकूणच शहरातील कचरा टाकण्याचा प्रश्न सध्यातरी गंभीर आहे. जमिनीचा शोधनुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात कचरा डेपोच्या भूसंपादनासाठी पाच कोटी, तर घनकचरा प्रकल्प राबविण्याच्या दृष्टिकोनातून चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरात दररोज निर्माण होणारा ओला व सुका कचरा प्रक्रिया करणे. त्याचबरोबर सपाटीकरण जमिनीसाठी शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जमिनीचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी पालिकेने अशी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी अथवा मिळकतधारकांनी कागदपत्रांसह पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ओल्या व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सपाटीकरण जमिनीची गरज आहे. त्यामुळे अशी जमीन पालिकेकडून शोधली जात आहे. डोंगराळ, खडकाची, खारफुटीची असणारी जमीन या प्रकल्पासाठी गरजेची आहे. किमान २० ते २५ वर्षांपर्यंत प्रक्रिया करणे व भूभरावासाठी उपयोगात असणारी जमीन असणे गरजेची आहे.- हेमंत निकम, मुख्याधिकारी जयसिंगपूर