शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, माझं तेवढं काम करा की...

By admin | Updated: November 6, 2014 00:37 IST

उमेदवारांचा ‘वशिल्या’चा प्रयत्न : जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य यांच्याकडे गर्दी

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेच्या ‘वर्ग-३’, ‘वर्ग-४’च्या १९४ जागांसाठी भरती प्रक्रियेला वेग आला आहे. सर्वच पदांसाठी उमेदवारांची संख्या मोठी आहे. सरळसेवा पद्धतीने परीक्षेतील गुणवत्ता (मेरिट)नुसार निवड होणार आहे. तरीही बहुतांश उमेदवार ‘वशिला’ कोठे लावता येतो का, याची चाचपणी करीत आहेत. यातूनच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांना भेटून परीक्षार्थी ‘साहेब, माझं तेवढं काम करा की!’ असं साकडं घालत आहेत. ‘काय द्यायचं झाल्यास देऊ; तेवढं काम करा,’ असे म्हणण्यापर्यंत काहीजणांची मजल गेली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती यांच्या कक्षांत गर्दी होत आहे. थेट घरी जाऊनही भेट घेऊन वशिला लावला जात आहे. जिल्हा परिषदेने २० आॅगस्टपासून रिक्त असलेल्या विविध विभागांतील रिक्त १९४ पदांची जम्बो नोकरभरती प्रक्रिया सुरू केली. यासाठी तब्बल १८ हजार ३९८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.जागा कमी आणि उमेदवारांची संख्या प्रचंड असे चित्र आहे. यामुळे प्रचंड रस्सीखेच आहे. शिपाई पदासाठीही उच्चशिक्षितांनी अर्ज केले आहेत. काम करण्याची खात्री असल्यास पैसे देण्याची तयारीही काहीजणांनी केली आहे. मात्र, जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली या परीक्षा होत आहेत. परीक्षेतील गुणवत्तेनुसार भरती होणार आहे. त्यामुळे गुणवत्तेमध्ये नसताना कोणत्या पदासाठी भरती होऊ शकत नाही. जाहिरातीमध्ये या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. तरीही अभ्यास करण्याचे कष्ट न घेता, विनाकष्ट नोकरी धरण्यासाठी शॉर्टकट मार्ग मिळतो का, याचा शोध घेतला जात आहे. वशिला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे जिल्हा परिषदेत दलालांची वर्दळ वाढली आहे. ते पदाधिकारी, सदस्य यांची भेट घेऊन विनवण्या करीत आहेत. अपवाद वगळता बहुतांश सदस्य मन दुखवायचे नाही, योगायोगाने झालेच तर मीच केले असे सांगण्यासाठी निवडीसाठी गुणवत्ता (मेरिट) हवे, अभ्यास करा असे न सांगता करूया, बघू या, अधिकाऱ्यांना बोलतो, अशी आश्वासने देत आहेत. झाले तर माझ्यामुळे...‘झाले तर माझ्यामुळे; नाही झाले तर मेरिटमध्ये बसले नाही, मी काय करू?’ असा पवित्रा घेण्यासाठी काही पदाधिकारी, सदस्य उमेदवारांना बघूया, करूया, सांगतो, असे उत्तर देत आहेत. दरम्यान, उमेदवारांनी वशिल्याच्या पाठीमागे न लागता, अभ्यासाच्या पाठीमागे लागावे असे सांगण्याची तसदी घेतली जात नसल्याचे वास्तव आहे. नोकरभरतीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. कोठे चुकीचे घडले, त्रुटी राहिल्यास काहींनी न्यायालयात जाण्याची तयारीही केली आहे. यामुळे प्रशासनाकडून नियमांवर बोट ठेवून भरती प्रक्रिया करण्याला प्राधान्य दिले जात आहे.