शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

साहेब, माझं तेवढं काम करा की...

By admin | Updated: November 6, 2014 00:37 IST

उमेदवारांचा ‘वशिल्या’चा प्रयत्न : जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य यांच्याकडे गर्दी

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेच्या ‘वर्ग-३’, ‘वर्ग-४’च्या १९४ जागांसाठी भरती प्रक्रियेला वेग आला आहे. सर्वच पदांसाठी उमेदवारांची संख्या मोठी आहे. सरळसेवा पद्धतीने परीक्षेतील गुणवत्ता (मेरिट)नुसार निवड होणार आहे. तरीही बहुतांश उमेदवार ‘वशिला’ कोठे लावता येतो का, याची चाचपणी करीत आहेत. यातूनच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांना भेटून परीक्षार्थी ‘साहेब, माझं तेवढं काम करा की!’ असं साकडं घालत आहेत. ‘काय द्यायचं झाल्यास देऊ; तेवढं काम करा,’ असे म्हणण्यापर्यंत काहीजणांची मजल गेली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती यांच्या कक्षांत गर्दी होत आहे. थेट घरी जाऊनही भेट घेऊन वशिला लावला जात आहे. जिल्हा परिषदेने २० आॅगस्टपासून रिक्त असलेल्या विविध विभागांतील रिक्त १९४ पदांची जम्बो नोकरभरती प्रक्रिया सुरू केली. यासाठी तब्बल १८ हजार ३९८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.जागा कमी आणि उमेदवारांची संख्या प्रचंड असे चित्र आहे. यामुळे प्रचंड रस्सीखेच आहे. शिपाई पदासाठीही उच्चशिक्षितांनी अर्ज केले आहेत. काम करण्याची खात्री असल्यास पैसे देण्याची तयारीही काहीजणांनी केली आहे. मात्र, जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली या परीक्षा होत आहेत. परीक्षेतील गुणवत्तेनुसार भरती होणार आहे. त्यामुळे गुणवत्तेमध्ये नसताना कोणत्या पदासाठी भरती होऊ शकत नाही. जाहिरातीमध्ये या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. तरीही अभ्यास करण्याचे कष्ट न घेता, विनाकष्ट नोकरी धरण्यासाठी शॉर्टकट मार्ग मिळतो का, याचा शोध घेतला जात आहे. वशिला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे जिल्हा परिषदेत दलालांची वर्दळ वाढली आहे. ते पदाधिकारी, सदस्य यांची भेट घेऊन विनवण्या करीत आहेत. अपवाद वगळता बहुतांश सदस्य मन दुखवायचे नाही, योगायोगाने झालेच तर मीच केले असे सांगण्यासाठी निवडीसाठी गुणवत्ता (मेरिट) हवे, अभ्यास करा असे न सांगता करूया, बघू या, अधिकाऱ्यांना बोलतो, अशी आश्वासने देत आहेत. झाले तर माझ्यामुळे...‘झाले तर माझ्यामुळे; नाही झाले तर मेरिटमध्ये बसले नाही, मी काय करू?’ असा पवित्रा घेण्यासाठी काही पदाधिकारी, सदस्य उमेदवारांना बघूया, करूया, सांगतो, असे उत्तर देत आहेत. दरम्यान, उमेदवारांनी वशिल्याच्या पाठीमागे न लागता, अभ्यासाच्या पाठीमागे लागावे असे सांगण्याची तसदी घेतली जात नसल्याचे वास्तव आहे. नोकरभरतीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. कोठे चुकीचे घडले, त्रुटी राहिल्यास काहींनी न्यायालयात जाण्याची तयारीही केली आहे. यामुळे प्रशासनाकडून नियमांवर बोट ठेवून भरती प्रक्रिया करण्याला प्राधान्य दिले जात आहे.