शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

साहेब, माझं तेवढं काम करा की...

By admin | Updated: November 6, 2014 00:37 IST

उमेदवारांचा ‘वशिल्या’चा प्रयत्न : जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य यांच्याकडे गर्दी

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेच्या ‘वर्ग-३’, ‘वर्ग-४’च्या १९४ जागांसाठी भरती प्रक्रियेला वेग आला आहे. सर्वच पदांसाठी उमेदवारांची संख्या मोठी आहे. सरळसेवा पद्धतीने परीक्षेतील गुणवत्ता (मेरिट)नुसार निवड होणार आहे. तरीही बहुतांश उमेदवार ‘वशिला’ कोठे लावता येतो का, याची चाचपणी करीत आहेत. यातूनच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांना भेटून परीक्षार्थी ‘साहेब, माझं तेवढं काम करा की!’ असं साकडं घालत आहेत. ‘काय द्यायचं झाल्यास देऊ; तेवढं काम करा,’ असे म्हणण्यापर्यंत काहीजणांची मजल गेली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती यांच्या कक्षांत गर्दी होत आहे. थेट घरी जाऊनही भेट घेऊन वशिला लावला जात आहे. जिल्हा परिषदेने २० आॅगस्टपासून रिक्त असलेल्या विविध विभागांतील रिक्त १९४ पदांची जम्बो नोकरभरती प्रक्रिया सुरू केली. यासाठी तब्बल १८ हजार ३९८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.जागा कमी आणि उमेदवारांची संख्या प्रचंड असे चित्र आहे. यामुळे प्रचंड रस्सीखेच आहे. शिपाई पदासाठीही उच्चशिक्षितांनी अर्ज केले आहेत. काम करण्याची खात्री असल्यास पैसे देण्याची तयारीही काहीजणांनी केली आहे. मात्र, जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली या परीक्षा होत आहेत. परीक्षेतील गुणवत्तेनुसार भरती होणार आहे. त्यामुळे गुणवत्तेमध्ये नसताना कोणत्या पदासाठी भरती होऊ शकत नाही. जाहिरातीमध्ये या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. तरीही अभ्यास करण्याचे कष्ट न घेता, विनाकष्ट नोकरी धरण्यासाठी शॉर्टकट मार्ग मिळतो का, याचा शोध घेतला जात आहे. वशिला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे जिल्हा परिषदेत दलालांची वर्दळ वाढली आहे. ते पदाधिकारी, सदस्य यांची भेट घेऊन विनवण्या करीत आहेत. अपवाद वगळता बहुतांश सदस्य मन दुखवायचे नाही, योगायोगाने झालेच तर मीच केले असे सांगण्यासाठी निवडीसाठी गुणवत्ता (मेरिट) हवे, अभ्यास करा असे न सांगता करूया, बघू या, अधिकाऱ्यांना बोलतो, अशी आश्वासने देत आहेत. झाले तर माझ्यामुळे...‘झाले तर माझ्यामुळे; नाही झाले तर मेरिटमध्ये बसले नाही, मी काय करू?’ असा पवित्रा घेण्यासाठी काही पदाधिकारी, सदस्य उमेदवारांना बघूया, करूया, सांगतो, असे उत्तर देत आहेत. दरम्यान, उमेदवारांनी वशिल्याच्या पाठीमागे न लागता, अभ्यासाच्या पाठीमागे लागावे असे सांगण्याची तसदी घेतली जात नसल्याचे वास्तव आहे. नोकरभरतीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. कोठे चुकीचे घडले, त्रुटी राहिल्यास काहींनी न्यायालयात जाण्याची तयारीही केली आहे. यामुळे प्रशासनाकडून नियमांवर बोट ठेवून भरती प्रक्रिया करण्याला प्राधान्य दिले जात आहे.