शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

एकच पार्थिव; दोनवेळा अग्निसंस्कार!-- स्मशानभूमीच्या मरणयातना...

By admin | Updated: August 5, 2014 23:40 IST

पावसाळ्यातील चित्र : बोरखळमध्ये स्मशानभूमीअभावी उघड्यावर विधी

सुनील साबळे == शिवथर-- सातारा तालुक्यातील बोरखळ हे सुमारे चार हजार लोकवस्तीचे गाव. गावात अनेक सोयीसुविधा झाल्या; पण वैकुंठाकडे जाणारी वाट मात्र अद्याप होईना. गावात असलेल्या राजकीय गटबाजीमुळे स्मशानभूमी उभी राहू शकली नाही. यामुळे नदीकाठी उघड्यावर पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर ते वाहून गेल्याच्याही घटना घडल्या. तर काही वेळेला अर्धवट जळालेल्या मृतदेहाला दुसऱ्यांदा अग्नी देण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. स्मशानभूमीअभावी मृत्यूनंतरही मरणयातना सोसाव्या लागण्याचे दुर्दैव बोरखळकरांच्या नशिबी आले आहे.सातारा-लोणंद रस्त्यापासून चार किलोमीटर अंतरावर बोरखळ गाव आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची तर अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यात गावात कुणी मयत झाले तर कृष्णा नदीकाठी उघड्यावर अग्निसंस्कार केला जातो. निसरडा रस्ता, चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य यामधून वाट काढत पार्थिव कृष्णा नदीकाठी न्यायचे म्हणजे महाकठीण काम. स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा आहे. गावात दोन्ही गट एकाच पक्षाचे आहेत, मात्र स्मशानभूमीचा विषय निघाला की विरोधाला तोंड फुटते. मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन जाताना खराब रस्त्यामुळे ग्रामस्थांचे अतोनात हाल होतात. दोन गटांत राजकीय हेवेदावे असल्यामुळे ग्रामपंचायतीत ठराव होऊनही काम होऊ न देण्याचे घाणेरडे राजकारण केले जात आहे. जागा नसल्यामुळे स्वत:च्या कार्यक्षेत्रातही फंडाची रक्कम टाकता येत नव्हती, असे बोलले जायचे. मात्र, आता स्मशानभूमीसाठी गावातील काही जण आपली जमीन देण्यासही तयार असल्याने राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही ग्रामस्थांमधून होत आहे. गावातील स्मशानभूमीचा प्रश्न प्रामुख्याने मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच स्मशानभूमीचे काम सुरू होणार असल्याने कित्येक वर्षांचा प्रश्न आता मिटणार आहे.- माधुरी रसाळ, सरपंचगावाला स्मशानभूमी नसल्यामुळे उघड्यावर अंत्यविधी करावा लागतो. पावसाळ्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असतात. याचा गांभीर्याने विचार व्हावा.- तुकाराम ननावरे, ग्रामस्थजनसुविधा फंडातून बोरखळ गावच्या स्मशानभूमीसाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच हे काम सुरू करण्यात येणार आहे.- सतीश चव्हाण, सदस्य, जिल्हा परिषद