शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

सिंधुदुर्ग कुपोषणमुक्त करा

By admin | Updated: February 11, 2016 23:56 IST

रत्नप्रभा वळंजू : महिला व बालविकास समिती सभेत सभापतींचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने जिल्ह्यात सुरू केलेल्या संजीवन पोषण अभियानाचे चांगले परिणाम दिसू लागले असून, कणकवली, वेंगुर्ला, वैभववाडी, देवगड या चार तालुक्यांमधील ० ते ५ वयोगटातील ९० टक्केपेक्षा जास्त बालके सर्वसाधारण श्रेणीत आली आहेत. ही बाब निश्चितच समाधानकारक असल्याचे नूतन महिला व बालविकास सभापती रत्नप्रभा वळंजू यांनी सांगितले. उर्वरित चार तालुक्यांनीही जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीची सभा सभापती रत्नप्रभा वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी सदस्या वंदना किनळेकर, श्रावणी नाईक, कल्पिता मुंज, समिती सचिव तसेच जिल्हा बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्ह्यात नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या संजीवन पोषण अभियानाचा आढावा यावेळी घेण्यात आला. याबाबत अधिक माहिती देताना बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ म्हणाले की, या अभियानाचे चांगले परिणाम सध्या जिल्ह्यात दिसू लागले आहेत. या अभियानासाठी ग्रामपंचायत व समाजसेवा संस्थांनी घेतलेल्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांनी ० ते ५ वयोगटातील ९० टक्के बालके सर्वसाधारण श्रेणीत आणली आहेत. या अभियानाबाबत सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, मालवण या चार तालुक्यांमध्ये विशेष प्रयत्न केले गेले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.दोडामार्ग तालुक्यातील ४० अंगणवाड्यांच्या परसबागेत भाजीची लागवड करण्यात आली आहे. हीच भाजी मुलांना आहारात देण्यात येत असल्याचे बालविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. सभापती रत्नप्रभा वळंजू यांनी दोडामार्ग तालुक्याचा हा आदर्श अन्य तालुक्यांनी घ्यावा, असे सांगितले. संजीवन पोषण अभियानात कणकवली तालुक्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली असून, ९२.३५ टक्के बालके सर्वसाधारण गटामध्ये आली आहेत. या पाठोपाठ देवगड ९२.१९ टक्के, वैभववाडी ९१.४२ टक्के, वेंगुर्ला ९०.७४ टक्के अशाप्रकारे सर्वसाधारण गटामध्ये बालके आली आहेत. मालवण तालुक्यामध्ये ८९.९० टक्के एवढे काम झाले आहे. या पाठोपाठ कुडाळ ८८.३० टक्के, सावंतवाडी ८७.४२ टक्के काम झाले असून, दोडामार्ग तालुक्यात ८३.८८ टक्के अभियानाचे काम झाले आहे. जिल्ह्यात ० ते ५ वयोगटामध्ये ३७ हजार ५२५ बालके असून, यातील ३३ हजार ८७४ बालके सर्वसाधारण श्रेणीत आली आहेत. (प्रतिनिधी)योजना लोकाभिमुख करणारनूतन महिला व बालविकास सभापती रत्नप्रभा वळंजू यांची ही पहिलीच सभा होती. महिला व बालविकास विभागामध्ये जेवढ्या योजना आहेत, त्या लोकाभिमुख करून प्राप्त निधी सर्व योजनांवर १०० टक्के खर्च करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.