शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग कुपोषणमुक्त करा

By admin | Updated: February 11, 2016 23:56 IST

रत्नप्रभा वळंजू : महिला व बालविकास समिती सभेत सभापतींचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने जिल्ह्यात सुरू केलेल्या संजीवन पोषण अभियानाचे चांगले परिणाम दिसू लागले असून, कणकवली, वेंगुर्ला, वैभववाडी, देवगड या चार तालुक्यांमधील ० ते ५ वयोगटातील ९० टक्केपेक्षा जास्त बालके सर्वसाधारण श्रेणीत आली आहेत. ही बाब निश्चितच समाधानकारक असल्याचे नूतन महिला व बालविकास सभापती रत्नप्रभा वळंजू यांनी सांगितले. उर्वरित चार तालुक्यांनीही जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीची सभा सभापती रत्नप्रभा वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी सदस्या वंदना किनळेकर, श्रावणी नाईक, कल्पिता मुंज, समिती सचिव तसेच जिल्हा बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्ह्यात नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या संजीवन पोषण अभियानाचा आढावा यावेळी घेण्यात आला. याबाबत अधिक माहिती देताना बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ म्हणाले की, या अभियानाचे चांगले परिणाम सध्या जिल्ह्यात दिसू लागले आहेत. या अभियानासाठी ग्रामपंचायत व समाजसेवा संस्थांनी घेतलेल्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांनी ० ते ५ वयोगटातील ९० टक्के बालके सर्वसाधारण श्रेणीत आणली आहेत. या अभियानाबाबत सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, मालवण या चार तालुक्यांमध्ये विशेष प्रयत्न केले गेले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.दोडामार्ग तालुक्यातील ४० अंगणवाड्यांच्या परसबागेत भाजीची लागवड करण्यात आली आहे. हीच भाजी मुलांना आहारात देण्यात येत असल्याचे बालविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. सभापती रत्नप्रभा वळंजू यांनी दोडामार्ग तालुक्याचा हा आदर्श अन्य तालुक्यांनी घ्यावा, असे सांगितले. संजीवन पोषण अभियानात कणकवली तालुक्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली असून, ९२.३५ टक्के बालके सर्वसाधारण गटामध्ये आली आहेत. या पाठोपाठ देवगड ९२.१९ टक्के, वैभववाडी ९१.४२ टक्के, वेंगुर्ला ९०.७४ टक्के अशाप्रकारे सर्वसाधारण गटामध्ये बालके आली आहेत. मालवण तालुक्यामध्ये ८९.९० टक्के एवढे काम झाले आहे. या पाठोपाठ कुडाळ ८८.३० टक्के, सावंतवाडी ८७.४२ टक्के काम झाले असून, दोडामार्ग तालुक्यात ८३.८८ टक्के अभियानाचे काम झाले आहे. जिल्ह्यात ० ते ५ वयोगटामध्ये ३७ हजार ५२५ बालके असून, यातील ३३ हजार ८७४ बालके सर्वसाधारण श्रेणीत आली आहेत. (प्रतिनिधी)योजना लोकाभिमुख करणारनूतन महिला व बालविकास सभापती रत्नप्रभा वळंजू यांची ही पहिलीच सभा होती. महिला व बालविकास विभागामध्ये जेवढ्या योजना आहेत, त्या लोकाभिमुख करून प्राप्त निधी सर्व योजनांवर १०० टक्के खर्च करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.