शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

रौप्यनगरीत आनंदोत्सव

By admin | Updated: July 31, 2015 22:49 IST

नगरपालिकेला मंजुरी : सवाद्य मिरवणूक, गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथे नगरपरिषद स्थापन होऊन निमशहरी रौप्यनगरीचा सर्वांगीण विकास व्हावा अशी आस बाळगून गेल्या ४० वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या रौप्यनगरीवासीयांचे नगरपरिषदेचे स्वप्न अखेर गुरुवारी सत्यात उतरले. नगरपरिषदेची मंजुरी घेऊन आलेल्या आमदार डॉ. सुजित मिणचेकर, कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ, सहनिमंत्रक बाळासाहेब कांबळे यांची शुक्रवारी सकाळी वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी, ग्रामदैवत अंबाबाई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत रौप्यनगरीवासीयांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, याप्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनाची यावेळी सांगता करण्यात आली.हुपरी परिसरातील चांदी उद्योग, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीबरोबरच अनेक छोट्या- मोठ्या उद्योगांच्या उभारणीमुळे सध्या या गावची लोकसंख्या ५५ ते ६0 हजारांवर गेली आहे. ग्रामपंचायतीला इतक्या मोठ्या प्रमाणातील लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविणे अशक्य झाले आहे. परिणामी ग्रामस्थांना अनेक प्रकारच्या नागरी सोयीसुुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे याठिकाणी नगरपरिषदेची स्थापना व्हावी यासाठी सन १९७५ पूर्वीपासून प्रयत्न सुरू होते. मात्र, शासनाने या मागणीकडे काही ठरावीक घटकांच्या विरोधामुळे दुर्लक्ष केले होते. बहुतांशी नागरिकांना व राजकीय पक्षांना नगरपरिषद पाहिजे आहे. मात्र, त्यांच्यामध्ये पुढाकार कोण घेणार यावरून मतभेद होत असत. परिणामी हुपरीतील पत्रकारांनीच पुढाकार घेऊन कृती समिती निर्माण केली व गेल्या तीन महिन्यांपासून शासन दरबारी प्रयत्न चालविले होते. राज्य शासनाच्या पावसाळी अधिवेशनास १३ जुलैपासून सुरुवात होताच विविध प्रकारच्या आंदोलनास शांततेच्या मार्गाने सुरुवात केली होती. कृती समितीचा रेटा व आमदार मिणचेकर आणि आ. सुरेश हाळवणकर यांचे प्रामाणिक प्रयत्न यामुळे शासनाला नगरपरिषदेस मान्यता देणे भाग पडले. गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरीपत्रावर सही करून पत्र कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ, सहनिमंत्रक बाळासाहेब कांबळे, माजी सरपंच दौलतराव पाटील, संभाजी हांडे, सुदर्शन खाडे, बाळासाहेब रणदिवे आदींच्याकडे सुपूर्द केले. ही आनंदाची बातमी समजताच गुरुवारपासून रौप्यनगरीवासीय आनंदोत्सव साजरा करीत आहेत. शुक्रवारी सकाळी आमदार मिणचेकर व कृती समितीचे सदस्य पत्र घेऊन गावात येताच त्यांची जल्लोषी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, नानासाहेब गाठ, समाजकल्याण सभापती किरण कांबळे, मंगलराव माळगे, सरपंच दीपाली शिंदे, उपसरपंच राजेंद्र सुतार, दौलतराव पाटील, आप्पासाहेब देसाई, पुंडलिक वाईगडे, रघुनाथ नलवडे उपस्थित होते.