शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचे पालन करून मूक आंदोलन यशस्वी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST

कोल्हापूर : आचारसंहिता आणि कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून एकजुटीने आज बुधवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी होणारे मूक ...

कोल्हापूर : आचारसंहिता आणि कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून एकजुटीने आज बुधवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी होणारे मूक आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार कोल्हापुरातील सकल मराठा समाजातील समन्वयकांनी मंगळवारी केला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रण, समाधीस्थळी आणि दसरा चौक परिसरात लावलेले भगवे ध्वज, शहरातील प्रमुख चौकांमध्ये मागण्यांबाबतचे लावलेले डिजिटल फलक, अशी आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. समन्यवक, समाज बांधव-भगिनी असे सुमारे दोन हजार जण या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे.

येथील समाधीस्थळी खासदार संभाजीराजे आणि मराठा समाजातील समन्वयकांची बैठक झाली. त्यात फत्तेसिंह सावंत, अजित राऊत, बाबा इंदुलकर, प्रा. जयंत पाटील, अनिल घाटगे, आदींनी आंदोलनाच्या अनुषंगाने काही सूचना केल्या. त्यात आचारसंहितेचे पालन, सोशल डिस्टन्सिंग, भूमिका मांडण्याबाबत लोकप्रतिनिधींचा क्रम, आदींचा समावेश होता. या सर्व समन्वयकांनी आचारसंहितेचे पालन करून मूक आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला. यावेळी राजू सावंत, प्रसाद जाधव, सचिन तोडकर, चंद्रकांत पाटील, दिलीप सावंत, हर्षेल सुर्वे, किशोर घाटगे, प्रमोद पाटील, दुर्गेश लिंग्रस, लाला गायकवाड, संजय पवार, राजू लिंग्रस, सुनीता पाटील, गीता हसूरकर, राजू जाधव, जयकुमार शिंदे, सुरेश जरग आदी उपस्थित होते.

चौकट

एकजुटीने लढा देऊ या

मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने, विचाराने आरक्षणासाठी लढा देऊ या, असे आवाहन संयोगीताराजे छत्रपती यांनी केले. त्यांनी समन्वयकांना काही सूचनाही केल्या.

मागण्या अशा

१) ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, अनुदान द्यावे.

२) सारथी संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरू करावीत.

३) अण्णासाहेब पाटील महामंडळातून राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा, सहकारी बँक, आदी वित्तीय संस्थातून कर्जपुरवठा करावा.

४) पंजाबराव देशमुख वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यामध्ये वाढ करावी.

५) आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सुपर न्यूमररी जागा निर्माण कराव्यात.

६) मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कायमस्वरूपी वसतिगृहांची उभारणी करावी.