शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
2
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
3
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
4
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
5
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
6
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
7
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
8
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
9
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
10
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
11
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
12
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
13
सीएसएमटी परिसरातून अखेर दोन दिवसांनी धावली वाहने
14
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
15
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
16
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
17
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
18
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
19
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
20
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!

भूविकास बँक बंद करण्याचे संकेत

By admin | Updated: February 9, 2015 01:16 IST

चंद्रकांतदादा : कारभाराचे पुरावे देण्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये स्पर्धा

कोल्हापूर : भूविकास बॅँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने यापूर्वी १९०० कोटी दिले आहेत. आता बँक पुनर्जीवीत करण्यासाठी आणखी मदत करावी लागणार आहे, अवसायनात काढले तर शेतकरी व कामगारांचा फायदा कसा होईल, याबाबत विचारविनिमय सुरू आहे, असे सांगत राज्यातील भूविकास बँका बंद करण्याचे संकेत राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिले. सरकारमध्ये नसताना एकमेकांच्या कारभाराचे पुरावे आणून देण्यासाठी दोन्ही कॉँग्रेसमध्ये स्पर्धा लागल्याचा टोलाही त्यांनी हाणला. मंत्री पाटील म्हणाले, सरकारने गेल्या तीन महिन्यांत अनेक चांगले निर्णय घेतले. भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचे २९ महिन्यांचे पगार भागविले. या बॅँकेबाबत समितीच्या दोन बैठका झाल्या. बँक जगवायची की अवसायनात काढायची याबाबत विचारविनिमय सुरू आहे. ३८ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनी बँकेकडे तारण आहेत. शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड (ओटीएस) योजना व कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या पगारावर स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याचा विचार सुरू आहे. तीन महिन्यांत सहकारातील स्वाहाकार संपविण्याचे काम केले, जिल्हा बॅँकेसह चुकीचा कारभार सुरू असलेल्या संस्थांवर थेट कारवाई केली. आपल्या बगलबच्च्यांना सांभाळण्यासाठी संचालक मंडळाची मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या होत्या. काही ठिकाणी अशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती. त्यावर कारवाई करत सर्व ठिकाणी निवडणुका लावल्या असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. शेतीमालाला चांगला भाव मिळावा, यासाठी ‘पणन’ कार्यरत आहे, पण योग्य भाव मिळाला नाही तर तो ठेवण्याची व्यवस्था समित्यांमध्ये नाही. यासाठी वखार महामंडळ मागेल त्याला गोडावून देणार आहे. त्याचबरोबर नाशवंत मालासाठी कोल्ड स्टोरेज उभी केली जाणार आहेत.