शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

भूविकास बँक बंद करण्याचे संकेत

By admin | Updated: February 9, 2015 01:16 IST

चंद्रकांतदादा : कारभाराचे पुरावे देण्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये स्पर्धा

कोल्हापूर : भूविकास बॅँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने यापूर्वी १९०० कोटी दिले आहेत. आता बँक पुनर्जीवीत करण्यासाठी आणखी मदत करावी लागणार आहे, अवसायनात काढले तर शेतकरी व कामगारांचा फायदा कसा होईल, याबाबत विचारविनिमय सुरू आहे, असे सांगत राज्यातील भूविकास बँका बंद करण्याचे संकेत राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिले. सरकारमध्ये नसताना एकमेकांच्या कारभाराचे पुरावे आणून देण्यासाठी दोन्ही कॉँग्रेसमध्ये स्पर्धा लागल्याचा टोलाही त्यांनी हाणला. मंत्री पाटील म्हणाले, सरकारने गेल्या तीन महिन्यांत अनेक चांगले निर्णय घेतले. भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचे २९ महिन्यांचे पगार भागविले. या बॅँकेबाबत समितीच्या दोन बैठका झाल्या. बँक जगवायची की अवसायनात काढायची याबाबत विचारविनिमय सुरू आहे. ३८ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनी बँकेकडे तारण आहेत. शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड (ओटीएस) योजना व कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या पगारावर स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याचा विचार सुरू आहे. तीन महिन्यांत सहकारातील स्वाहाकार संपविण्याचे काम केले, जिल्हा बॅँकेसह चुकीचा कारभार सुरू असलेल्या संस्थांवर थेट कारवाई केली. आपल्या बगलबच्च्यांना सांभाळण्यासाठी संचालक मंडळाची मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या होत्या. काही ठिकाणी अशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती. त्यावर कारवाई करत सर्व ठिकाणी निवडणुका लावल्या असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. शेतीमालाला चांगला भाव मिळावा, यासाठी ‘पणन’ कार्यरत आहे, पण योग्य भाव मिळाला नाही तर तो ठेवण्याची व्यवस्था समित्यांमध्ये नाही. यासाठी वखार महामंडळ मागेल त्याला गोडावून देणार आहे. त्याचबरोबर नाशवंत मालासाठी कोल्ड स्टोरेज उभी केली जाणार आहेत.