शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
4
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
5
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
6
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
8
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
9
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
10
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
11
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
12
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
13
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
14
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
15
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
16
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
17
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
18
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
19
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

पर्जन्यमापक यंत्राने अर्जुनवाडला महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:18 IST

राहुल मांगूरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनवाड : केंद्रीय जल आयोगाने शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे पर्जन्यमापक यंत्र बसविल्याने गावाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. सदरच्या पर्जन्यमापकामुळे अर्जुनवाडसह परिसरात किती मिलीमीटर पाऊस झाला,याची माहिती उपग्रहाव्दारे या खात्याच्या वरिष्ठ कार्यालय पुणे, दिल्ली, हैद्राबाद आदी ठिकाणी समजणार आहे.येथे १९६९ पासून केंद्रीय जल आयोगाचे केंद्र आहे. या ...

ठळक मुद्दे राज्यात दोन ठिकाणी उभारणी : पावसाची माहिती वरिष्ठ कार्यालयास समजणारकेंद्र हे महत्त्वाचे समजले जाते.

राहुल मांगूरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनवाड : केंद्रीय जल आयोगाने शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे पर्जन्यमापक यंत्र बसविल्याने गावाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. सदरच्या पर्जन्यमापकामुळे अर्जुनवाडसह परिसरात किती मिलीमीटर पाऊस झाला,याची माहिती उपग्रहाव्दारे या खात्याच्या वरिष्ठ कार्यालय पुणे, दिल्ली, हैद्राबाद आदी ठिकाणी समजणार आहे.येथे १९६९ पासून केंद्रीय जल आयोगाचे केंद्र आहे. या केंद्राचे दत्ताजीराव कदम हायस्कूलच्या प्रांगणात पर्जन्यमापक बसविण्यासाठी नुकतीच मान्यता मिळाली होती. येथील ठेकेदार दीपक पाटील यांनी काम पूर्ण केले आहे. त्यामुळे पर्जन्यमापक त्वरीत बसविण्यात आले आहे. या खात्याचे महाराष्ट्रात महाबळेश्वर व अर्जुनवाड या दोनच ठिकाणी

पर्जन्यमापक बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अर्जुनवाड गावाला ही बाब भूषणावह ठरली आहे.येथील केंद्रीय जल आयोगाच्या केंद्राकडे पावसाळ्यात चोवीस तास पाणीपातळी चढ-उताराची नोंद घेतली जाते. पावसाळ्यात प्रतिदिन पाण्याची खोली, गती, नदीची रूंदी याची मोजमाप केली जाते. शिवाय पाण्याची तपासणीही करण्यात येते. तसेच हवेची गती, दिशा तापमानाची कमाल व किमान याची नोंद घेतली जाते. हवेतील आर्द्रताही तपासली जाते. सदरचे केंद्र हे महत्त्वाचे समजले जाते.

पर्जन्यमापक यंत्र बसविण्यासाठी जागा छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल यादव यांनी येथील दत्ताजीराव कदम हायस्कूल येथे करून दिली आहे. तर नुकतीच कार्यालयीन इमारतीसाठी जागाही ग्रामपंचायतीने मंजूर केली आहे. यासाठी कनिष्ठ अभियंता प्रदीपकुमार व उद्धव मगदूम यांचे विशेष सहकार्य व प्रयत्न लाभले आहे.केंद्र गावच्या हद्दीतसन २००५ च्या महापुरात या केंद्राच्या बोटीने गावातील किमान पाचशे नागरिकांना सुरक्षितस्थळी महापुरातून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गावच्या हिताचे केंद्र बनले आहे.