शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

पर्जन्यमापक यंत्राने अर्जुनवाडला महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:18 IST

राहुल मांगूरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनवाड : केंद्रीय जल आयोगाने शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे पर्जन्यमापक यंत्र बसविल्याने गावाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. सदरच्या पर्जन्यमापकामुळे अर्जुनवाडसह परिसरात किती मिलीमीटर पाऊस झाला,याची माहिती उपग्रहाव्दारे या खात्याच्या वरिष्ठ कार्यालय पुणे, दिल्ली, हैद्राबाद आदी ठिकाणी समजणार आहे.येथे १९६९ पासून केंद्रीय जल आयोगाचे केंद्र आहे. या ...

ठळक मुद्दे राज्यात दोन ठिकाणी उभारणी : पावसाची माहिती वरिष्ठ कार्यालयास समजणारकेंद्र हे महत्त्वाचे समजले जाते.

राहुल मांगूरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनवाड : केंद्रीय जल आयोगाने शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे पर्जन्यमापक यंत्र बसविल्याने गावाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. सदरच्या पर्जन्यमापकामुळे अर्जुनवाडसह परिसरात किती मिलीमीटर पाऊस झाला,याची माहिती उपग्रहाव्दारे या खात्याच्या वरिष्ठ कार्यालय पुणे, दिल्ली, हैद्राबाद आदी ठिकाणी समजणार आहे.येथे १९६९ पासून केंद्रीय जल आयोगाचे केंद्र आहे. या केंद्राचे दत्ताजीराव कदम हायस्कूलच्या प्रांगणात पर्जन्यमापक बसविण्यासाठी नुकतीच मान्यता मिळाली होती. येथील ठेकेदार दीपक पाटील यांनी काम पूर्ण केले आहे. त्यामुळे पर्जन्यमापक त्वरीत बसविण्यात आले आहे. या खात्याचे महाराष्ट्रात महाबळेश्वर व अर्जुनवाड या दोनच ठिकाणी

पर्जन्यमापक बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अर्जुनवाड गावाला ही बाब भूषणावह ठरली आहे.येथील केंद्रीय जल आयोगाच्या केंद्राकडे पावसाळ्यात चोवीस तास पाणीपातळी चढ-उताराची नोंद घेतली जाते. पावसाळ्यात प्रतिदिन पाण्याची खोली, गती, नदीची रूंदी याची मोजमाप केली जाते. शिवाय पाण्याची तपासणीही करण्यात येते. तसेच हवेची गती, दिशा तापमानाची कमाल व किमान याची नोंद घेतली जाते. हवेतील आर्द्रताही तपासली जाते. सदरचे केंद्र हे महत्त्वाचे समजले जाते.

पर्जन्यमापक यंत्र बसविण्यासाठी जागा छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल यादव यांनी येथील दत्ताजीराव कदम हायस्कूल येथे करून दिली आहे. तर नुकतीच कार्यालयीन इमारतीसाठी जागाही ग्रामपंचायतीने मंजूर केली आहे. यासाठी कनिष्ठ अभियंता प्रदीपकुमार व उद्धव मगदूम यांचे विशेष सहकार्य व प्रयत्न लाभले आहे.केंद्र गावच्या हद्दीतसन २००५ च्या महापुरात या केंद्राच्या बोटीने गावातील किमान पाचशे नागरिकांना सुरक्षितस्थळी महापुरातून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गावच्या हिताचे केंद्र बनले आहे.