शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पर्जन्यमापक यंत्राने अर्जुनवाडला महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:18 IST

राहुल मांगूरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनवाड : केंद्रीय जल आयोगाने शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे पर्जन्यमापक यंत्र बसविल्याने गावाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. सदरच्या पर्जन्यमापकामुळे अर्जुनवाडसह परिसरात किती मिलीमीटर पाऊस झाला,याची माहिती उपग्रहाव्दारे या खात्याच्या वरिष्ठ कार्यालय पुणे, दिल्ली, हैद्राबाद आदी ठिकाणी समजणार आहे.येथे १९६९ पासून केंद्रीय जल आयोगाचे केंद्र आहे. या ...

ठळक मुद्दे राज्यात दोन ठिकाणी उभारणी : पावसाची माहिती वरिष्ठ कार्यालयास समजणारकेंद्र हे महत्त्वाचे समजले जाते.

राहुल मांगूरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनवाड : केंद्रीय जल आयोगाने शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे पर्जन्यमापक यंत्र बसविल्याने गावाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. सदरच्या पर्जन्यमापकामुळे अर्जुनवाडसह परिसरात किती मिलीमीटर पाऊस झाला,याची माहिती उपग्रहाव्दारे या खात्याच्या वरिष्ठ कार्यालय पुणे, दिल्ली, हैद्राबाद आदी ठिकाणी समजणार आहे.येथे १९६९ पासून केंद्रीय जल आयोगाचे केंद्र आहे. या केंद्राचे दत्ताजीराव कदम हायस्कूलच्या प्रांगणात पर्जन्यमापक बसविण्यासाठी नुकतीच मान्यता मिळाली होती. येथील ठेकेदार दीपक पाटील यांनी काम पूर्ण केले आहे. त्यामुळे पर्जन्यमापक त्वरीत बसविण्यात आले आहे. या खात्याचे महाराष्ट्रात महाबळेश्वर व अर्जुनवाड या दोनच ठिकाणी

पर्जन्यमापक बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अर्जुनवाड गावाला ही बाब भूषणावह ठरली आहे.येथील केंद्रीय जल आयोगाच्या केंद्राकडे पावसाळ्यात चोवीस तास पाणीपातळी चढ-उताराची नोंद घेतली जाते. पावसाळ्यात प्रतिदिन पाण्याची खोली, गती, नदीची रूंदी याची मोजमाप केली जाते. शिवाय पाण्याची तपासणीही करण्यात येते. तसेच हवेची गती, दिशा तापमानाची कमाल व किमान याची नोंद घेतली जाते. हवेतील आर्द्रताही तपासली जाते. सदरचे केंद्र हे महत्त्वाचे समजले जाते.

पर्जन्यमापक यंत्र बसविण्यासाठी जागा छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल यादव यांनी येथील दत्ताजीराव कदम हायस्कूल येथे करून दिली आहे. तर नुकतीच कार्यालयीन इमारतीसाठी जागाही ग्रामपंचायतीने मंजूर केली आहे. यासाठी कनिष्ठ अभियंता प्रदीपकुमार व उद्धव मगदूम यांचे विशेष सहकार्य व प्रयत्न लाभले आहे.केंद्र गावच्या हद्दीतसन २००५ च्या महापुरात या केंद्राच्या बोटीने गावातील किमान पाचशे नागरिकांना सुरक्षितस्थळी महापुरातून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गावच्या हिताचे केंद्र बनले आहे.