शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

‘सिद्धाळा गार्डन’ची लढत ‘बहुरंगी’

By admin | Updated: October 21, 2015 00:09 IST

नातेवाइकांच्या मतांवर भिस्त : कोण-कोणाची मते खाणार यावर विजयाचे गणित

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील ‘सिद्धाळा गार्डन’ या प्रभागात सणगर गल्ली तालीम, बोडके तालीम, डाकवे गल्ली, बजाप माने तालीम, जासूद गल्ली, गुलाब गल्ली, शाहू बँकेसमोरील काही भागांत गठ्ठा मतदान असल्याने हे भागच निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून कल्पना चंद्रमोहन पाटील, भाजपकडून सुनंदा सुनील मोहिते, तर शिवसेनेकडून मंदा राजेंद्र पाटील व काँग्रेसच्या मयूरा राजू भोसले यांच्यातच खरी लढत आहे. हा प्रभाग पूर्वी रवी इंगवले आणि संभाजी देवणे यांच्या प्रभागात विखुरलेला होता. २००५ मध्ये या भागाचे नेतृत्व बाबा पार्टे यांनी केले होते. सध्या राष्ट्रवादीच्या उमेदवार कल्पना पाटील यांचे पती चंद्रमोहन यांचा संबंध सणगर गल्ली, बोडके तालीम या परिसरात मोठा आहे. त्यात नातेवाइकांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे पाटील यांना या निवडणुकीत अधिक पसंतीची शक्यता आहे. बाबा पार्टे यांच्या स्नुषाही या प्रभागातून इच्छुक होत्या. मात्र, त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही. शिवसेनेकडून मंदा राजेंद्र पाटील या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. गुलाब गल्ली, जासूद गल्ली येथील पाठिंब्यावर ताराराणी आघाडीकडून सुनंदा सुनील मोहिते याही रिंगणात उतरल्या आहेत. काँग्रेसकडून मयूरा राजू भोसले याही आपले नशीब आजमावत आहेत. अपक्ष म्हणून पार्टे यांच्या घराण्यातून श्रद्धा संतोष पार्टे आणि दुसऱ्या अपक्ष वैशाली गिरीष पाटील या रिंगणात आहेत. त्यांचे पती गिरीष ऊर्फ राजू हे शिवसेनेचे उपशहरप्रमुख आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मतांमध्ये विभागणीची शक्यता आहे. या सहाही उमेदवारांनी प्रचारावर जोर देत यावेळी विजय मिळवायचा अशी खूण गाठ बांधली आहे. त्यातील कल्पना पाटील, सुनंदा मोहिते, मंदा पाटील यांनी प्रचारफेऱ्यांवर भर दिला आहे, तर श्रद्धा पार्टे, वैशाली पाटील, मयूरा पाटील यांनी आपल्या नातेवाइकांसह वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला आहे. ( प्रतिनिधी)लढत फक्त निवडणुकीपुरती...मंगळवार पेठ खऱ्या अर्थाने ‘फुटबॉलपटू घडविणारी खाण’ म्हणून सर्वपरिचित आहे. प्रत्येकाची घरे अगदी खेटून आणि जुन्या कोल्हापूरची आठवण करून देणारी घरे आणि एकमेकांमध्ये असलेल्या वर्षानुवर्षांच्या सलोख्याच्या संबंधांमुळे निवडणूक कोणतीही असो, त्यातील वाद हे तात्त्विक व केवळ निवडणुकीपुरते असतात. त्यामुळे एकमेकांविरोधात लढणारी मंडळी निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रित येतात, अशी ख्याती या भागाची आहे.