शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

‘शविआ’ची कॉँग्रेसवर कुरघोडी

By admin | Updated: November 9, 2015 23:39 IST

इचलकरंजी नगरपालिकेत कलगीतुरा : शहर विकास आघाडी अल्पसंख्य असूनही काँग्रेसला त्रासदायक

राजाराम पाटील -- इचलकरंजी  -बहुमत कॉँग्रेसचे, पण अल्पसंख्य असूनही पालिकेचा कारभार शहर विकास आघाडीकडे. अशी काहीशी विचित्र परिस्थिती इचलकरंजी नगरपालिकेची झाली आहे. त्यामुळे पालिकेची सभा बोलावणे आणि नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यावरील प्रस्तावित अविश्वास ठराव यावरून ‘शविआ’ व कॉँग्रेसमध्ये शह-काटशहचे राजकारण रंगले आहे. आणि त्यानिमित्ताने दोन्ही पक्षाच्या प्रमुखांमध्ये होणारा कलगी-तुरासुद्धा रंजक ठरतो आहे.नगरपालिकेमध्ये असलेल्या ५७ नगरसेवकांपैकी २९ नगरसेवक कॉँग्रेसचे, ११ नगरसेवक राष्ट्रवादीचे आणि १७ नगरसेवक ‘शविआ’चे असे बलाबल आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादी अशी युती पालिकेत सत्तेवर आहे. या दोघांचे मिळून ४० आणि शहर विकास आघाडीचे १७ असे संख्याबळ दिसते आहे. मात्र, जानेवारी महिन्यामध्ये नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी राजीनामा दिला नाही आणि बंड केले. त्यांच्या या कृतीला ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. तेव्हा कॉँग्रेसकडे बहुमत असले तरी नगराध्यक्षांवर अविश्वास आणण्यासाठी आवश्यक असलेला ४३ सदस्यांचा संच नसल्यामुळे बिरंजे यांच्यावर अविश्वास आणता आला नाही, अशा कोंडीत कॉँग्रेस पक्ष सापडला. त्यामुळे बिरंजे यांच्याबरोबर पालिकेच्या कामकाजात मिळते-जुळते घेणे कॉँग्रेसला भाग पडले.या घटनेला दहा महिने उलटले तरी शहर विकास आघाडी, पर्यायाने नगराध्यक्षा बिरंजे यांच्याकडून कॉँग्रेसच्या नगरसेवक-नगरसेविकांना सहकार्य मिळत नाही. त्यांच्या प्रभागातील विकासकामांना खीळ बसली आहे. अशा भूमिकेतून आता कॉँग्रेसने नगराध्यक्षांना अडचणीत आणण्याचे ठरविले आहे. त्याचीच एक खेळी म्हणून नगराध्यक्षांनी शनिवारी आयोजित केलेली विशेष सभा कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील जांभळे गटाने अनुपस्थित राहून रद्द केली. त्यानिमित्ताने उभय पक्षाच्या पक्षप्रतोदांनी परस्परांवर आरोप केल्याने कलगी-तुरा रंगला आहे.‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव म्हणाले, कॉँग्रेसने व्हिप लागू करून सभा रद्द केली. म्हणजे नगरसेवकांवर कॉँग्रेसच्या श्रेष्ठींचा विश्वास नाही, असा स्पष्ट अर्थ निघतो. नगरसेवकांनीच नव्हे, तर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी विश्वास गमाविला असल्याचा यातून राजकीय अर्थ निघतो आहे. त्याचवेळी कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील म्हणाले, शहरामधील रस्ते आणि पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पाणी व रस्ते या कामांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे विषय कॉँग्रेसकडून नगराध्यक्षांना दिले. मात्र, त्यांच्या अध्यक्षीय दप्तरात पडून राहिले आहेत. याचा अर्थ नगराध्यक्षा कॉँग्रेसच्या असल्या तरी त्या कॉँग्रेस नगरसेवकांना डावलत आहेत, असे स्पष्ट होते. यावर नगराध्यक्षांनीसुद्धा पत्रकारांशी बोलताना मी कॉँग्रेसची असूनसुद्धा आपल्याला कोंडीत धरण्याचा प्रकार होत आहे आणि बिनबुडाचे आरोप कुणी करू नयेत. जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा दिला. वर्मावर बोट आणि शह-काटशहाचे राजकारणनगरपालिकेमध्ये बहुमत असूनही कॉँग्रेसची झालेली गोची अािण त्याच्या वर्मावर बोट ठेवण्याची शहर विकास आघाडीकडून वारंवार होणारी खेळी यातून राजकीय शह-काटशह रंगणार, अशीच पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे. डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या पोट समिती निवडीच्या पार्श्वभूमीवर पालिकेतील राजकीय हालचालींना जसा वेग येत जाईल, तसे राजकारण अधिकच रंगत जाईल, असेही बोलले जाते.