शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाच्या विषारीकरणातून शंभूराजांची बदनामी: आनंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:39 IST

कोल्हापूर : इतिहासाचे विषारीकरण झाले असून ते ओळखणारा येथे कोणीच नाही; त्यामुळेच छत्रपती शंभूराजे यांच्या बदनामीसारखे प्रकार वारंवार घडत ...

कोल्हापूर : इतिहासाचे विषारीकरण झाले असून ते ओळखणारा येथे कोणीच नाही; त्यामुळेच छत्रपती शंभूराजे यांच्या बदनामीसारखे प्रकार वारंवार घडत आहेत. यासाठी हे विषारीकरण ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद पाटील यांनी रविवारी येथे केले.शाहू स्मारक भवनात मराठा महासंघातर्फे आयोजित शंभूराजे सन्मान परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. परिषदेमध्ये शंभूराजेंची प्रतिमा मलिन करणाऱ्या लेखिका डॉ. शुभा साठे यांच्यासह सरकारबद्दल मान्यवरांनी यावेळी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी इंद्रजित माने यांनी मांडलेल्या ठरावांना हात उंचावून मंजुरी देण्यात आली.आनंद पाटील म्हणाले, आपला इतिहास जवळच आहे; परंतु तो आपल्याला दिसत नाही. आपण याबाबत अभ्यास करीत नाही. कुठला तरी जुना कागद शोधायचा आणि त्याचे भाषांतर करायचे या पलीकडे आपण जात नाही. येथील इतिहासाचे पुरावे नष्ट करण्यात आले असून, खºया इतिहासाचे संशोधन हे परदेशातच होत आहे.डॉ. मोरे म्हणाले, छत्रपती शिवाजी व शंभूराजे यांची बदनामी ही राज्याभिषेक दिन सोहळ्यापासून आजपर्यंत सुरूच आहे. ती पुस्तकापुरती मर्यादित नसून ‘राजसंन्यास,’ ‘बेबंदशाही’ अशा नाटकांमधूनही सुरू आहे. त्यामुळे या नाटकांवरही बंदी घातली पाहिजे.इंद्रजित सावंत म्हणाले, जोपर्यंत हे सरकार बदलत नाही, तोपर्यंत बदनामीचे षड्यंत्र सुरूच राहणार आहे; त्यामुळे नुसती ही परिषद घेऊन न थांबता या पुस्तकांची सरकार जाहीर होळी करीत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबविणार नाही. विलास पोवार म्हणाले, इतिहासाचे पुनर्संशोधन होऊनही बदनामी सुरूच आहे.पी. बी. पोवार म्हणाले, आपल्यातील उणिवांमुळे व दुर्लक्षामुळे असे प्रकार होत आहेत. पठाण म्हणाले, कोणतेही पुरावे नसताना शंभूराजेंच्या बदनामीचा मजकूर छापण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. वसंतराव मुळीक यांनी शंभूराजेंची बदनामी सहन केली जाणार नाही, असा इशारा देत संबंधितांना त्याच भाषेत उत्तर देऊ, असे सांगितले.परिषदेतील ठराव असे‘समर्थ रामदास स्वामी’ या पुस्तकातून छत्रपती शंभूराजे यांची बदनामी करणाºया लेखिका डॉ. शुभा साठे यांच्यासह प्रकाशक, सर्व शिक्षा अभियानांतर्गत या पुस्तकास मंजुरी देणाºया समिती सदस्यांसह अधिकाºयांवर गुन्हा दाखल करावा.या संदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर माफी मागून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.शासनाने छत्रपती शंभूराजेंचे अधिकृत चरित्र प्रकाशित करावे.छत्रपती शंभूराजे यांना ‘राष्टÑपुरुष’ म्हणून मान्यता द्यावी.शंभूराजेंचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर त्यांचे भव्य स्मारक उभारावे.संत तुकाराम यांच्या पत्नीबद्दल चुकीचे लेखन केलेल्या पुस्तकावर बंदी घालावी.संत तुकाराम व संत रामदास यांची चुकीच्या पद्धतीने तुलना करणाºया ‘महाराष्टÑाचे सारस्वत’ या पुस्तकावर बंदी घालावी.