शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

शिरोळला ग्रामपंचायतींचे धुमशान

By admin | Updated: November 17, 2014 23:53 IST

३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका : राजकीय संदर्भ बदलणार

संदीप बावचे - शिरोळ --लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता शिरोळ तालुक्याला मे २०१५ मध्ये होणाऱ्या ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. मिनी विधानसभा म्हणून होणाऱ्या या ग्रामपंचायतींच्या नव्या प्रभाग रचनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. नेहमी गट-तट पातळीवर होणाऱ्या या निवडणुका विधानसभेनंतर कशा पद्धतीने होणार, या गटा-तटालाही राजकीय रंग कसा येणार, याची उत्सुकता आतापासूनच लागून राहिली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका या चौरंगी झाल्या. जातीय समीकरणाचा चांगलाच रंग निवडणुकीत दिसून आला. मे २०१५ मध्ये शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी, बस्तवाड, शेडशाळ, गणेशवाडी, आलास, घोसरवाड, तेरवाड, बुबनाळ, मजरेवाडी, निमशिरगाव, उदगाव, तमदलगे, जैनापूर, शिरदवाड, गौरवाड, शिरटी, जुने दानवाड, कवठेगुलंद, हसूर, घालवाड, टाकळीवाडी, कुटवाड, अर्जुनवाड, चिपरी, नांदणी, यड्राव, धरणगुत्ती, कोंडिग्रे, कोथळी, दत्तवाड, जांभळी, दानोळी व शिरढोण अशा ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे रणांगण पेटणार आहे.निवडणूक आयोगाकडून लवकरच प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मे २०१५ मध्ये ३३ ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार असल्यामुळे प्रभाग रचनेचा आदेश येताच निवडणूक विभागातून त्याबाबत कार्यवाही सुरू होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतींत निम्म्या जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर झाल्याने नेते जोमात अन् कार्यकर्ते कोमात अशी अवस्था झाली होती. ईर्ष्येचे राजकारण मोठ्याप्रमाणात दिसून आले. जिल्ह्यात शिरोळ तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. विधानसभेतील इतिहासानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही तालुका नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई असणार आहेत.ग्रामपंचायतींच्या निवडणुका म्हटले की, स्थानिक गटा-तटाचे राजकारण पेटते. सध्या राजकीय समीकरणे तालुक्यात बदलल्यामुळे आगामी होणाऱ्या ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राजकीय संदर्भ बदलण्याची शक्यता आहे. स्थानिक गटा-तटांतर्गत विळ्या-भोपळ्याचे पाहायला मिळणारे राजकारण या निवडणुकीत कोणते वळण घेणार, याबाबतही उत्सुकता आहे. माजी आमदार सा. रे. पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा. राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, आदींची भूमिका व राजकीय डावपेच कशापद्धतीने आखले जातात, यावरच बरेच काही अवलंबून राहणार आहे. या निवडणुकीत आ. उल्हास पाटील यांच्या विजयात मोलाचा वाटा असलेल्या शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. एकूणच मिनी विधानसभा निवडणुकीची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. तत्पूर्वी होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बॅँक व गोकुळ दूध संघ या निवडणुकांकडेही लक्ष लागून राहिले आहे.