शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

शिरोळमधून मुंबईला एसटी धावणार कधी?

By admin | Updated: January 8, 2016 01:02 IST

खासगी वाहनांना प्राधान्य : कुरुंदवाड आगारातून मुंबईला एकही बस नाही

संतोष बामणे -- जयसिंगपूर--शिरोळ तालुक्यातून एकही एसटी बस मुंबईकडे जाणारी नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे तालुक्याकडे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. राजधानीच्या ठिकाणी जाण्यासाठी एकही एसटी नसल्यामुळे खासगी वाहनांना प्राधान्य देऊन येथील प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे राजधानीला जाण्यासाठी कायमस्वरूपी तालुक्यातून एसटी सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवासीवर्गांतून होत आहे.शिरोळ तालुक्यात प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कुरुंदवाड येथे एस. टी. आगार आहे. तालुक्यातील ५३ गावे व दोन शहरे या आगारावर अवलंबून आहेत. जयसिंगपुरातून रेल्वे सेवा असली, तरी एसटीलाही तितकेच महत्त्व आहे. तालुक्यात जयसिंगपूर हे सांगली-कोल्हापूर महामार्गावरील मोठे शहर असून, जयसिंगपुरातून दररोज १६०० हून अधिक बसेस ये-जा करतात. सध्या शिरोळ तालुक्यातून कुरुंदवाड-पुणे एसटी बसेसच्या दररोज सात फेऱ्या होतात. यापासून कुरुंदवाड आगाराला चांगले उत्पन्न मिळते.कुरुंदवाड आगाराकडून मुंबई येथे जाण्यासाठी तालुक्यातून एकही एसटी बस नाही, ही शोकांतिका आहे. जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज, आजरा या तालुक्यांतून अगदी खेडेगावातूनही मुंबई, कल्याण, बोरिवली, ठाणे, भार्इंदर, दादर, आदी ठिकाणांवर गाड्या दररोज सोडण्यात येतात. मात्र, तालुक्यात प्रवासी असतानादेखील रेल्वेच्या भरवशावर राहून मुंबईकडे जाणारी एकही एसटी कुरुंदवाड आगाराकडून सोडली जात नाही.जयसिंगपूर येथे रेल्वे स्टेशन असून प्रवासी रेल्वेनेही प्रवास करतात. मात्र, कोल्हापूरहून रेल्वे फुल्ल आरक्षित होऊन येत असल्याने जयसिंगपूरमध्ये आरक्षित तिकीट मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना ‘वेटिंग’वर अवलंबून राहून किंवा जनरल गाडीने प्रवास करावा लागत आहे. त्याचबरोबर खासगी बसमधून प्रवास करण्यासाठी एसटीच्या तुलनेत दुप्पट दर द्यावा लागत आहे.जयसिंगपुरातून दररोज ३० हून अधिक खासगी बसेस मुंबईकडे धावतात. मात्र, सामान्य नागरिकांना त्यांचा दर परवडणारा नसतो. जादा दर देऊन खासगी बसने प्रवास करावा, नाही तर रेल्वेतून धक्केखात प्रवास करावा लागत आहे किंवा सांगली, मिरज येथील एसटी बसस्थानकातून मुंबईला बस पकडावी लागते. कुरुंदवाड आगाराकडून सकाळच्या सुमारास दोन, सायंकाळी दोन, रात्री दोन अशा बसेस ग्रामीण भागातून, दत्तवाड, कुरुंदवाड, नृसिंहवाडी, शिरोळ, जयसिंगपूर, मुंबई अशाप्रकारे बसेचची मागणी प्रवासीवर्गांतून होत आहे. ही बससेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा वेळ तसेच पैशांची बचत होऊन कुरुंदवाड आगाराच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. (क्रमश:)शिरोळ तालुक्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून, तालुक्यातील प्रवाशांना सांगली, मिरज, इचलकरंजी येथे जाऊन मुंबईसाठी बस पकडावी लागते, अन्यथा रेल्वेचे वेटिंग आणि खासगी बसच्या जास्त दराचा सामना करावा लागतो. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातून थेट मुंबईला गाडी सोडल्यास प्रवाशांची सोय होणार आहे. - नितीन बागे, सामाजिक कार्यकर्ते, जयसिंगपूर.तालुक्यातून सध्या कुरुंदवाड-पुणे या गाडीच्या सात फेऱ्या असून, मुंबईला फक्तसुटीच्या हंगामात कुरुंदवाड-बोरिवली एक गाडी सोडली जाते. प्रवाशांची मागणी असल्यास आगाराकडून दररोज गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येईल. मध्यंतरी सांगली आगाराकडून कुरुंदवाड आगाराच्या लांब पल्ल्याच्या गाड्या कमी केल्या. त्यामुळे आगाराला अडचणी निर्माण होत आहेत. - एम. बी. भंडारे, कुरुंदवाड आगारप्रमुख.