शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

शिरोळमधून मुंबईला एसटी धावणार कधी?

By admin | Updated: January 8, 2016 01:02 IST

खासगी वाहनांना प्राधान्य : कुरुंदवाड आगारातून मुंबईला एकही बस नाही

संतोष बामणे -- जयसिंगपूर--शिरोळ तालुक्यातून एकही एसटी बस मुंबईकडे जाणारी नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे तालुक्याकडे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. राजधानीच्या ठिकाणी जाण्यासाठी एकही एसटी नसल्यामुळे खासगी वाहनांना प्राधान्य देऊन येथील प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे राजधानीला जाण्यासाठी कायमस्वरूपी तालुक्यातून एसटी सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवासीवर्गांतून होत आहे.शिरोळ तालुक्यात प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कुरुंदवाड येथे एस. टी. आगार आहे. तालुक्यातील ५३ गावे व दोन शहरे या आगारावर अवलंबून आहेत. जयसिंगपुरातून रेल्वे सेवा असली, तरी एसटीलाही तितकेच महत्त्व आहे. तालुक्यात जयसिंगपूर हे सांगली-कोल्हापूर महामार्गावरील मोठे शहर असून, जयसिंगपुरातून दररोज १६०० हून अधिक बसेस ये-जा करतात. सध्या शिरोळ तालुक्यातून कुरुंदवाड-पुणे एसटी बसेसच्या दररोज सात फेऱ्या होतात. यापासून कुरुंदवाड आगाराला चांगले उत्पन्न मिळते.कुरुंदवाड आगाराकडून मुंबई येथे जाण्यासाठी तालुक्यातून एकही एसटी बस नाही, ही शोकांतिका आहे. जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज, आजरा या तालुक्यांतून अगदी खेडेगावातूनही मुंबई, कल्याण, बोरिवली, ठाणे, भार्इंदर, दादर, आदी ठिकाणांवर गाड्या दररोज सोडण्यात येतात. मात्र, तालुक्यात प्रवासी असतानादेखील रेल्वेच्या भरवशावर राहून मुंबईकडे जाणारी एकही एसटी कुरुंदवाड आगाराकडून सोडली जात नाही.जयसिंगपूर येथे रेल्वे स्टेशन असून प्रवासी रेल्वेनेही प्रवास करतात. मात्र, कोल्हापूरहून रेल्वे फुल्ल आरक्षित होऊन येत असल्याने जयसिंगपूरमध्ये आरक्षित तिकीट मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना ‘वेटिंग’वर अवलंबून राहून किंवा जनरल गाडीने प्रवास करावा लागत आहे. त्याचबरोबर खासगी बसमधून प्रवास करण्यासाठी एसटीच्या तुलनेत दुप्पट दर द्यावा लागत आहे.जयसिंगपुरातून दररोज ३० हून अधिक खासगी बसेस मुंबईकडे धावतात. मात्र, सामान्य नागरिकांना त्यांचा दर परवडणारा नसतो. जादा दर देऊन खासगी बसने प्रवास करावा, नाही तर रेल्वेतून धक्केखात प्रवास करावा लागत आहे किंवा सांगली, मिरज येथील एसटी बसस्थानकातून मुंबईला बस पकडावी लागते. कुरुंदवाड आगाराकडून सकाळच्या सुमारास दोन, सायंकाळी दोन, रात्री दोन अशा बसेस ग्रामीण भागातून, दत्तवाड, कुरुंदवाड, नृसिंहवाडी, शिरोळ, जयसिंगपूर, मुंबई अशाप्रकारे बसेचची मागणी प्रवासीवर्गांतून होत आहे. ही बससेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा वेळ तसेच पैशांची बचत होऊन कुरुंदवाड आगाराच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. (क्रमश:)शिरोळ तालुक्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून, तालुक्यातील प्रवाशांना सांगली, मिरज, इचलकरंजी येथे जाऊन मुंबईसाठी बस पकडावी लागते, अन्यथा रेल्वेचे वेटिंग आणि खासगी बसच्या जास्त दराचा सामना करावा लागतो. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातून थेट मुंबईला गाडी सोडल्यास प्रवाशांची सोय होणार आहे. - नितीन बागे, सामाजिक कार्यकर्ते, जयसिंगपूर.तालुक्यातून सध्या कुरुंदवाड-पुणे या गाडीच्या सात फेऱ्या असून, मुंबईला फक्तसुटीच्या हंगामात कुरुंदवाड-बोरिवली एक गाडी सोडली जाते. प्रवाशांची मागणी असल्यास आगाराकडून दररोज गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येईल. मध्यंतरी सांगली आगाराकडून कुरुंदवाड आगाराच्या लांब पल्ल्याच्या गाड्या कमी केल्या. त्यामुळे आगाराला अडचणी निर्माण होत आहेत. - एम. बी. भंडारे, कुरुंदवाड आगारप्रमुख.